सोलापूर: ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या अॅड. अपर्णा अरुण रामतीर्थकर यांचं आज सकाळी ११.४५ वाजता अश्विनी सहकारी रुग्णालयात उपचार सुरू असताना निधन झाले. पक्षाघाताचा झटका आल्याने गेल्या महिनाभरापासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. मृत्यूसमयी त्या ६५ वर्षांच्या होत्या. त्यांच्यामागे एक मुलगा, सून, नातू असा परिवार आहे. ज्येष्ठ पत्रकार कै. अरुण रामतीर्थकर यांच्या त्या पत्नी होत.
मुलाचं शिक्षणपूर्ण होईपर्यंत त्यांनी फक्त घर सांभाळलं. मुलगा स्वावलंबी होताच १९९६मध्ये अपुरे शिक्षण पूर्ण करत बी.ए.ची पदवी घेतली. त्यानंतर लगेच एलएलबी झाल्या. कोर्टात पीडित महिलांची दु:खं आणि वकिलांचं वर्तन पाहून त्यांनी अशी वकिली करायची नाही असं ठरवलं. त्यानंतर त्या अशील आणि प्रतिवादी यांच्यात समेट घडवून आणू लागल्या. नकळत त्या हजारो घरांपर्यंत पोहोचल्या. २००१पासून त्या सामाजिक कार्यात आहेत. २००८पासून ‘चला नाती जपू या', ‘आईच्या जबाबदार्या’ या विषयांवर त्यांनी तीन हजाराहून अधिक भाषणं दिली आहेत.
'मुस्लीम व्यक्तींकडून भाजी विकत घेऊ नये'
महिन्यातून २६ ते २८ दिवस एसटी बसने प्रवास करून व्याख्याने देणार्या अपर्णा रामतीर्थकर यांच्या भूमिकेवरून अनेकदा वादही झाले. सोलापुरातील पाखर संकुल, उद्योगवर्धिनी आदी संस्थांवर त्या अखेरपर्यंत कार्यरत होत्या. विविध वृत्तपत्रांसाठी महिला आणि इतर विषयावर त्यांनी पुष्कळ स्तंभलेखन केले. आपले संपूर्ण मानधन सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ येथील पारधी मुलांच्या वसतीगृहासाठी देऊन अनेक वर्षे त्यांनी तेथील आश्रमशाळा उभी केली.
उत्तर प्रदेशात दोन संतांची हत्या, आरोपीला अटक
मुलाचं शिक्षणपूर्ण होईपर्यंत त्यांनी फक्त घर सांभाळलं. मुलगा स्वावलंबी होताच १९९६मध्ये अपुरे शिक्षण पूर्ण करत बी.ए.ची पदवी घेतली. त्यानंतर लगेच एलएलबी झाल्या. कोर्टात पीडित महिलांची दु:खं आणि वकिलांचं वर्तन पाहून त्यांनी अशी वकिली करायची नाही असं ठरवलं. त्यानंतर त्या अशील आणि प्रतिवादी यांच्यात समेट घडवून आणू लागल्या. नकळत त्या हजारो घरांपर्यंत पोहोचल्या. २००१पासून त्या सामाजिक कार्यात आहेत. २००८पासून ‘चला नाती जपू या', ‘आईच्या जबाबदार्या’ या विषयांवर त्यांनी तीन हजाराहून अधिक भाषणं दिली आहेत.
'मुस्लीम व्यक्तींकडून भाजी विकत घेऊ नये'
महिन्यातून २६ ते २८ दिवस एसटी बसने प्रवास करून व्याख्याने देणार्या अपर्णा रामतीर्थकर यांच्या भूमिकेवरून अनेकदा वादही झाले. सोलापुरातील पाखर संकुल, उद्योगवर्धिनी आदी संस्थांवर त्या अखेरपर्यंत कार्यरत होत्या. विविध वृत्तपत्रांसाठी महिला आणि इतर विषयावर त्यांनी पुष्कळ स्तंभलेखन केले. आपले संपूर्ण मानधन सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ येथील पारधी मुलांच्या वसतीगृहासाठी देऊन अनेक वर्षे त्यांनी तेथील आश्रमशाळा उभी केली.
उत्तर प्रदेशात दोन संतांची हत्या, आरोपीला अटक