सुनील दिवाण, सोलापूर
सोलापूर जिल्ह्यात सांगोला तालुक्यातील वाकीशिवणी येथे बंधाऱ्यात पडलेल्या तरुणांना वाचवण्यासाठी गेलेल्या तिघांचा बुडून मृत्यू झाला. आज दुपारी साडेतीनच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली.
जिल्ह्यात परतीच्या पावसाने थैमान घातले आहे. पावसामुळे सांगोला परिसरातील ओढे नाले दुथडी भरून वाहत आहेत. यावेळी राम चव्हाण, मुन्नाकुमार, आनंद ऐवळे आणि व्यंकटेश पवार हे तरुण पाण्यात पोहण्यासाठी उतरले. पण ते बुडू लागल्याचे पाहून महादेव कांबळे, सदाशिव कांबळे आणि खाजू चव्हाण यांनी त्यांना वाचवण्यासाठी पाण्यात उड्या मारल्या. मात्र त्यांना पाण्याच्या वेगाचा अंदाज आला नाही. पाण्यात तयार झालेल्या भोवऱ्यामुळे वाचवायला गेलेल्या तिघांचाही बुडून मृत्यू झाला. सदरची घटना गावकऱ्यांना समजताच त्यांनी बुडू लागलेल्या चारही तरुणांना बाहेर काढले. मात्र त्यांना वाचवायला गेलेल्या तिघांचे मृतदेहच हाती आल्याने गावावर शोककळा पसरली आहे. दरम्यान, तिघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी सांगोला येथे आणण्यात आलेत. तर वाचलेल्या चौघा तरुणांपैकी दोघांवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
सोलापूर जिल्ह्यात सांगोला तालुक्यातील वाकीशिवणी येथे बंधाऱ्यात पडलेल्या तरुणांना वाचवण्यासाठी गेलेल्या तिघांचा बुडून मृत्यू झाला. आज दुपारी साडेतीनच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली.
जिल्ह्यात परतीच्या पावसाने थैमान घातले आहे. पावसामुळे सांगोला परिसरातील ओढे नाले दुथडी भरून वाहत आहेत. यावेळी राम चव्हाण, मुन्नाकुमार, आनंद ऐवळे आणि व्यंकटेश पवार हे तरुण पाण्यात पोहण्यासाठी उतरले. पण ते बुडू लागल्याचे पाहून महादेव कांबळे, सदाशिव कांबळे आणि खाजू चव्हाण यांनी त्यांना वाचवण्यासाठी पाण्यात उड्या मारल्या. मात्र त्यांना पाण्याच्या वेगाचा अंदाज आला नाही. पाण्यात तयार झालेल्या भोवऱ्यामुळे वाचवायला गेलेल्या तिघांचाही बुडून मृत्यू झाला. सदरची घटना गावकऱ्यांना समजताच त्यांनी बुडू लागलेल्या चारही तरुणांना बाहेर काढले. मात्र त्यांना वाचवायला गेलेल्या तिघांचे मृतदेहच हाती आल्याने गावावर शोककळा पसरली आहे. दरम्यान, तिघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी सांगोला येथे आणण्यात आलेत. तर वाचलेल्या चौघा तरुणांपैकी दोघांवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.