सोलापूर: राज्यात अतिरिक्त ऊसाचा प्रश्न जितका गंभीर झालाय, त्यापेक्षाही वाईट अवस्था द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची झालीये. कारण, बदलत्या हवामानामुळे द्राक्षं विक्रीसाठी मार्केटपर्यंत पोहचत नसल्याने व्यापाऱ्यांनी द्राक्ष खरेदीला नकार दिलाय. त्यामुळे शेतात पीक उभं असताना द्राक्ष उत्पादकांचे लाखो रुपये पाण्यात गेले आहेत. त्यामुळे वैफल्यग्रस्त शेतकऱ्यांनी आता द्राक्षं पिकांसह उभ्या बागांची छाटणी करायला सुरुवात केलीय. हेही वाचा - शेतकऱ्यांचे आर्थिक बळकटीकरण करण्याचा ठाकरे सरकारचा प्रयत्न : अजित पवार
ऊसाच्या तुलनेत द्राक्ष बागेला कलम, रोप फाऊंडेशन, खतं, फवारण्या आणि मजुरीचा मोठा खर्च आहे. एप्रिल ते ऑक्टोबर असा बहर धरला. तर, एकरी किमान ३ लाख ते कमाल ४ लाख रुपयांपर्यंत खर्च येतो. इतक्या मोठ्या प्रमाणात खर्च करुन बागा आणल्या आणि पीक ऐन बहरात असताना हवामान बदलामुळे मार्केट पडले आहे.
मुख्य मार्केट असलेल्या कोलकाता आणि दक्षिण भारतातील व्यापाऱ्यांनी या द्राक्षांची खरेदी करायला नकार दिलाय. बदलत्या हवामानामुळे खरेदी केलेली द्राक्षे बाजारात पोहचतील का नाही याची शास्वती नसल्याने खरेदीदार द्राक्ष खरेदीला धजावत नसून शेतकरी मात्र पूर्णतः हतबल झाला आहे. शेतात उभ्या द्राक्षांचं काय करायचं असा यक्ष प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला आहे.
हेही वाचा -लॉकडाउन नंतर केळीला उन्हाचा फटका, शेतकऱ्यांना उत्पादनात घट होण्याची भीती
सोलापूर जिल्ह्यात सांगोला, पंढरपूर, मोहोळ आणि दक्षिण-उत्तर सोलापूर तालुक्यातील शेतकऱ्यांची मोठी आर्थिक कोंडी झालीये. शेवटी उद्विग्न मानसिकतेतून या द्राक्ष उत्पादकांनी घडासह बागा छाटायला सुरुवात केलीये. गेली काही वर्षे द्राक्ष बागायतदार म्हणून केलेली मिजास आता मातीमोल ठरलीये.
"द्राक्षांत पल्प तयार होण्यासाठी चांगली थंडी लागते. ती यावर्षी पडली नाही. पुन्हा ढगाळ वातावरणामुळे स्प्रेची संख्या वाढली. एवढं करुनही उत्पादित द्राक्षं कोलकाता किंवा दक्षिण भारतातील जाईपर्यंत खराब होत आहेत. त्यामुळे या शेतकऱ्यांची संपूर्ण भिस्त असलेलं मार्केट कोलमडल्यामुळे द्राक्षांचे दरही गडगडले आहेत, त्यामुळे आता द्राक्ष बागायतदार ही बिरुदावली आता संपलीय", अशी प्रतिक्रिया द्राक्ष उत्पादक तज्ञ मोहोळ तालुक्यातील कामतीच्या रामराव भोसले यांनी व्यक्त केलीये.
ऊसाच्या तुलनेत द्राक्ष बागेला कलम, रोप फाऊंडेशन, खतं, फवारण्या आणि मजुरीचा मोठा खर्च आहे. एप्रिल ते ऑक्टोबर असा बहर धरला. तर, एकरी किमान ३ लाख ते कमाल ४ लाख रुपयांपर्यंत खर्च येतो. इतक्या मोठ्या प्रमाणात खर्च करुन बागा आणल्या आणि पीक ऐन बहरात असताना हवामान बदलामुळे मार्केट पडले आहे.
मुख्य मार्केट असलेल्या कोलकाता आणि दक्षिण भारतातील व्यापाऱ्यांनी या द्राक्षांची खरेदी करायला नकार दिलाय. बदलत्या हवामानामुळे खरेदी केलेली द्राक्षे बाजारात पोहचतील का नाही याची शास्वती नसल्याने खरेदीदार द्राक्ष खरेदीला धजावत नसून शेतकरी मात्र पूर्णतः हतबल झाला आहे. शेतात उभ्या द्राक्षांचं काय करायचं असा यक्ष प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला आहे.
हेही वाचा -लॉकडाउन नंतर केळीला उन्हाचा फटका, शेतकऱ्यांना उत्पादनात घट होण्याची भीती
सोलापूर जिल्ह्यात सांगोला, पंढरपूर, मोहोळ आणि दक्षिण-उत्तर सोलापूर तालुक्यातील शेतकऱ्यांची मोठी आर्थिक कोंडी झालीये. शेवटी उद्विग्न मानसिकतेतून या द्राक्ष उत्पादकांनी घडासह बागा छाटायला सुरुवात केलीये. गेली काही वर्षे द्राक्ष बागायतदार म्हणून केलेली मिजास आता मातीमोल ठरलीये.
"द्राक्षांत पल्प तयार होण्यासाठी चांगली थंडी लागते. ती यावर्षी पडली नाही. पुन्हा ढगाळ वातावरणामुळे स्प्रेची संख्या वाढली. एवढं करुनही उत्पादित द्राक्षं कोलकाता किंवा दक्षिण भारतातील जाईपर्यंत खराब होत आहेत. त्यामुळे या शेतकऱ्यांची संपूर्ण भिस्त असलेलं मार्केट कोलमडल्यामुळे द्राक्षांचे दरही गडगडले आहेत, त्यामुळे आता द्राक्ष बागायतदार ही बिरुदावली आता संपलीय", अशी प्रतिक्रिया द्राक्ष उत्पादक तज्ञ मोहोळ तालुक्यातील कामतीच्या रामराव भोसले यांनी व्यक्त केलीये.