म. टा. वृत्तसेवा, सोलापूर
झाड लावणे नुसते फार्स ठरू नये, अन्यथा भविष्यात ऑक्सिजनच्या मोठ्या टाक्यांची गरज भासेल. निसर्ग बोलतो आहे लक्ष द्या, अन्यथा परिस्थिती बदलेल, असे मत नाम फाउंडेशनचे मकरंद अनासपुरे यांनी व्यक्त केले. नवव्या वसुधंरा महोत्सवाला बुधवारपासून प्रारंभ झाला. महोत्सवाचे उद्घाटन नाम फाउंडेशनचे प्रमुख प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांच्या हस्ते सोलापूर विद्यापीठात झाले.
अनासपुरे म्हणाले, ‘आज आपण ज्या अवस्थेत आहोत, ती अवस्था भयानक आहे. आपण नेमका कशाचा विकास करीत आहोत, याचा आपणच विचार करायला हवा. जमिनीप्रमाणे माणसाच्या डोळ्यातील पाणीसुद्धा आटत आहे.’
किर्लोस्कर आणि वसुंधरा क्लबच्या पुढाकाराने होणारा हा महोत्सव सोलापूर विद्यापीठ डब्ल्यू आयटी इंजिनिअरिंग, व्ही. व्ही. पी. इंजिनिअरिंग आणि संगमेश्वर कॉलेज यांच्या सहयोगाने होत आहे. या वेळी सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एन. एन. मालदार यांच्या हस्ते मकरंद अनासपुरे यांना विद्यापीठाच्या सिनेटवर घेण्यासंदर्भातील नामनिर्देशन भरून घेऊन त्यावर स्वाक्षरी घेण्यात आली. राज्यपालांकडे हे नामनिर्देशन सादर करण्यात येणार आहे.
या वेळी महापौर शोभा बनशेट्टी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
१७ रोजी हत्तरसंग कुडल येथे वसुंधरा मित्र पुरस्काराचे वितरण होणार आहे. याच दिवशी सायंकाळी फडकुले सभागृहात नदी वाहते, या चित्रपटाचे प्रदर्शन होणार आहे. १८ ऑगस्टमध्ये संगमेश्वर कॉलेजमध्ये प्रश्नमंजुषा कार्यक्रम, १९ रोजी विविध महाविद्यालयात पथनाट्य स्पर्धा होणार आहेत. डब्ल्यूआयटीमध्ये जिल्ह्यातील साखर कारखान्यांद्वारे पर्यावरण पूरक कारखाना याचे सादरीकरण होणार आहे.
झाड लावणे नुसते फार्स ठरू नये, अन्यथा भविष्यात ऑक्सिजनच्या मोठ्या टाक्यांची गरज भासेल. निसर्ग बोलतो आहे लक्ष द्या, अन्यथा परिस्थिती बदलेल, असे मत नाम फाउंडेशनचे मकरंद अनासपुरे यांनी व्यक्त केले. नवव्या वसुधंरा महोत्सवाला बुधवारपासून प्रारंभ झाला. महोत्सवाचे उद्घाटन नाम फाउंडेशनचे प्रमुख प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांच्या हस्ते सोलापूर विद्यापीठात झाले.
अनासपुरे म्हणाले, ‘आज आपण ज्या अवस्थेत आहोत, ती अवस्था भयानक आहे. आपण नेमका कशाचा विकास करीत आहोत, याचा आपणच विचार करायला हवा. जमिनीप्रमाणे माणसाच्या डोळ्यातील पाणीसुद्धा आटत आहे.’
किर्लोस्कर आणि वसुंधरा क्लबच्या पुढाकाराने होणारा हा महोत्सव सोलापूर विद्यापीठ डब्ल्यू आयटी इंजिनिअरिंग, व्ही. व्ही. पी. इंजिनिअरिंग आणि संगमेश्वर कॉलेज यांच्या सहयोगाने होत आहे. या वेळी सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एन. एन. मालदार यांच्या हस्ते मकरंद अनासपुरे यांना विद्यापीठाच्या सिनेटवर घेण्यासंदर्भातील नामनिर्देशन भरून घेऊन त्यावर स्वाक्षरी घेण्यात आली. राज्यपालांकडे हे नामनिर्देशन सादर करण्यात येणार आहे.
या वेळी महापौर शोभा बनशेट्टी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
१७ रोजी हत्तरसंग कुडल येथे वसुंधरा मित्र पुरस्काराचे वितरण होणार आहे. याच दिवशी सायंकाळी फडकुले सभागृहात नदी वाहते, या चित्रपटाचे प्रदर्शन होणार आहे. १८ ऑगस्टमध्ये संगमेश्वर कॉलेजमध्ये प्रश्नमंजुषा कार्यक्रम, १९ रोजी विविध महाविद्यालयात पथनाट्य स्पर्धा होणार आहेत. डब्ल्यूआयटीमध्ये जिल्ह्यातील साखर कारखान्यांद्वारे पर्यावरण पूरक कारखाना याचे सादरीकरण होणार आहे.