अ‍ॅपशहर

उजनीच्या पोटातील आठवणींना उजाळा

उजनी धरणाची पाणीपातळी झपाट्याने कमी होत आहे. पाणीपातळी जशी कमी होईल. तसे धरणाच्या पाण्यात लुप्त झालेल्या वास्तूंचे एक-एक अवशेष उघड होत आहेत. धरणामुळे विस्थापित झालेले ग्रामस्थ आपल्या आठवणींना उजाळा देण्यासाठी धरणावर गर्दी करू लागले आहेत. ग्रामस्थांसह इतिहास, भूगोलाचे अभ्यासक, विद्यार्थी, हौशी पर्यटक आणि पक्षीनिरीक्षकांची उजनीकडे रीघ लागली आहे.

Maharashtra Times 10 May 2016, 9:21 am
म. टा. वृत्तसेवा, सोलापूर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम ujani dam
उजनीच्या पोटातील आठवणींना उजाळा


उजनी धरणाची पाणीपातळी झपाट्याने कमी होत आहे. पाणीपातळी जशी कमी होईल. तसे धरणाच्या पाण्यात लुप्त झालेल्या वास्तूंचे एक-एक अवशेष उघड होत आहेत. धरणामुळे विस्थापित झालेले ग्रामस्थ आपल्या आठवणींना उजाळा देण्यासाठी धरणावर गर्दी करू लागले आहेत. ग्रामस्थांसह इतिहास, भूगोलाचे अभ्यासक, विद्यार्थी, हौशी पर्यटक आणि पक्षीनिरीक्षकांची उजनीकडे रीघ लागली आहे.

उजनी धरणाच्या बांधकामावेळी तालुक्यातील पूर्वीच्या २९ गावांना विस्थापित व्हावे लागले होते. त्यावेळी सदर गावातील नागरिकांनी शक्य असेल ते साहित्य आपल्या पुनर्वसनासाठी दिलेल्या जागेत नेले होते. त्यावेळी प्रामुख्याने घरांचा मूळ साचा जागेवरच राहिला होता. शिवाय गावातील सार्वजानिक इमारती तशाच पडून होत्या. मंदिरांमधील मूर्ती नव्या जागेत गेल्या मात्र, मंदिरे तशीच जागेवर पडून होते.



आता पाणी कमी झाल्यानंतर घरे, मंदिरे जैसे थे अवस्थेत पुन्हा दिसू लागली आहेत. वांगी परिसरातील पाण्यात बुडालेल्या श्री शारदाभवानी मातेच्या पुरातन मंदिराचे दर्शन होऊ लागले आहे. कुगाव परिसरातील जुने वाडे पाण्याबाहेर दिसू लागले आहेत. तरप पोमलवाडी परिरात जुन्या ब्रिटिश रेल्वे पुलाचा वरील भाग नरजेस पडू लागला आहे. याशिवाय पाण्याखाली गेलेली लक्ष्मी, खंडोबा, नागनाथ देवाची मंदिरेही पाण्याबाहेर डोकावू लागली आहेत. इंदापूर (जि. पुणे) येथील पळसदेवचे श्री पळसनाथाचे प्राचीन मंदिरही पाण्याबाहेर पडले आहे.



धरणाच्या पोटात गायब झालेल्या वास्तूंचे दर्शन होऊ लागल्याने पुनर्वसित भागातील नागरिकांच्या जुन्या आठवणी ताज्या होताना दिसत आहेत. हे नागरिक त्या ठिकाणांना भेटी देऊ लागले आहेत. हौशी पर्यटक मोठ्या उत्सुकतेने धरणात बुडालेली घरे, मंदिरे, पूल आदी पाहण्यासाठी येऊ लागले आहेत. सदर स्थळे पाण्याखाली बुडून साधारणत: चार दशके उलटून गेली आहेत. तरीही वाडे व मंदिरांचे बहुतेक अवशेष अद्यापही मजबूत अवस्थेत आहेत. या वास्तूंच्या बांधणीचा अभ्यास करण्यासाठी इतिहास, भूगोल, विषयाचे अभ्यासकही गर्दी करू लागले आहेत. पाणथळ भागात पक्षी गर्दी करीत असल्याने पक्षी निरीक्षकही मोठ्या संख्येने उजनीला भेट देत आहेत.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज