सोलापूर : एसटी महामंडळाच्या कार्यालयात जाऊन विभाग नियंत्रकाला दमदाटी केल्याप्रकरणी सोलापूर भाजप जिल्हा अध्यक्षांसह सहाजणांविरुद्ध फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणी एसटीचे विभाग नियंत्रक विलास विठ्ठल राठोड यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन भाजपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख, गणेश भोसले, नितीन करजोळे, गीता पाटोळे, धनश्री खटके आणि सविता कस्तुरे अशा सहा जणांच्या विरोधात गुन्हा नोंद झाला आहे.
फिर्यादी विभाग नियंत्रक राठोड हे शुक्रवारी दुपारी तीनच्या सुमारास एसटी महामंडळाच्या कार्यालयात काम करीत असताना भाजप जिल्हा अध्यक्ष श्रीकांत देशमुख यांच्यासह सहाजण कार्यालयात आले. त्यांनी फिर्यादीस तुम्ही एसटी चालक- वाहकांच्या संपात सहभागी का होत नाही ? अशी विचारणा केली. त्यावेळी फिर्यादीने त्यांना शासनाकडून एसटी महामंडळ बंद ठेवण्याबाबत सूचना प्राप्त झाल्या नाहीत.
इतकंच नाहीतर संपामुळे नागरिकांना नाहक त्रास होत आहे. याची कल्पना दिली. तेव्हा चालक-वाहक यांना कामावर जा म्हणून जबरदस्ती का करता ? तसेच कर्मचाऱ्यांचे निलंबन मागे न घेतल्यास तुम्ही कसे काम करता तेच बघतो असे म्हणून दमदाटी करत फिर्यादीस तेथून जाण्यास अडथळा निर्माण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. यावेळी आरोपींच्या तोंडावर मास्क नव्हता तसेच सोशल डिस्टन्सिंगचे पालन केले नसल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. त्यामुळे या घटनेच्या निमित्ताने एसटी कामगारांच्या आंदोलनाला राजकीय रंग आला आहे.
एकीकडे सरकार मागण्या मान्य करण्यास तयार नाही तर दुसरीकडे राज्यात विरोधक असलेल्या भाजपने आयत्या असंतोषाला हवा देण्यासाठी जबरदस्तीचे राजकारण सुरु केले आहे. त्यामुळे भविष्यात हे आंदोलन आणखी चिघळण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. दरम्यान, भाजप पदाधिकाऱ्यांवर दाखल झालेल्या गुन्ह्याचा तपास एफसीचे पोलीस हवालदार पोळ हे करीत आहेत.
फिर्यादी विभाग नियंत्रक राठोड हे शुक्रवारी दुपारी तीनच्या सुमारास एसटी महामंडळाच्या कार्यालयात काम करीत असताना भाजप जिल्हा अध्यक्ष श्रीकांत देशमुख यांच्यासह सहाजण कार्यालयात आले. त्यांनी फिर्यादीस तुम्ही एसटी चालक- वाहकांच्या संपात सहभागी का होत नाही ? अशी विचारणा केली. त्यावेळी फिर्यादीने त्यांना शासनाकडून एसटी महामंडळ बंद ठेवण्याबाबत सूचना प्राप्त झाल्या नाहीत.
इतकंच नाहीतर संपामुळे नागरिकांना नाहक त्रास होत आहे. याची कल्पना दिली. तेव्हा चालक-वाहक यांना कामावर जा म्हणून जबरदस्ती का करता ? तसेच कर्मचाऱ्यांचे निलंबन मागे न घेतल्यास तुम्ही कसे काम करता तेच बघतो असे म्हणून दमदाटी करत फिर्यादीस तेथून जाण्यास अडथळा निर्माण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. यावेळी आरोपींच्या तोंडावर मास्क नव्हता तसेच सोशल डिस्टन्सिंगचे पालन केले नसल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. त्यामुळे या घटनेच्या निमित्ताने एसटी कामगारांच्या आंदोलनाला राजकीय रंग आला आहे.
एकीकडे सरकार मागण्या मान्य करण्यास तयार नाही तर दुसरीकडे राज्यात विरोधक असलेल्या भाजपने आयत्या असंतोषाला हवा देण्यासाठी जबरदस्तीचे राजकारण सुरु केले आहे. त्यामुळे भविष्यात हे आंदोलन आणखी चिघळण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. दरम्यान, भाजप पदाधिकाऱ्यांवर दाखल झालेल्या गुन्ह्याचा तपास एफसीचे पोलीस हवालदार पोळ हे करीत आहेत.