अ‍ॅपशहर

लोकांना सुखी सुरक्षित ठेवमहसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांचे विठूरायाला साकडे

‘राज्यातील जनतेला सुखी, समाधानी आणि सुरक्षित ठेव,’ असे साकडे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी विठूरायाला घातले. कार्तिकी यात्रेनिमित्त पहाटे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते सपत्नीक विठूरायाची सरकारी महापूजा झाली. या वेळी कर्नाटकातील विजयपुरा येथील बळीराम चव्हाण आणि शिनाबाई चव्हाण या वारकरी दाम्पत्याला पूजेचा मान मिळाला.

Maharashtra Times 31 Oct 2017, 10:55 pm
म. टा. वृत्तसेवा, पंढरपूर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम kartik yatra pandharpur minister chandrakant patil
लोकांना सुखी सुरक्षित ठेवमहसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांचे विठूरायाला साकडे

‘राज्यातील जनतेला सुखी, समाधानी आणि सुरक्षित ठेव,’ असे साकडे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी विठूरायाला घातले. कार्तिकी यात्रेनिमित्त पहाटे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते सपत्नीक विठूरायाची सरकारी महापूजा झाली. या वेळी कर्नाटकातील विजयपुरा येथील बळीराम चव्हाण आणि शिनाबाई चव्हाण या वारकरी दाम्पत्याला पूजेचा मान मिळाला.
पाटील म्हणाले, ‘वारकऱ्यांच्या मागणीनुसार मंदिर समितीला सहअध्यक्ष पद निर्माण केले असून, समितीमध्ये रिक्त असलेल्या तीन जागांवरही वारकरी प्रतिनिधी भरले जाणार आहेत. राज्य सरकारला तीन वर्षे पूर्ण होत आहेत. नियोजित कामे कामे करीत असल्याचा आनंद आहे.’
कर्नाटक स्टेट ट्रान्सपोर्टमध्ये चालक असलेल्या चव्हाण यांनी महाराष्ट्रातील एसटी कर्मचाऱ्यांना न्याय मिळावा, असे साकडे विठूरायाला घातले. कर्नाटकातील विजयपुरा जिल्ह्यातील हडगली गावचे बळीराम चव्हाण आणि सीनाबाई चव्हाण पाच वर्षांपासून पंढरीची वारी करतात. मंदिर समितीच्या वतीने मंत्री पाटील यांना चांदीची विठ्ठल मूर्ती देऊन तर मानाचे चव्हाण दाम्पत्याचा विठ्ठलाची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला. राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने मानाच्या दाम्पत्याला वर्षभर मोफत प्रवासाचा पास देण्यात आला. मंदिर समितीच्या वतीने जाहीर केलेल्या टोकन दर्शन व्यवस्थेच्या टोकानचे चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.
खडसेंबद्दल अमित शहा निर्णय घेणार
सरकारी पूजेनंतर चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. मुख्यमंत्र्यांनी या पूर्वीच हिवाळी अधिवेशनापूर्वी नारायण राणेंचा मंत्रिमंडळात समावेशाचा निर्णय जाहीर केला आहे. एकनाथ खडसे यांच्याबाबत मुख्यमंत्री साधक-बाधक विचार करीत आहेत. लवकरच अमित शहा यांच्या सोबतच्या बैठकीत यावर निर्णय होईल, असे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
शिवसेना पाच वर्षे पाठिंबा देईल
शिवसेनेचा राणे यांना असलेल्या विरोधा संदर्भात बोलताना पाटील म्हणाले, शिवसेना मदत करेल आणि सरकारही पाच वर्षे पूर्ण करेल. कर्जामाफीमुळे विकासकामांना तीस टक्के कात्री लावण्याच्या निर्णयाबाबत बोलताना ही कपात कोणत्याही ग्रामीण योजनेला लावली जाणार नसल्याचे त्यांनी सांगितले. कर्जमाफी योजनेत तांत्रिक त्रुटी समोर येत असल्या तरी शेवटच्या गरजू शेतकऱ्याला कर्जमाफी मिळेपर्यंत सरकार काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज