म. टा. वृत्तसेवा, सोलापूर
बाजरीची कडक भाकरी, गरगट्ट्याची भाजी आणि हुग्गी, शेंगाची पोळी, असा झकास बेत. पंगत वाढण्यास महापौर आणि शहराध्यक्ष आणि सिद्धरामेश्वरांच्या अक्षता सोहळ्याचा मुहूर्त, अशा त्रिवेणी संगम साधत भाजपचे पालकमंत्री विजयकुमार देशमुख व सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्यामध्ये शनिवारी मनोमिलन झाले. पालकमंत्र्यांना सोबत घेऊन सर्वच बाबतीत सोलापूर समृद्ध करणार असल्याचे सहकारमंत्र्यांनी सांगितले. या वेळी लोकमंगलच्या वतीने काढण्यात आलेल्या पर्यटन विषयक पुस्तकाचे प्रकाशनही पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले.
गेल्या वर्षभरापासून महापालिकेत गटबाजीचे राजकारण सुरू आहे. सुमारे दहा महिन्यांनतर या गटबाजीमध्ये खुद्द मुख्यमंत्र्यांनाच लक्ष घालावे लागले. मुंबई येथे झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी दोन्ही मंत्र्यांसबोत महापौर, शहराध्यक्ष नगरसेवक या सगळ्यांनाच झापले. एकत्र व्हा अन्यथा महापालिका बरखास्त करू, असा इशाराच मुख्यमंत्र्यांनी दिला. या इशाऱ्यानंतर अखेर पालकमंत्री देशमुख आणि सहकारमंत्री देशमुख यांचे तसेच त्यांच्या सर्व नगरसेवकांचे शनिवारी अक्षता सोहळ्याच्या मुर्हूतावर मनोमिलन झाले.
शनिवारी सकाळी भाजपच्या दोन्ही गटाचे नगरसेवक आणि पदाधिकारी महापालिकेत एकत्र जमले. सहकारमंत्री देशमुख महापालिकेत आले. त्यांच्या उपस्थितीत चहापान झाल्यानंतर सर्वजण अक्षता सोहळ्यासाठी गेले. तेथे पालकमंत्री आणि त्यांचे सहकारी अधीच पोहचले होते. अक्षता सोहळा झाल्यानंतर पालकमंत्र्यांच्या वतीने सारस्वत मंगल कार्यालयात स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यासाठी पालकमंत्री अक्षता पडल्यानंतर लगेच गेले. त्यानंतर सर्व नगरसेवकांनी सारस्वत मंगल कार्यालयात हजेरी लावली. पहिल्या पंगतीनंतर सर्व महिला नगरसेविकांचे आगमन झाले. पालकमंत्र्यांनी सर्वांना आग्रह करून भोजनाचा आस्वाद घेण्यास सांगत होते. त्यानंतर दुपारी साडेचारच्या सुमारास सहकारमंत्री सुभाष देशमुख, भाजपाचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार यांचे आगमन झाले. तोपर्यंत पालकमंत्री देशमुख जेवणासाठी सहकारमंत्र्यांची वाट पहात बसले होते. तिघांनीही भोजनाचा एकत्र आस्वाद घेतला. महापौर शोभा बनशेट्टी, भाजपाचे शहराध्यक्ष अशोक निंबर्गी यांनी पालकमंत्री आणि सहकारमंत्र्यांना जेवण वाढले. हे दृश्य टिपण्यासाठी कॅमेरामन तथा भाजपच्या पदाधिकारी, नगरसेवकांची एकच गर्दी झाली होती. गेल्या अनेक वर्षांपासून दोन्ही देशमुखांमध्ये असलेले मनभेद सध्या तरी मिटल्याचा आनंद या वेळी भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये जाणवत होता.
बाजरीची कडक भाकरी, गरगट्ट्याची भाजी आणि हुग्गी, शेंगाची पोळी, असा झकास बेत. पंगत वाढण्यास महापौर आणि शहराध्यक्ष आणि सिद्धरामेश्वरांच्या अक्षता सोहळ्याचा मुहूर्त, अशा त्रिवेणी संगम साधत भाजपचे पालकमंत्री विजयकुमार देशमुख व सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्यामध्ये शनिवारी मनोमिलन झाले. पालकमंत्र्यांना सोबत घेऊन सर्वच बाबतीत सोलापूर समृद्ध करणार असल्याचे सहकारमंत्र्यांनी सांगितले. या वेळी लोकमंगलच्या वतीने काढण्यात आलेल्या पर्यटन विषयक पुस्तकाचे प्रकाशनही पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले.
गेल्या वर्षभरापासून महापालिकेत गटबाजीचे राजकारण सुरू आहे. सुमारे दहा महिन्यांनतर या गटबाजीमध्ये खुद्द मुख्यमंत्र्यांनाच लक्ष घालावे लागले. मुंबई येथे झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी दोन्ही मंत्र्यांसबोत महापौर, शहराध्यक्ष नगरसेवक या सगळ्यांनाच झापले. एकत्र व्हा अन्यथा महापालिका बरखास्त करू, असा इशाराच मुख्यमंत्र्यांनी दिला. या इशाऱ्यानंतर अखेर पालकमंत्री देशमुख आणि सहकारमंत्री देशमुख यांचे तसेच त्यांच्या सर्व नगरसेवकांचे शनिवारी अक्षता सोहळ्याच्या मुर्हूतावर मनोमिलन झाले.
शनिवारी सकाळी भाजपच्या दोन्ही गटाचे नगरसेवक आणि पदाधिकारी महापालिकेत एकत्र जमले. सहकारमंत्री देशमुख महापालिकेत आले. त्यांच्या उपस्थितीत चहापान झाल्यानंतर सर्वजण अक्षता सोहळ्यासाठी गेले. तेथे पालकमंत्री आणि त्यांचे सहकारी अधीच पोहचले होते. अक्षता सोहळा झाल्यानंतर पालकमंत्र्यांच्या वतीने सारस्वत मंगल कार्यालयात स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यासाठी पालकमंत्री अक्षता पडल्यानंतर लगेच गेले. त्यानंतर सर्व नगरसेवकांनी सारस्वत मंगल कार्यालयात हजेरी लावली. पहिल्या पंगतीनंतर सर्व महिला नगरसेविकांचे आगमन झाले. पालकमंत्र्यांनी सर्वांना आग्रह करून भोजनाचा आस्वाद घेण्यास सांगत होते. त्यानंतर दुपारी साडेचारच्या सुमारास सहकारमंत्री सुभाष देशमुख, भाजपाचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार यांचे आगमन झाले. तोपर्यंत पालकमंत्री देशमुख जेवणासाठी सहकारमंत्र्यांची वाट पहात बसले होते. तिघांनीही भोजनाचा एकत्र आस्वाद घेतला. महापौर शोभा बनशेट्टी, भाजपाचे शहराध्यक्ष अशोक निंबर्गी यांनी पालकमंत्री आणि सहकारमंत्र्यांना जेवण वाढले. हे दृश्य टिपण्यासाठी कॅमेरामन तथा भाजपच्या पदाधिकारी, नगरसेवकांची एकच गर्दी झाली होती. गेल्या अनेक वर्षांपासून दोन्ही देशमुखांमध्ये असलेले मनभेद सध्या तरी मिटल्याचा आनंद या वेळी भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये जाणवत होता.