अ‍ॅपशहर

माजी सैनिक कुटुंबीयांचे ११ अर्ज

म टा वृत्तसेवा, पालघरपालघर जिल्ह्यातील सर्व माजी सैनिक, विधवा आणि युद्ध विधवा यांच्या समस्या सोडविण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ...

Maharashtra Times 20 Jul 2018, 4:00 am

म. टा. वृत्तसेवा, पालघर

पालघर जिल्ह्यातील सर्व माजी सैनिक, विधवा आणि युद्ध विधवा यांच्या समस्या सोडविण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी पुढाकार घेऊन आयोजित केलेल्या बैठकीला माजी सैनिकांच्या ११ कुटुंबांनी अर्ज दाखल केले.

गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी माजी सैनिकांच्या कुटुंबीयांशी संवाद साधून त्यांच्या समस्या सोडविण्याबाबत दिलासा दिला. पालघर जिल्ह्यात माजी सैनिकांच्या कुटुंबीयांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीत सर्व संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. गुरुवारी प्राप्त झालेल्या अर्जांवर योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे यांनी संबंधितांना दिले आहेत. या अर्जांवरील कार्यवाहीचा आढावा घेण्यासाठी २० दिवसांनंतर पुन्हा बैठक आयोजित करण्यात येणार असून त्या बैठकीस माजी सैनिकांच्या कुटुंबीयांनाही बोलावण्यात आले असल्याची माहिती तहसीलदार उज्ज्वला भगत यांनी दिली.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज