सोलापूर : सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी म्हणून ओळख असलेल्या उजनी जलाशयाची पाणीपातळी घटण्याचा वेग वाढला असून, पाणीपातळी ८. ०४ टक्के इतकी उरली आहे. जलाशयातील पाणीसाठा झपाट्याने खालावत असताना जलाशयकाठे पोटाच्या भागाकडे सरकत आहे. परिणामी विस्तीर्ण असा भूभाग उघडा पडत आहे. याशिवाय पाण्यासाठी खोदल्या गेलेल्या चाऱ्याही उघड्या पडल्याचे दृश्य दिसून येत आहे. उजनी हाऊसफुल्ल झाल्यानंतरच्या काळात पिण्यासह शेती व उद्योगधंद्यासाठी पाण्याचा वापर होऊन गेल्या साडेआठ महिन्याच्या काळात उजनीचे पाणी खालावत गेले. गेल्या मंगळवारी जलाशयात १४. ७९ टक्के पाणीसाठा होता. तो ८. ४ टक्क्यांवर आला असून, येत्या आठवड्याच्या काळात उजनीचे पाणी पातळी शून्य टक्केवर येणार, हे स्पष्टपणे दिसून येत आहे.
उजनी धरणाचा पाणीसाठा खालावला
सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी म्हणून ओळख असलेल्या उजनी जलाशयाची पाणीपातळी घटण्याचा वेग वाढला असून, पाणीपातळी ८ ०४ टक्के इतकी उरली आहे...
Maharashtra Times 18 May 2018, 4:00 am