अ‍ॅपशहर

‘उजनी’ने गाठला तळ

दुष्काळाचा सगळ्यात मोठा फटका उजनी धरण परिसरातील शेतकऱ्यांना बसू लागला आहे. ज्यांनी धरण उभारणीसाठी गावेच्या गावे आणि उभे संसार पाण्याखाली घालवले, त्यांनाही शेतातील उभे पिक जगविण्यासाठी धडपड करावी लागत आहे.

Maharashtra Times 29 Feb 2016, 3:00 am
म. टा. वृत्तसेवा, पंढरपूर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम ujanai dam
‘उजनी’ने गाठला तळ

दुष्काळाचा सगळ्यात मोठा फटका उजनी धरण परिसरातील शेतकऱ्यांना बसू लागला आहे. ज्यांनी धरण उभारणीसाठी गावेच्या गावे आणि उभे संसार पाण्याखाली घालवले, त्यांनाही शेतातील उभे पिक जगविण्यासाठी धडपड करावी लागत आहे. डोळ्या समोरून धरणातील पाणी लांब-लांब जाताना दिसते पण, धरणग्रस्त शेतकरी पाण्यासाठी तडफडत आहे.
सध्या धरणातील पाणी मोठ्या प्रमाणावर पिण्याच्या सोलापूर शहर आणि परिसरासाठी सोडल्यामुळे धरणाने तळ गाठला आहे. जलाशयातील पाणीसाठा कमालीचा खालावल्याने या हजारो शेतकऱ्यांना आपली पिके वाचविण्यासाठी आता चर खोदून डबके तयार करून त्यात साचलेले पाणी उपसा करावा लागत आहे. हे चित्र सध्या इंदापूर तालुक्यातील अनेक जलाशया शेजारील गावांत दिसत आहे. एका लहान डपक्यामधून शेकडो मोटारींने पाणी उचलेले जात आहे. ज्यांना पाणीच नाही त्यांचे दुःख वेगळे, मात्र ज्यांच्या डोळ्यासमोर कायम पाण्याचा अथांग जलाशय बघायची सवय आहे, त्यांना रोज झपाट्याने कमी होत चाललेले पाणी पाहून वर्षभराचे मांडलेले गणित डोळ्यासमोर उधळताना दिसत आहेत. या पाण्याच्या जीवावर शेतातील पिकासाठी काढलेली लाखोंची कर्जे आता भूत बनून मानगुटीवर बसली आहेत.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज