सोलापूर: प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते आणि राज्यमंत्री बच्चू कडू यांनी पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीवरून भारतीय जनता पक्षावर टीकेचे प्रहार केले आहेत. सर्वत्र कोरोनाचं संकट समोर दिसत असताना राज्य सरकारच्या स्तरावरील सर्वच निवडणूका पुढं ढकलण्यात आल्या. पंढरपूरची ही निवडणूक तीन महिने पुढं ढकलली असती तर काय आभाळ फाटलं नसतं ? पण सत्तेचा गैरवापर कसा करावा ते भाजपकडून शिकावं असे म्हणत त्यांनीच ही निवडणूक लादल्याची टीका राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केली आहे. (minister of state bachchu kadu has criticized the bjp saying bjp has abused the power) बच्चू कडू हे सोलापुरात प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते. करोनाची स्थिती लक्षात घेता काही ठिकाणी तर प्रशासक नेमले. असे असताना केंद्र सरकारने पंढरपूर विधानसभेची पोटनिवडणूक लावली. त्यामुळं आज कोरोनाच्या कठीण काळात सर्वांनाच त्रास सहन करावा लागत आहे, असे बच्चू कडू यांनी म्हटले आहे. कोरोना संसर्गाच्या स्थितीची पाहणी करण्यासाठी राज्यमंत्री कडू हे सोलापूर शहरात आले होते. त्यावेळी त्यांनी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये भेट देऊन प्राप्त परिस्थितीचा आढावा घेतला.
क्लिक करा आणि वाचा- करोनाप्रतिबंधक उपयाययोजनांसाठी अजित पवार यांचा महत्वाचा निर्णय
पंढरपूर-मंगळावेढ्याचे दिवंगत आमदार भारत नाना भालके हे पक्ष-संघटना बाजूला ठेवून शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवत होते. प्रसंगी आम्हाला मदत करत होते. म्हणून त्यांच्या रिक्त जागेवर त्याचा पुत्र उभा आहे. त्याला मदत करण्यासाठी आम्ही प्रचारासाठी आलो, असा खुलासा त्यांनी केला. राज्यात सध्या कोरोनासारख्या आजाराने थैमान घातले आहे.
क्लिक करा आणि वाचा- मुख्यमंत्री १४ एप्रिलला लॉकडाउन जाहीर करण्याची शक्यता; आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती
पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचारात कार्यकर्ते आणि नेत्यांकडून सर्व नियम मोडले जात आहेत असा प्रश्न यावेळी राज्यमंत्री बच्चू कडू यांना विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना त्यांनी भाजपला आपल्या टीकेचे लक्ष्य केले. पंढरपूरची ही निवडणूक तीन महिने पुढं ढकलली असती तर काय आभाळ फाटलं नसतं ? पण सत्तेचा गैरवापर कसा करावा ते भाजपकडून शिकावं, त्यांनीच ही निवडणूक लादली. मग नाईलाजाने अस्तित्व दाखवण्यासाठी आम्हाला प्रचारात उतरावं लागत आहे अशी पुस्तीही मंत्री बच्चू कडू यांनी यावेळी बोलताना जोडली. मात्र या सभांना होणारी गर्दी आणि त्याचे परिणाम या प्रश्नांना मात्र त्यांनी बगल दिली.
क्लिक करा आणि वाचा- फक्त महाराष्ट्रात इतके रुग्ण कसे कसे वाढतायत आणि...; अस्लम शेख यांना शंका
क्लिक करा आणि वाचा- करोनाप्रतिबंधक उपयाययोजनांसाठी अजित पवार यांचा महत्वाचा निर्णय
पंढरपूर-मंगळावेढ्याचे दिवंगत आमदार भारत नाना भालके हे पक्ष-संघटना बाजूला ठेवून शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवत होते. प्रसंगी आम्हाला मदत करत होते. म्हणून त्यांच्या रिक्त जागेवर त्याचा पुत्र उभा आहे. त्याला मदत करण्यासाठी आम्ही प्रचारासाठी आलो, असा खुलासा त्यांनी केला. राज्यात सध्या कोरोनासारख्या आजाराने थैमान घातले आहे.
क्लिक करा आणि वाचा- मुख्यमंत्री १४ एप्रिलला लॉकडाउन जाहीर करण्याची शक्यता; आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती
पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचारात कार्यकर्ते आणि नेत्यांकडून सर्व नियम मोडले जात आहेत असा प्रश्न यावेळी राज्यमंत्री बच्चू कडू यांना विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना त्यांनी भाजपला आपल्या टीकेचे लक्ष्य केले. पंढरपूरची ही निवडणूक तीन महिने पुढं ढकलली असती तर काय आभाळ फाटलं नसतं ? पण सत्तेचा गैरवापर कसा करावा ते भाजपकडून शिकावं, त्यांनीच ही निवडणूक लादली. मग नाईलाजाने अस्तित्व दाखवण्यासाठी आम्हाला प्रचारात उतरावं लागत आहे अशी पुस्तीही मंत्री बच्चू कडू यांनी यावेळी बोलताना जोडली. मात्र या सभांना होणारी गर्दी आणि त्याचे परिणाम या प्रश्नांना मात्र त्यांनी बगल दिली.
क्लिक करा आणि वाचा- फक्त महाराष्ट्रात इतके रुग्ण कसे कसे वाढतायत आणि...; अस्लम शेख यांना शंका