म. टा. वृत्तसेवा, सोलापूर
‘मराठा आणि मुस्लिम समाजाला आरक्षण मिळत होते. परंतु पांढऱ्या पायाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आडकाठी घातल्याने आरक्षण कोर्टात लटकले,’ अशी टीका माजी मुख्यमंत्री आमदार नारायण राणे यांनी केली. सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचार सभेत बोलत होते.
आसार मैदान येथे सोमवारी घेण्यात आलेल्या जाहीर सभेत राणे यांनी केंद्र आणि राज्यातील भाजप सरकार आणि शिवसेनेवर टीकेची झोड उठविली. राणे म्हणाले, ‘यशवंतराव चव्हाण ते सुधीलकुमार शिंदे आणि त्यानंतर पृथ्वीराज चव्हाण हे मुख्यमंत्री जबाबदारीने बोलत होते. शिवाय कोणालाही कमी लेखत नव्हते मात्र, देवेंद्र फडणवीस मात्र शिवसेनेची औकात काढत आहेत, हे दुर्दैव आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना देशात विशेष मान आहे. आतापर्यंतच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राची संस्कृती आणि संस्कार सांभाळले आहेत. मात्र, मुख्यमंत्री फडणवीस यांनी संस्कृतीला काळीमा फासला आहे. मुख्यमंत्र्यांनी खरे बोलले पाहिजे परंतु फडणवीस चक्क खोटे बोलत आहेत, हे महाराष्ट्रासाठी लाजिरवाणे आहे. फडणवीस जे बोलतात ते करीत नाहीत. एकूणच फडणवीस सरकार थापाडे आहेत. भाजप सरकारने शेतकऱ्यांची पुरती वाट लावली आहे. धान्य आणि भाजीपाल्याचे दर पडले आहेत. शेतकरी हवालदिल झाला आहे. भाजीपाला रस्त्यावर टाकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. गेल्या अडीच ते तीन वर्षांत सरकारने केवळ बनवाबनवी केली आहे.’
दरम्यान, मुंबईत युती तुटली म्हणून भाजप शिवसेनेवर जहरी टीका करीत आहे, मित्र पक्षावर अशी टीका करणे योग्य नाही, भाजपकडून शिवसेनेची फरफट सुरू आहे. राजिनामा खिशात घेऊन फिरायचा नसतो, तो देऊन टाकायचा असतो परंतु, तेवढी धमक सेनेच्या मंत्र्यांमध्ये नाही. एकूणच सेनेच्या मंत्र्यांची चेष्ठा सुरू आहे. सत्ता आणि सत्तेतून पैसे मिळविण्याचा धंदा भाजप आणि शिवसेना सरकारने मांडला असून, थापाडे, गरिबांची चेष्ठा करणारे व बेईमान फडणवीस सरकार फार काळ टीकणार नाही, असेही राणे म्हणाले.
दोन देशमुखांच्या भांडणात विकास खुंटला
सोलापूर शहराचा विकास करण्याचे बाजूला ठेऊन पालकमंत्री विजयकुमार देशमुख आणि सहकारमंत्री सुभाष देशमुख आपापसात भांडत आहेत. विकासकामांसाठी हे दोघे का भांडत नाहीत. सोलापूर शहराला त्यांनी काय दिले याचा जाब सोलापूरकर जनतेने त्यांना विचारावा असेही आमदार राणे यांनी सांगितले. सुभाष देशमुख यांच्या लोकमंगलच्या वाहनात सुमारे ९१ लाख रुपये सापडले त्याचे पुढे काहीही झाले नाही, उलट त्यांना क्लीनचिट दिली, असा आरोपही राणे यांनी केला.
‘मराठा आणि मुस्लिम समाजाला आरक्षण मिळत होते. परंतु पांढऱ्या पायाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आडकाठी घातल्याने आरक्षण कोर्टात लटकले,’ अशी टीका माजी मुख्यमंत्री आमदार नारायण राणे यांनी केली. सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचार सभेत बोलत होते.
आसार मैदान येथे सोमवारी घेण्यात आलेल्या जाहीर सभेत राणे यांनी केंद्र आणि राज्यातील भाजप सरकार आणि शिवसेनेवर टीकेची झोड उठविली. राणे म्हणाले, ‘यशवंतराव चव्हाण ते सुधीलकुमार शिंदे आणि त्यानंतर पृथ्वीराज चव्हाण हे मुख्यमंत्री जबाबदारीने बोलत होते. शिवाय कोणालाही कमी लेखत नव्हते मात्र, देवेंद्र फडणवीस मात्र शिवसेनेची औकात काढत आहेत, हे दुर्दैव आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना देशात विशेष मान आहे. आतापर्यंतच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राची संस्कृती आणि संस्कार सांभाळले आहेत. मात्र, मुख्यमंत्री फडणवीस यांनी संस्कृतीला काळीमा फासला आहे. मुख्यमंत्र्यांनी खरे बोलले पाहिजे परंतु फडणवीस चक्क खोटे बोलत आहेत, हे महाराष्ट्रासाठी लाजिरवाणे आहे. फडणवीस जे बोलतात ते करीत नाहीत. एकूणच फडणवीस सरकार थापाडे आहेत. भाजप सरकारने शेतकऱ्यांची पुरती वाट लावली आहे. धान्य आणि भाजीपाल्याचे दर पडले आहेत. शेतकरी हवालदिल झाला आहे. भाजीपाला रस्त्यावर टाकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. गेल्या अडीच ते तीन वर्षांत सरकारने केवळ बनवाबनवी केली आहे.’
दरम्यान, मुंबईत युती तुटली म्हणून भाजप शिवसेनेवर जहरी टीका करीत आहे, मित्र पक्षावर अशी टीका करणे योग्य नाही, भाजपकडून शिवसेनेची फरफट सुरू आहे. राजिनामा खिशात घेऊन फिरायचा नसतो, तो देऊन टाकायचा असतो परंतु, तेवढी धमक सेनेच्या मंत्र्यांमध्ये नाही. एकूणच सेनेच्या मंत्र्यांची चेष्ठा सुरू आहे. सत्ता आणि सत्तेतून पैसे मिळविण्याचा धंदा भाजप आणि शिवसेना सरकारने मांडला असून, थापाडे, गरिबांची चेष्ठा करणारे व बेईमान फडणवीस सरकार फार काळ टीकणार नाही, असेही राणे म्हणाले.
दोन देशमुखांच्या भांडणात विकास खुंटला
सोलापूर शहराचा विकास करण्याचे बाजूला ठेऊन पालकमंत्री विजयकुमार देशमुख आणि सहकारमंत्री सुभाष देशमुख आपापसात भांडत आहेत. विकासकामांसाठी हे दोघे का भांडत नाहीत. सोलापूर शहराला त्यांनी काय दिले याचा जाब सोलापूरकर जनतेने त्यांना विचारावा असेही आमदार राणे यांनी सांगितले. सुभाष देशमुख यांच्या लोकमंगलच्या वाहनात सुमारे ९१ लाख रुपये सापडले त्याचे पुढे काहीही झाले नाही, उलट त्यांना क्लीनचिट दिली, असा आरोपही राणे यांनी केला.