सोलापूर:
वडार समाज आज हलाखीचं जीवन जगत आहे. या वडार समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न निकाली काढणार आहे, असं जाहीर आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापुरातील समाजाच्या मेळाव्यात दिलं. समाजाच्या वस्त्यांची जागा त्यांच्याच मालकीची होणार, अशी घोषणाही त्यांनी केली.
सोलापुरात आज वडार समाजाचा मेळावा पार पडला. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवलेही उपस्थित होते. फडणवीस यांनी यावेळी वडार समाजाच्या आरक्षणाबाबत मोठी घोषणा केली. वडार समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न निकाली काढू, असं ते म्हणाले. पंढरीच्या विठुरायाचा रथ वडार समाजाशिवाय पुढे जाऊ शकत नाही, तर महाराष्ट्राच्या विकासाचा रथही वडार समाजाशिवाय कसा पुढे जाईल? असं म्हणत हे सरकार या समाजाच्या पाठिशी कायम उभं आहे, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
गेल्या ७० वर्षांपासून हा समाज विविध समस्यांचा सामना करतोय. त्यांच्या वेदना आणि दुःख दूर करणं आमचं कर्तव्य आहे. इदाते समितीच्या अहवालावर शिक्कामोर्तब झालं तर त्यांच्या आरक्षणाचा प्रश्न सुटेल. त्यासाठी प्रयत्न करा, अशी विनंती फडणवीस यांनी आठवलेंना केली. वडार समाजाच्या उन्नतीसाठी आपण सर्व जण प्रयत्न करू, असं सांगून बेघरांना घरे देणार असून वस्त्यांची जागा त्यांच्या मालकीची होईल अशी व्यवस्था निर्माण करू, असा शब्दही त्यांनी यावेळी दिला. वडार समाजाच्या व्यवसायासाठी १०० कोटी रुपये देणार आहे. समाज आणि सरकार यांच्यात व्यवस्था उभी राहिली पाहिजे. त्यामार्फत सरकारचे निर्णय या समाजापर्यंत पोहोचले पाहिजेत. यासाठी महाराष्ट्र समन्वय समितीची घोषणा करत असून विजय चौगुले यांना अध्यक्ष समितीचे अध्यक्ष करतो. तसंच त्यांना राज्यमंत्रीपद दिलं जाईल, असंही त्यांनी जाहीर केलं.
वडार समाज आज हलाखीचं जीवन जगत आहे. या वडार समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न निकाली काढणार आहे, असं जाहीर आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापुरातील समाजाच्या मेळाव्यात दिलं. समाजाच्या वस्त्यांची जागा त्यांच्याच मालकीची होणार, अशी घोषणाही त्यांनी केली.
सोलापुरात आज वडार समाजाचा मेळावा पार पडला. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवलेही उपस्थित होते. फडणवीस यांनी यावेळी वडार समाजाच्या आरक्षणाबाबत मोठी घोषणा केली. वडार समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न निकाली काढू, असं ते म्हणाले. पंढरीच्या विठुरायाचा रथ वडार समाजाशिवाय पुढे जाऊ शकत नाही, तर महाराष्ट्राच्या विकासाचा रथही वडार समाजाशिवाय कसा पुढे जाईल? असं म्हणत हे सरकार या समाजाच्या पाठिशी कायम उभं आहे, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
गेल्या ७० वर्षांपासून हा समाज विविध समस्यांचा सामना करतोय. त्यांच्या वेदना आणि दुःख दूर करणं आमचं कर्तव्य आहे. इदाते समितीच्या अहवालावर शिक्कामोर्तब झालं तर त्यांच्या आरक्षणाचा प्रश्न सुटेल. त्यासाठी प्रयत्न करा, अशी विनंती फडणवीस यांनी आठवलेंना केली. वडार समाजाच्या उन्नतीसाठी आपण सर्व जण प्रयत्न करू, असं सांगून बेघरांना घरे देणार असून वस्त्यांची जागा त्यांच्या मालकीची होईल अशी व्यवस्था निर्माण करू, असा शब्दही त्यांनी यावेळी दिला. वडार समाजाच्या व्यवसायासाठी १०० कोटी रुपये देणार आहे. समाज आणि सरकार यांच्यात व्यवस्था उभी राहिली पाहिजे. त्यामार्फत सरकारचे निर्णय या समाजापर्यंत पोहोचले पाहिजेत. यासाठी महाराष्ट्र समन्वय समितीची घोषणा करत असून विजय चौगुले यांना अध्यक्ष समितीचे अध्यक्ष करतो. तसंच त्यांना राज्यमंत्रीपद दिलं जाईल, असंही त्यांनी जाहीर केलं.