अ‍ॅपशहर

भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

उजनी धरण परिसरात मुसळधार पाऊस सुरु असल्याने धरणातून भीमा नदीत ६० हजार क्युसेक्स विसर्गाने पाणी सोडण्यास सुरुवात करण्यात अली आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.

Maharashtra Times 14 Sep 2017, 9:59 pm
म.टा. प्रतिनिधी, पंढरपूर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम flood alert in villages along bhima river
भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा


उजनी धरण परिसरात मुसळधार पाऊस सुरु असल्याने धरणातून भीमा नदीत ६० हजार क्युसेक्स विसर्गाने पाणी सोडण्यास सुरुवात करण्यात अली आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.

पुणे जिल्ह्यातील धरणातून १५ हजार क्युसेक्स विसर्गाने उजनी धरणात पाणी येत असले तरी उजनीच्या परिसरात सातत्याने मुसळधार पाऊस सुरु असल्याने धरणात मोठ्या प्रमाणात पाणीसाठा जमा होऊ लागला आहे. सध्या उजनी धरण ११० टक्के भरले असल्याने धरणात पाणीच साठवण्यास जागा उरलेली नाही. परिणामी धरणातून भीमा नदीत ६० हजार क्युसेक्स विसर्गाने पाणी सोडण्यास सुरुवात करण्यात आली आहे. या पाण्यामुळे भीमा नदीच्या पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ होणार असल्याने प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा दिला आहे. पाऊस कमी न झाल्यास या विसर्गात अजून वाढ करावी लागणार आहे.

दुचाकीसह दोघे वाहून गेले

सध्या भीमा नदीवरील बहुसंख्य बंधारे भरून वाहत असल्याने वरून सोडलेले पाणी वेगाने येणार आहे. आज सायंकाळी पंढरपूर मुंढेवाडी बंधाऱ्यावरून दुचाकीसह दोघे जण वाहून गेले. या दोघांचा शोध सुरू आहे. मुंढेवाडी बंधाऱ्यावरून सायंकाळी ७ च्या सुमारास दुचाकीवरून एक पुरुष व एक महिला चालली होती. बंधाऱ्यावर पाणी असल्याने त्यांना न जाण्याचा सल्ला दिला होता मात्र त्यांनी न ऐकता तशीच दुचाकी बंधाऱ्यावरून नेण्याचा प्रयत्न केला असता हे दोघेही वाहून गेले आहेत. याची माहिती पोलिसांना मिळताच बंधारा परिसरात रात्री शोध मोहीम सुरु करण्यात आली आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज