> सुनील दिवाण
पंढरपूर :
यंदाच्या आषाढी एकादशीला वारकऱ्यांना स्वच्छ मिनरल वॉटर पिण्यासाठी देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. आषाढीच्या इतिहासात पहिल्यांदाच असा प्रयोग केला जात असून समितीने १५ लाख लीटर मिनरल वॉटर आणि वितरण व्यवस्था उभी करण्याची तयारी केली आहे.
यात्राकाळात दूषित पाण्यामुळे शेकडो भाविकांना डायरिया गॅस्ट्रो सारख्या आजारांना सामोरे जावे लागते. येणाऱ्या भाविकांच्या वृद्धांची संख्या जास्त असल्याने अशा भाविकांना दूषित पाण्याचा मोठा त्रास सहन करावा लागतो. यात्राकाळात शहरात १२ ते १५ लाख भाविक येत असल्याने प्रशासनाकडून होत असलेली पाणीपुरवठा व्यवस्थेवर मोठा ताण येत असतो. यातून मार्ग काढण्यासाठी मंदिर समितीने काही संस्थांच्या मदतीने यंदा प्रथमच शुद्ध पाणी देण्याचा उपक्रम हाती घेतल्याने भाविकांना यंदा मिनरल वॉटर पिण्यास मिळणार आहे.
यासाठी दर्शनरांग, मंदिर परिसर, चंद्रभागा वाळवंट, भाविकांसाठी उभारलेले ६५ एकराचे निवासतळ यासह शहरातील महत्वाच्या ठिकाणी मिनरल वॉटर वितरणाची व्यवस्था समितीने करण्याचे नियोजन केल्याचे समितीचे अध्यक्ष अतुल भोसले यांनी सांगितले. याशिवाय यंदाही दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांचा विमा समितीकडून उतरविण्यात आला असून याचा भाविकांना दुर्घटनेच्या वेळी उपयोग होणार आहे . शहरातील १५ ठिकाणी समितीने मोठे LED स्क्रीन बसविण्याचा निर्णय घेतला असून यावर विठ्ठल गाभाऱ्यातील देवाचे दर्शन २४ तास थेट प्रक्षेपित केले जाणार असल्याचेही भोसले यांनी सांगितले. गेल्या आषाढी दशमीला मुख्यमंत्र्यांनी मंदिर समितीची घोषणा केली होती , यावर्षी नवीन समितीला काम करण्यासाठी ही पहिलीच यात्रा मिळाल्याने वारकऱ्यांना जास्तीत जास्त सोयी देण्याचा निर्णय समिती घेणार असल्याचे भोसले यांनी सांगितले .
पंढरपूर :
यंदाच्या आषाढी एकादशीला वारकऱ्यांना स्वच्छ मिनरल वॉटर पिण्यासाठी देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. आषाढीच्या इतिहासात पहिल्यांदाच असा प्रयोग केला जात असून समितीने १५ लाख लीटर मिनरल वॉटर आणि वितरण व्यवस्था उभी करण्याची तयारी केली आहे.
यात्राकाळात दूषित पाण्यामुळे शेकडो भाविकांना डायरिया गॅस्ट्रो सारख्या आजारांना सामोरे जावे लागते. येणाऱ्या भाविकांच्या वृद्धांची संख्या जास्त असल्याने अशा भाविकांना दूषित पाण्याचा मोठा त्रास सहन करावा लागतो. यात्राकाळात शहरात १२ ते १५ लाख भाविक येत असल्याने प्रशासनाकडून होत असलेली पाणीपुरवठा व्यवस्थेवर मोठा ताण येत असतो. यातून मार्ग काढण्यासाठी मंदिर समितीने काही संस्थांच्या मदतीने यंदा प्रथमच शुद्ध पाणी देण्याचा उपक्रम हाती घेतल्याने भाविकांना यंदा मिनरल वॉटर पिण्यास मिळणार आहे.
यासाठी दर्शनरांग, मंदिर परिसर, चंद्रभागा वाळवंट, भाविकांसाठी उभारलेले ६५ एकराचे निवासतळ यासह शहरातील महत्वाच्या ठिकाणी मिनरल वॉटर वितरणाची व्यवस्था समितीने करण्याचे नियोजन केल्याचे समितीचे अध्यक्ष अतुल भोसले यांनी सांगितले. याशिवाय यंदाही दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांचा विमा समितीकडून उतरविण्यात आला असून याचा भाविकांना दुर्घटनेच्या वेळी उपयोग होणार आहे . शहरातील १५ ठिकाणी समितीने मोठे LED स्क्रीन बसविण्याचा निर्णय घेतला असून यावर विठ्ठल गाभाऱ्यातील देवाचे दर्शन २४ तास थेट प्रक्षेपित केले जाणार असल्याचेही भोसले यांनी सांगितले. गेल्या आषाढी दशमीला मुख्यमंत्र्यांनी मंदिर समितीची घोषणा केली होती , यावर्षी नवीन समितीला काम करण्यासाठी ही पहिलीच यात्रा मिळाल्याने वारकऱ्यांना जास्तीत जास्त सोयी देण्याचा निर्णय समिती घेणार असल्याचे भोसले यांनी सांगितले .