मुलांना विष पाजून पित्याची आत्महत्या
मुलांना विष पाजून पित्याची आत्महत्यादोन मुलांचा मृत्यू, एकाची प्रकृती चिंताजनक म टा...
मुलांना विष पाजून पित्याची आत्महत्या
दोन मुलांचा मृत्यू, एकाची प्रकृती चिंताजनक
म. टा. वृत्तसेवा, पंढरपूर
वडिलांनी तीन मुलांना विष पाजून स्वत: गळफास लावून घेऊन केली. विष पाजलेल्या तीन मुलांपैकी दोघांचा मृत्यू झाला असून, एक मुलगी गंभीर अवस्थेत आहे. ही घटना माढा तालुक्यातील बेंबळे येथे गुरुवारी दुपारच्या सुमारास घडली. ही घटना अनैतिक संबंधातून घडल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
रवी लोखंडे, असे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या पित्याचे नाव असून, विष पाजल्याने अत्यवस्थ असलेल्या आयुष रवी लोखंडे (वय ६) व अजिंक्य रवी लोखंडे (वय ८) यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला, तर मुलगी अनुष्काला पुढील उपचाराकरीता सोलापूर येथे पाठवण्यात आले आहे.
मृत रवी लोखंडे पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील वडापुरी गावचा रहिवासी आहे. रवी हा वडापुरी येथे कुटुंबासह राहत होता. माढा तालुक्यातील बेंबळे गावात तो आपला मुलगा आयुष, अजिंक्य व मुलगी अनुष्का यांच्यासह आपल्या मेव्हणीला भेटायला गेला होता. काही कारणाने त्यांच्यात वाद झाले. त्यानंतर रवीने स्वतः आपल्या मुलांना शीतपेयातून विषारी औषध पाजले व स्वतःही गळफास घेऊन आत्महत्या केली. रवी लोखंडे यांने माढा तालुक्यातील बेंबळे गावच्या परिसरात गळफास घेऊन आत्महत्या केली. मात्र, तत्पूर्वी त्याने आपल्या दोन मुले व एक मुलीला विषारी औषध पाजले होते. मुलगा आयुष, अजिंक्य व मुलगी अनुष्का यांना उपचारासाठी इंदापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, आयुष व अजिंक्य यांचा गुरुवारी रात्री उपचारा दरम्यान मृत्यू झाला. मुलगी अनुष्काला पुढील उपचाराकरीता सोलापूर येथे हलविण्यात आले आहे. रवी लोखंडे याने आत्महत्या करण्यापूर्वी एक पत्र स्वतःच्या मोबाइलवरून आपल्या मित्रांना व नातेवाईकांना पाठवले असून, त्यात हे टोकाचे पाऊल का उचलले, याचा खुलासा केला आहे. या घटनेचा अधिक तपास टेंभूर्णी पोलिस करीत आहेत.