अ‍ॅपशहर

'राज ठाकरे म्हणजे विझलेला दिवा'

‘मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणजे विझलेला दिवा आहे. त्यांच्या वक्तव्यांना फार महत्त्व देऊ नये आणि त्याच्या धमक्यांना घाबरू नये,' अशी जोरदार टीका एमआयएमचे आमदार अॅड. वारिस पठाण यांनी केली आहे.

Maharashtra Times 26 Sep 2016, 12:18 pm
मटा ऑनलाइन वृत्त । सोलापूर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम maratha kranti morcha mim
'राज ठाकरे म्हणजे विझलेला दिवा'


‘मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणजे विझलेला दिवा आहे. त्यांच्या वक्तव्यांना फार महत्त्व देऊ नये आणि त्याच्या धमक्यांना घाबरू नये,' अशी जोरदार टीका एमआयएमचे आमदार अॅड. वारिस पठाण यांनी केली आहे.

उरी हल्ल्यानंतर मनसेनं पाकिस्तानी कलाकारांविरोधात भूमिका घेत त्यांना ४८ तासांत देश सोडण्याचा इशारा दिला होता. राज यांच्या या भूमिकेवर समाजवादी पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आमदार अबू आझमी यांनी टीका केली होती. आझमींनंतर मुस्लिम मतांचे राजकारण करणाऱ्या एमआयएमनंही राज यांना लक्ष्य केलं आहे. सोलापूर येथे ते पत्रकारांशी बोलत होते. 'राज ठाकरे प्रसिद्धीसाठी काहीही बोलतात. त्यांच्याबद्दल बोलून मी त्यांना मोठं करणार नाही. प्रसारमाध्यमांनीही त्यांना प्रसिद्धी देऊ नये. ज्यांना निवडून आलेला एक आमदारही सांभाळता येत नाही, त्यांनी उगाच मोठ्या घोषणा करू नयेत’, असा टोलाही पठाण यांनी हाणला.

पठाण यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या तथाकथित धर्मनिरपेक्षतेवर सडकून टीका केली. ‘मराठा आरक्षणाला पाठिंबा व्यक्त करतानाच मुस्लिमांना आरक्षण देण्याची मागणीही त्यांनी केली. न्यायालयाच्या आदेशानंतरही सरकार जाणूनबुजून मुस्लिम आरक्षण नाकारत आहे’, असा आरोपही त्यांनी केला. एमआयएम पक्ष सोलापूर महापालिका निवडणूक पूर्ण ताकदीनिशी लढवणार आहे,' असंही त्यांनी स्पष्ट केलं.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज