पंढरपूर :
गावातील बोअरवेलमधून विहीरीत पाणी देण्याऐवजी ग्रामपंचायत सदस्याने त्याचा खाजगी वापर सुरु केल्याचा निषेध करण्यासाठी पंढरपूर तालुक्यातील उंबरगावचे गावकरी दोन दिवसांपासून चक्क विहिरीतच आमरण उपोषणाला बसले आहेत.
उंबरगाव ग्रामपंचायतीने गावकऱ्यांच्या पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी म्हणून एक बोअर खणली होती. या बोअरमधून गावाच्या विहीरीत पाणी सोडून गावाला पाणीपुरवठा केला जात होता . मात्र गावातील एका ग्रामपंचायत सदस्याने या बोअरला कुलूप ठोकलं. बोअरचा खाजगी वापर त्यानेसुरू केला. यामुळे गावाला मिळणारं पाणी बंद झालं असा गावकऱ्यांचा आरोप आहे. याचा विरोध करण्यासाठी ग्रामस्थांनी गावातील खोल विहिरीत आमरण उपोषण सुरु केलंय.या उपोषणाला दोन दिवस झाले तरी प्रशासन मात्र अजूनही झोपलेलंच आहे. प्रशासन लक्ष देत नाही आणि ग्राम सदस्यावर कारवाई होत नाही म्हणून गावकरी संतप्त झाले आहेत.
गावातील बोअरवेलमधून विहीरीत पाणी देण्याऐवजी ग्रामपंचायत सदस्याने त्याचा खाजगी वापर सुरु केल्याचा निषेध करण्यासाठी पंढरपूर तालुक्यातील उंबरगावचे गावकरी दोन दिवसांपासून चक्क विहिरीतच आमरण उपोषणाला बसले आहेत.
उंबरगाव ग्रामपंचायतीने गावकऱ्यांच्या पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी म्हणून एक बोअर खणली होती. या बोअरमधून गावाच्या विहीरीत पाणी सोडून गावाला पाणीपुरवठा केला जात होता . मात्र गावातील एका ग्रामपंचायत सदस्याने या बोअरला कुलूप ठोकलं. बोअरचा खाजगी वापर त्यानेसुरू केला. यामुळे गावाला मिळणारं पाणी बंद झालं असा गावकऱ्यांचा आरोप आहे. याचा विरोध करण्यासाठी ग्रामस्थांनी गावातील खोल विहिरीत आमरण उपोषण सुरु केलंय.या उपोषणाला दोन दिवस झाले तरी प्रशासन मात्र अजूनही झोपलेलंच आहे. प्रशासन लक्ष देत नाही आणि ग्राम सदस्यावर कारवाई होत नाही म्हणून गावकरी संतप्त झाले आहेत.