म. टा. वृत्तसेवा, सोलापूर
मागील दोन महिन्यांपासून दडी मारलेल्या पावसाने शनिवार सायंकाळपासून दमदार हजेरी लावली. शहरासह जिल्ह्यातील मोहोळ, पंढरपूरसह अन्य तालुक्यातही पाऊस पडत असल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. मात्र दडी मारलेल्या पावसाचे अचानक आगमन झाल्याने ऊस आणि केळी पिकांचे नुकसान झाले.
शनिवारी दिवसभर ढग दाटून आले, परंतु नेहमीप्रमाणे पाऊस आलाच नाही मात्र, सायंकाळी संततधार पावसाला सुरूवात झाली. रात्रभर सुरू असलेला पाऊस सकाळपर्यंत सुरूच होता. या पावसाने जमिनीत चांगली ओल झाली असून, उभ्या पिकास चांगला लाभ होणार असल्याचे शेतकरी वर्गातून बोलले जात आहे. सोलापूर शहरासह पंढरपूर, माळशिरस, माढा, मोहोळ, बार्शीसह सर्वच तालुक्यात पावसाने हजेरी लावल्याने बळीराजा काही अंशी समाधानी झाला असल्याचे सांगण्यात आले. पावसाने ओढ दिल्याने चिंतेत असलेल्या मंगळवेढा तालुक्यातील बळीराजालाही शनिवारी रात्रीपासून सुरू असलेल्या भीज पावसाने दिलासा दिला. खरीपाच्या पिकांना या पावसाने जीवदान मिळाले आहे. तालुक्यातील सलगर, निंबोनी, बावची, जित्ती, पाठखळ, भाळवनी, हाजापुर, हिवरगाव, तळसंगी, नंदेश्वर, भोसे, हुन्नूर, महमदाबादसह परिसरात संततधार सुरू आहे. पश्चिम भागात आंधळगाव, गणेशवाडी, अकोला, शेलेवाडी, मारापुर, घरनिकी, गुंजेगाव लेंडवे, चिंचाळे या परिसरात पाऊस झाला आहे.
दरम्यान शहर शिवारातील सूर्यफूल आणि तुरीची अगोदर पेरणी झालेल्या शेतकऱ्यांना मात्र फटका बसला आहे. योग्य वेळी पावसाने दडी मारल्याने पिके जळून गेली आहेत. जून महिन्यात पडलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांनी पेरणी केली होती. मात्र, त्यानंतर दोन महिन्यांपासून दडी मारलेल्या पावसामुळे माळशिरस तालुक्यातील निमगाव येथील केळीच्या पीकासह ऊस पिकाचे मोठे नुकसान झाले आहे.
मागील दोन महिन्यांपासून दडी मारलेल्या पावसाने शनिवार सायंकाळपासून दमदार हजेरी लावली. शहरासह जिल्ह्यातील मोहोळ, पंढरपूरसह अन्य तालुक्यातही पाऊस पडत असल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. मात्र दडी मारलेल्या पावसाचे अचानक आगमन झाल्याने ऊस आणि केळी पिकांचे नुकसान झाले.
शनिवारी दिवसभर ढग दाटून आले, परंतु नेहमीप्रमाणे पाऊस आलाच नाही मात्र, सायंकाळी संततधार पावसाला सुरूवात झाली. रात्रभर सुरू असलेला पाऊस सकाळपर्यंत सुरूच होता. या पावसाने जमिनीत चांगली ओल झाली असून, उभ्या पिकास चांगला लाभ होणार असल्याचे शेतकरी वर्गातून बोलले जात आहे. सोलापूर शहरासह पंढरपूर, माळशिरस, माढा, मोहोळ, बार्शीसह सर्वच तालुक्यात पावसाने हजेरी लावल्याने बळीराजा काही अंशी समाधानी झाला असल्याचे सांगण्यात आले. पावसाने ओढ दिल्याने चिंतेत असलेल्या मंगळवेढा तालुक्यातील बळीराजालाही शनिवारी रात्रीपासून सुरू असलेल्या भीज पावसाने दिलासा दिला. खरीपाच्या पिकांना या पावसाने जीवदान मिळाले आहे. तालुक्यातील सलगर, निंबोनी, बावची, जित्ती, पाठखळ, भाळवनी, हाजापुर, हिवरगाव, तळसंगी, नंदेश्वर, भोसे, हुन्नूर, महमदाबादसह परिसरात संततधार सुरू आहे. पश्चिम भागात आंधळगाव, गणेशवाडी, अकोला, शेलेवाडी, मारापुर, घरनिकी, गुंजेगाव लेंडवे, चिंचाळे या परिसरात पाऊस झाला आहे.
दरम्यान शहर शिवारातील सूर्यफूल आणि तुरीची अगोदर पेरणी झालेल्या शेतकऱ्यांना मात्र फटका बसला आहे. योग्य वेळी पावसाने दडी मारल्याने पिके जळून गेली आहेत. जून महिन्यात पडलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांनी पेरणी केली होती. मात्र, त्यानंतर दोन महिन्यांपासून दडी मारलेल्या पावसामुळे माळशिरस तालुक्यातील निमगाव येथील केळीच्या पीकासह ऊस पिकाचे मोठे नुकसान झाले आहे.