म. टा. वृत्तसेवा, माढा
‘चळवळीतून मोठे झालेले कार्यकर्ते संघटनेशी प्रतारणा करणार नाहीत. संघटनेच्या कडक शिस्तीचा त्रास काही लोकांना होत आहे. मात्र, सदाभाऊ संघटनेतून बाहेर पडतील, असे वाटत नाही,’ अशी मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त केले. माढा येथे एका कार्यक्रमासाठी आलेले शेट्टी पत्रकारांशी बोलत होते.
गेल्या काही दिवसांपासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेत फूट पडणार, अशी चर्चा सुरू आहे. कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत वेगळी संघटना काढणार असल्याचा कयास लावला जात आहे. राजू शेट्टी आणि खोत यांच्यात टोकाचा संघर्ष सुरू असतानाही रविवारचे शेट्टींचे वक्तव्य आशावादी होते.
दरम्यान, रघुनाथ पाटील यांनी केलेल्या टीकेबाबत बोलताना खासदार शेट्टी म्हणाले, ‘असल्या किरकोळ लोकांच्या टीकेला उत्तर द्यायला मला वेळ नाही. सरकारचा पाठिंबा कधी काढणार ते वेळ आल्यावर कळेल.’ कोल्हापूर आणि सांगली जिल्हा परिषदेसाठी स्थानिक आघाड्या करण्याचा निर्णय आधीच झाला होता. तसे अधिकार स्थानिक नेत्यांना दिले होते, असेही शेट्टी म्हणाले.
फुटीचे स्पष्ट संकेत
माढ्यातील शेट्टींच्या कार्यक्रमाकडे सदाभाऊ खोत यांना मानणाऱ्या संघटनेच्या जिल्हा अध्यक्षांसह अनेक कार्यकर्त्यांनी पाठ फिरवल्याने फुटीचे स्पष्ट संकेत मिळत होते. ही बाब शेट्टींच्या निदर्शनास आणताच, ‘रेल्वेत काही लोक चढत असतात तर काही उतरत असतात, त्यामुळे कोण आले आणि कोणी गेल्याने संघटनेस काही फरक पडणार नाही’, असेही शेट्टी म्हणाले.
कार्यकर्त्यांशी चर्चा
सध्या शेट्टी आणि सदाभाऊ खोत यांच्या वादाच्या पार्श्वभूमीवर शेट्टी काय बोलतात याकडे सर्वांचेच लक्ष होते. मात्र, शेट्टींनी थेट सदाभाऊ खोत यांच्या माढा लोकसभा मतदारसंघातच कार्यकर्त्यांच्या बैठक घेतल्या. रविवारी एका दिवसांत शेट्टी यांनी सांगोला, मंगळवेढा, माढा येथे दौरा करून पुन्हा माढ्यात जिल्ह्यातील प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक घेतल्याने सदाभाऊ खोत यांनी संघटना सोडली तरी कार्यकर्ते एकत्र ठेवण्यासाठी शेट्टी सक्रिय झाल्याचे दिसले.
केंद्रीय कृषिमंत्र्यांनी
शेतीचा सत्यानाश केला
‘केंद्रीय कृषिमंत्री आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्र्यांनी देशातील शेतकऱ्यांचा सत्यानाश केला आहे. गेल्या ४ वर्षांत सरकारने अन्नधान्याची आयात २८ हजार कोटी वरून १ लाख ४० हजार कोटींपर्यंत नेली आहे, असा आरोप गंभीर आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी केला. माढा येथे ते पत्रकारांशी बोलत होते.
कृषिप्रधान देशातील आयात वाढतेच, कशी असा सवाल करीत केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंह आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री रामविलास पासवान यांच्या खेळात शेतकऱ्यांचा बळी चालल्याचे त्यांनी सांगितले.
शेट्टींनी केंद्र, राज्य सरकारवर तोफ डागत केंद्र सरकारच्या धोरणांची चिरफाड केली. मोदी सरकारच्या फसव्या घोषणांमुळे देशभरातील शेतकरी अस्वस्थ असून, केंद्रीय कृषिमंत्री साफ खोटे बोलू लागल्याने आम्ही त्यांना मोदींच्या वक्तव्याचे पुरावेच दिले आहेत. केंद्रीय कृषी आणि अन्न पुरवठा मंत्रालयात ताळमेळ नसल्याने सध्याचे सरकार शेतीमालाची आयात करून शेतकरी मोडून पडत आहे. देशभरातील शेतकरी या सरकारच्या फसव्या घोषणांविरुद्ध एकत्र आला आहे. हेच पंतप्रधान मोदी यांचे मोठे योगदान आहे, असेही शेट्टी म्हणाले.
... तर फडणवीसांचा पाठिंबा काढू
राज्य सरकारच्या विरोधात एवढी आंदोलने करूनही त्यांना काही फरक पडत नाही. आम्ही २६ जुलैचा अल्टिमेटम फडणवीस सरकारला दिला असून, त्यांनी शब्द न पाळल्यास मात्र राज्य सरकारचा पाठिंबा काढून घेणार आहे, असेही शेट्टी म्हणाले.
कर्जमाफीचे आकडे फुगलेले
कर्जमाफीमध्ये आकडे फुगलेले आहेत. सर्व कर्जमाफी १० ते १२ हजार कोटींची आहे. सगळी नावे व माहिती जाहीर न करण्यामागची तीच गोम आहे. राज्यातील दुधाचा प्रश्न गंभीर झाला असून, खासगी संघ दुधाला कमी भाव देत असल्याने सोमवारी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करणार आहे, असेही शेट्टी म्हणाले.
‘चळवळीतून मोठे झालेले कार्यकर्ते संघटनेशी प्रतारणा करणार नाहीत. संघटनेच्या कडक शिस्तीचा त्रास काही लोकांना होत आहे. मात्र, सदाभाऊ संघटनेतून बाहेर पडतील, असे वाटत नाही,’ अशी मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त केले. माढा येथे एका कार्यक्रमासाठी आलेले शेट्टी पत्रकारांशी बोलत होते.
गेल्या काही दिवसांपासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेत फूट पडणार, अशी चर्चा सुरू आहे. कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत वेगळी संघटना काढणार असल्याचा कयास लावला जात आहे. राजू शेट्टी आणि खोत यांच्यात टोकाचा संघर्ष सुरू असतानाही रविवारचे शेट्टींचे वक्तव्य आशावादी होते.
दरम्यान, रघुनाथ पाटील यांनी केलेल्या टीकेबाबत बोलताना खासदार शेट्टी म्हणाले, ‘असल्या किरकोळ लोकांच्या टीकेला उत्तर द्यायला मला वेळ नाही. सरकारचा पाठिंबा कधी काढणार ते वेळ आल्यावर कळेल.’ कोल्हापूर आणि सांगली जिल्हा परिषदेसाठी स्थानिक आघाड्या करण्याचा निर्णय आधीच झाला होता. तसे अधिकार स्थानिक नेत्यांना दिले होते, असेही शेट्टी म्हणाले.
फुटीचे स्पष्ट संकेत
माढ्यातील शेट्टींच्या कार्यक्रमाकडे सदाभाऊ खोत यांना मानणाऱ्या संघटनेच्या जिल्हा अध्यक्षांसह अनेक कार्यकर्त्यांनी पाठ फिरवल्याने फुटीचे स्पष्ट संकेत मिळत होते. ही बाब शेट्टींच्या निदर्शनास आणताच, ‘रेल्वेत काही लोक चढत असतात तर काही उतरत असतात, त्यामुळे कोण आले आणि कोणी गेल्याने संघटनेस काही फरक पडणार नाही’, असेही शेट्टी म्हणाले.
कार्यकर्त्यांशी चर्चा
सध्या शेट्टी आणि सदाभाऊ खोत यांच्या वादाच्या पार्श्वभूमीवर शेट्टी काय बोलतात याकडे सर्वांचेच लक्ष होते. मात्र, शेट्टींनी थेट सदाभाऊ खोत यांच्या माढा लोकसभा मतदारसंघातच कार्यकर्त्यांच्या बैठक घेतल्या. रविवारी एका दिवसांत शेट्टी यांनी सांगोला, मंगळवेढा, माढा येथे दौरा करून पुन्हा माढ्यात जिल्ह्यातील प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक घेतल्याने सदाभाऊ खोत यांनी संघटना सोडली तरी कार्यकर्ते एकत्र ठेवण्यासाठी शेट्टी सक्रिय झाल्याचे दिसले.
केंद्रीय कृषिमंत्र्यांनी
शेतीचा सत्यानाश केला
‘केंद्रीय कृषिमंत्री आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्र्यांनी देशातील शेतकऱ्यांचा सत्यानाश केला आहे. गेल्या ४ वर्षांत सरकारने अन्नधान्याची आयात २८ हजार कोटी वरून १ लाख ४० हजार कोटींपर्यंत नेली आहे, असा आरोप गंभीर आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी केला. माढा येथे ते पत्रकारांशी बोलत होते.
कृषिप्रधान देशातील आयात वाढतेच, कशी असा सवाल करीत केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंह आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री रामविलास पासवान यांच्या खेळात शेतकऱ्यांचा बळी चालल्याचे त्यांनी सांगितले.
शेट्टींनी केंद्र, राज्य सरकारवर तोफ डागत केंद्र सरकारच्या धोरणांची चिरफाड केली. मोदी सरकारच्या फसव्या घोषणांमुळे देशभरातील शेतकरी अस्वस्थ असून, केंद्रीय कृषिमंत्री साफ खोटे बोलू लागल्याने आम्ही त्यांना मोदींच्या वक्तव्याचे पुरावेच दिले आहेत. केंद्रीय कृषी आणि अन्न पुरवठा मंत्रालयात ताळमेळ नसल्याने सध्याचे सरकार शेतीमालाची आयात करून शेतकरी मोडून पडत आहे. देशभरातील शेतकरी या सरकारच्या फसव्या घोषणांविरुद्ध एकत्र आला आहे. हेच पंतप्रधान मोदी यांचे मोठे योगदान आहे, असेही शेट्टी म्हणाले.
... तर फडणवीसांचा पाठिंबा काढू
राज्य सरकारच्या विरोधात एवढी आंदोलने करूनही त्यांना काही फरक पडत नाही. आम्ही २६ जुलैचा अल्टिमेटम फडणवीस सरकारला दिला असून, त्यांनी शब्द न पाळल्यास मात्र राज्य सरकारचा पाठिंबा काढून घेणार आहे, असेही शेट्टी म्हणाले.
कर्जमाफीचे आकडे फुगलेले
कर्जमाफीमध्ये आकडे फुगलेले आहेत. सर्व कर्जमाफी १० ते १२ हजार कोटींची आहे. सगळी नावे व माहिती जाहीर न करण्यामागची तीच गोम आहे. राज्यातील दुधाचा प्रश्न गंभीर झाला असून, खासगी संघ दुधाला कमी भाव देत असल्याने सोमवारी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करणार आहे, असेही शेट्टी म्हणाले.