अ‍ॅपशहर

ऊस वाहतूक करणाऱ्यावाहनांची आरटीओकडून तपासणी

ऊसदरासाठी सुरू असलेले आंदोलन आता वेगळ्याच वळणावर पोहचले आहे. बुधवारी पंढरपूरमध्ये आंदोलनाच्या इतिहासात पहिल्यांदाच ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांची आरटीओकडून कडक तपासणी सुरू केल्याने रस्त्यावरील ऊस वाहतूक करणारी वाहने गायब झाली आहे.

Maharashtra Times 15 Nov 2017, 11:42 pm
म. टा. वृत्तसेवा, पंढरपूर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम sugarcane transporters vehicle inspection by rto
ऊस वाहतूक करणाऱ्यावाहनांची आरटीओकडून तपासणी

ऊसदरासाठी सुरू असलेले आंदोलन आता वेगळ्याच वळणावर पोहचले आहे. बुधवारी पंढरपूरमध्ये आंदोलनाच्या इतिहासात पहिल्यांदाच ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांची आरटीओकडून कडक तपासणी सुरू केल्याने रस्त्यावरील ऊस वाहतूक करणारी वाहने गायब झाली आहे.
साखर कारखानदार पोलिसांच्या मदतीने आंदोलन मोडून काढू लागल्याने आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेने देखील कायद्याची लढाई कायद्यानेच करण्यासाठी बेकायदा ऊस वाहतुकीबाबत आरटीओ विभागाला तक्रार केल्याने आरटीओ पथकाने ही तपासणी मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेनंतर आता साखर कारखानदारांचे धाबे दणाणले आहे. पहिल्याच दिवशी पंढरपूर तालुक्यातील सहकार शिरोमणी वसंतदादा सहकारी साखर कारखाना आणि विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या केन यार्डमध्ये जाऊन आरटीओ पथकाने ट्रॅक्टरचे कागदपत्रे, कायदेशीर पूर्तता आणि ओव्हरलोडची तपासणी केली. पहिल्याच कारखान्यावर हजर असलेल्या बहुतांश ट्रॅक्टर नियमात अपात्र ठरले. ओव्हरलोडमध्ये सापडल्याने त्यांना तातडीने कायदेशीर नोटीस बजावण्यात आल्या आहेत.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने यापूर्वी ऊस वाहतूक थांबविण्यासाठी अनेक प्रकारची आंदोलने हाती घेतली होती मात्र, कारखानदारांनी पोलिसांच्या मदतीने आंदोलकांची धरपकड सुरू केल्याने ऊसदर आंदोलन तुटण्याच्या मार्गावर असताना आता स्वाभिमानाने आरटीओ तपासणीचे नवीन कार्ड खेळून कारखानदारांना अडचणीत आणले आहे. ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर बाबत नियम अतिशय कडक असून, आजवर कधीच या नियमांवर कोणी बोट ठेवून तक्रार केली नव्हती. ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॉलीची नोंदणी आवश्यक असते. या ट्रॉलींना हायड्रॉलिक ब्रेक गरजेचे असतात. त्याला रिफ्लेक्टर असणे गरजेचे असते. नियमानुसार सर्वच ऊस वाहतूक करणारी वाहने ओव्हरलोड असल्याने आरटीओच्या प्रत्येक नियमात या वाहतूकदारांच्या अडचणी वाढू लागल्या आहेत. त्यामुळे तपासणी सुरू झाल्याची माहिती मिळताच सर्वच रस्त्यावरील ऊस वाहतूक करणारी वाहने गायब झाली आहेत. ज्या रस्त्यांनी रोज शेकडो उसाचे ट्रॅक्टर जात होत, त्या रस्त्यांवर शुकशुकाट आहे. स्वाभिमानाची ही मात्र लागू पडल्याने नाईलाजाने कारखानदारांना पहिला हप्ता जाहीर करावा लागणार आहे. सोलापूर आरटीओ कार्यालयाला दिलेल्या तक्रारीनुसार स्वाभिमानी आता हा फॉर्मुला राज्यभर वापरणार असून, अशी तपासणी मोहीम राज्यभर सुरू होण्याची शक्यता आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज