म. टा. विशेष प्रतिनिधी, ठाणे
ठाणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी शुक्रवारी अर्ज भरल्यानंतर शनिवारी त्या अर्जांची छाननी झाली. त्यात १३१ जागांसाठी तब्बल १११९ उमेदवारांची अर्ज पात्र ठरले आहेत. ७ फेब्रुवारी ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख असून त्यानंतर किती उमेदवारा निवडणुकीच्या रिंगणात असतील, हे स्पष्ट होणार आहे.
पालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत २७ जानेवारी ते ३ फेब्रुवारी अशी होती. पहिल्या सात दिवसांत फक्त ९८ अर्ज जाखल झाले होते. मात्र, शुक्रवारी शेवटच्या दिवशी बारा विभागीय कार्यालयांमध्ये तब्बल १ हजार ४४ अर्जांचा पाऊस पडला. शिवसेना, भाजप, मनसे, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे जवळपास ४९८ उमेदवार रिंगणात असून उर्वरित उमेदवार हे अपक्ष किंवा अन्य छोट्या पक्षांचे आहेत. त्यात मोठ्या प्रमाणात बंडखोरांचाही समावेश आहे.
प्रभाग क्रमांक २२ मध्ये चार जागांसाठी सर्वाधिक ५३ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. त्याखालोखाल प्रभाग क्रमांक ३ मध्ये ५१ तर प्रभाग क्रमांक २६ मध्ये ४४ अर्ज दाखल झाले आहेत. एका प्रभागातून चार नगरसेवकांची निवड होणार असून प्रत्येक जागेसाठी सरासरी पाचपेक्षा जास्त उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत.
ठाणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी शुक्रवारी अर्ज भरल्यानंतर शनिवारी त्या अर्जांची छाननी झाली. त्यात १३१ जागांसाठी तब्बल १११९ उमेदवारांची अर्ज पात्र ठरले आहेत. ७ फेब्रुवारी ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख असून त्यानंतर किती उमेदवारा निवडणुकीच्या रिंगणात असतील, हे स्पष्ट होणार आहे.
पालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत २७ जानेवारी ते ३ फेब्रुवारी अशी होती. पहिल्या सात दिवसांत फक्त ९८ अर्ज जाखल झाले होते. मात्र, शुक्रवारी शेवटच्या दिवशी बारा विभागीय कार्यालयांमध्ये तब्बल १ हजार ४४ अर्जांचा पाऊस पडला. शिवसेना, भाजप, मनसे, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे जवळपास ४९८ उमेदवार रिंगणात असून उर्वरित उमेदवार हे अपक्ष किंवा अन्य छोट्या पक्षांचे आहेत. त्यात मोठ्या प्रमाणात बंडखोरांचाही समावेश आहे.
प्रभाग क्रमांक २२ मध्ये चार जागांसाठी सर्वाधिक ५३ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. त्याखालोखाल प्रभाग क्रमांक ३ मध्ये ५१ तर प्रभाग क्रमांक २६ मध्ये ४४ अर्ज दाखल झाले आहेत. एका प्रभागातून चार नगरसेवकांची निवड होणार असून प्रत्येक जागेसाठी सरासरी पाचपेक्षा जास्त उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत.