अ‍ॅपशहर

तीन रिक्षा चोरीस

कल्याण-डोंबिवलीमध्ये दोन विविध ठिकाणांवरून तीन रिक्षा चोरीस गेल्याच्या घटना घडल्या.

Maharashtra Times 24 Jul 2017, 3:00 am
कल्याण : कल्याण-डोंबिवलीमध्ये दोन विविध ठिकाणांवरून तीन रिक्षा चोरीस गेल्याच्या घटना घडल्या.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 3 rikshaw theft in kalyan dombivali
तीन रिक्षा चोरीस


कल्याण पश्चिमेकडील काळा तलावाजवळील पवार चाळीत राहणारे रघुनाथ पवार यांच्या मालकीच्या दोन रिक्षा आहेत. शनिवारी रात्री त्यांनी दोन्ही रिक्षा घरासमोरील जागेत उभ्या केल्या. सकाळी त्या जागेवर नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. आजूबाजूला शोध घेऊनही रिक्षा न सापडल्याने त्यांनी या प्रकरणी बाजारपेठ पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली. या तक्रारीनुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दुसरी घटना डोंबिवली पूर्वेकडील ज्योती नगर झोपडपट्टी परिसरात घडली. या परिसरात राहणारे भटु पाटील हे १९ जुलैला आपली रिक्षा घेऊन के. बी. विरा शाळेसमोरून जात असताना त्यांनी शौचालयानाजीक रिक्षा उभी केली. शौचालयातून परत आल्यानंतर रिक्षा तेथे नसल्याचे दिसल्याने त्यांच्या निदर्शनास आले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज