म. टा. वृत्तसेवा, सोलापूर
शहरातील ज्ञानेश्वर मठ येथील कोकाटे कुटुंबातील चौघांनी आत्महत्या केली आहे. आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. मृतांमध्ये पती-पत्नी आणि दोन अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. आपल्या मुलांना विष पाजून आई-वडिलांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून, पंचनामा करण्याचे काम सुरू आहे.
शहरातील अलिपूर रोड परिसरातील ज्ञानेश्वर मठ जवळील भैरवनाथ शिवाजी कोकाटे यांनी आपल्या कुटुंबासमवेत आत्महत्या केली. भैरवनाथ शिवाजी कोकाटे (४०), मनिषा भैरवनाथ कोकाटे (३६), प्रशांत कोकाटे (१५) आणि प्रतिक्षा कोकाटे (११) अशी मृतांची नावे आहेत. भरदिवसा ही घटना घडल्याने शहरात खळबळ उडाली असून, शेजारील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. पोलिस आणि स्थानिक ही घटनास्थळी पोहोचले आहेत. मृतांमध्ये चार जणांचा समावेश आहे. या घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली असून, संपूर्ण शहरात शोककळा पसरली आहे. नागरिकांकडून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, कोकाटे जमीन खरेदी-विक्रीचा व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह करीत असल्याची माहिती पुढे येत आहे.
शहरातील ज्ञानेश्वर मठ येथील कोकाटे कुटुंबातील चौघांनी आत्महत्या केली आहे. आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. मृतांमध्ये पती-पत्नी आणि दोन अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. आपल्या मुलांना विष पाजून आई-वडिलांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून, पंचनामा करण्याचे काम सुरू आहे.
शहरातील अलिपूर रोड परिसरातील ज्ञानेश्वर मठ जवळील भैरवनाथ शिवाजी कोकाटे यांनी आपल्या कुटुंबासमवेत आत्महत्या केली. भैरवनाथ शिवाजी कोकाटे (४०), मनिषा भैरवनाथ कोकाटे (३६), प्रशांत कोकाटे (१५) आणि प्रतिक्षा कोकाटे (११) अशी मृतांची नावे आहेत. भरदिवसा ही घटना घडल्याने शहरात खळबळ उडाली असून, शेजारील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. पोलिस आणि स्थानिक ही घटनास्थळी पोहोचले आहेत. मृतांमध्ये चार जणांचा समावेश आहे. या घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली असून, संपूर्ण शहरात शोककळा पसरली आहे. नागरिकांकडून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, कोकाटे जमीन खरेदी-विक्रीचा व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह करीत असल्याची माहिती पुढे येत आहे.