म. टा. वृत्तसेवा, उल्हासनगरः गेल्या महिन्यांत उल्हासनगर शहरात धोकादायक यादीत नसलेल्या पाच मजल्यांच्या दोन इमारती १५ दिवसांच्या अंतराने कोसळून १२ रहिवाशांचे प्राण गेले होते. यानंतर खडबडून जागे झालेल्या महापालिकेने युद्धपातळीवर शहरातील चारही प्रभागांतील १९९४ ते १९९८ या काळात बांधल्या गेलेल्या इमारतींचे सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला होता. या सर्वेक्षणातून शहरात एकूण ५५० इमारतींचा शोध लावण्यात या पथकांना यश आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे प्रभाग चारमध्ये सर्वाधिक १६० इमारती असल्याचे सर्वेक्षणात समोर आले आहे. या सर्व इमारतींची बांधकाम तपासणी करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत.
अनधिकृत आणि धोकादायक इमारतींचे शहर म्हणून १९९० ते १९९५च्या काळात उल्हासनगर शहराची ओळख निर्माण झाली होती. त्यात सुरक्षिततेचे सर्व नियम धाब्यावर बसवत यातील शेकडो इमारती उभारताना उलवा या निकृष्ट दर्जाच्या रेतीचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात आला होता. त्यामुळे त्या काळात महापालिकेकडून कारवाई झालेल्या अनेक अनधिकृत इमारती, बांधकाम व्यावसायिकांनी प्रशासनालाच हाताशी धरून पुन्हा स्लॅब जोडून रहिवाशांना वापरण्यास दिल्या होत्या. मात्र, गेल्या काही वर्षांपासून या इमारती रहिवाशांसाठी मृत्यूचे सापळे ठरत आहेत. अपघातांची ही साखळी शहरात सुरूच असून मे महिन्यात मोहिनी पॅलेस आणि साई शक्ती या दोन इमारतींचा स्लॅब कोसळून १२ नागरिकांचा मृत्यू झाला होता. या घटनानंतर पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी महापालिकेला तत्काळ शहरातील त्या काळात उभारलेल्या आणि कारवाई झालेल्या इमारतींचे सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले होते. यासाठी महापालिकेने चारही प्रभागांसाठी समिती तयार करून यात अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त, सहायक आयुक्त, पाणीपुरवठा आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता तसेच कनिष्ठ अभियंत्यांचा समावेश केला होता. या समितीला दिलेल्या सात दिवसांच्या मुदतीतून समोर आलेल्या सर्वेक्षणात शहरात एकूण ५५० इमारती आढळून आल्या आहेत.
प्रभाग इमारती
प्रभाग समिती एक ९४
प्रभाग समिती दोन १३३
प्रभाग समिती तीनमध्ये ११८
प्रभाग समिती चार १६०
याबाबतची यादी महापालिकेने www.umc.gov.in या संकेतस्थळावर पाहता येईल
अनेक इमारतींचा स्लॅब पाडण्यात आला आहे. तसेच हा सर्वेक्षणाच्या पहिल्या टप्प्यातील यादी जाहीर करण्यात आली असून, हे सर्वेक्षण पुढेही सुरू राहणार आहे.
डॉ. युवराज भदाणे, माहिती जनसंपर्क अधिकारी
पालिकेनेच तपासणी करण्याची मागणी
महापालिकेने इमारतींचे सर्वेक्षण पूर्ण करत बांधकाम तपासणी करण्याचे आदेश दिले असले तरी रहिवासी संघटना आणि लोकप्रतिनिधींनी मात्र पालिकेनेच तज्ज्ञ संरचनात्मक अभियंत्यांकडून ही तपासणी करण्याची मागणी केली आहे. यावर महापालिकेने मात्र अद्याप कुठलाही निर्णय घेतला नाही.
अनधिकृत आणि धोकादायक इमारतींचे शहर म्हणून १९९० ते १९९५च्या काळात उल्हासनगर शहराची ओळख निर्माण झाली होती. त्यात सुरक्षिततेचे सर्व नियम धाब्यावर बसवत यातील शेकडो इमारती उभारताना उलवा या निकृष्ट दर्जाच्या रेतीचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात आला होता. त्यामुळे त्या काळात महापालिकेकडून कारवाई झालेल्या अनेक अनधिकृत इमारती, बांधकाम व्यावसायिकांनी प्रशासनालाच हाताशी धरून पुन्हा स्लॅब जोडून रहिवाशांना वापरण्यास दिल्या होत्या. मात्र, गेल्या काही वर्षांपासून या इमारती रहिवाशांसाठी मृत्यूचे सापळे ठरत आहेत. अपघातांची ही साखळी शहरात सुरूच असून मे महिन्यात मोहिनी पॅलेस आणि साई शक्ती या दोन इमारतींचा स्लॅब कोसळून १२ नागरिकांचा मृत्यू झाला होता. या घटनानंतर पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी महापालिकेला तत्काळ शहरातील त्या काळात उभारलेल्या आणि कारवाई झालेल्या इमारतींचे सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले होते. यासाठी महापालिकेने चारही प्रभागांसाठी समिती तयार करून यात अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त, सहायक आयुक्त, पाणीपुरवठा आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता तसेच कनिष्ठ अभियंत्यांचा समावेश केला होता. या समितीला दिलेल्या सात दिवसांच्या मुदतीतून समोर आलेल्या सर्वेक्षणात शहरात एकूण ५५० इमारती आढळून आल्या आहेत.
प्रभाग समिती एक ९४
प्रभाग समिती दोन १३३
प्रभाग समिती तीनमध्ये ११८
प्रभाग समिती चार १६०
याबाबतची यादी महापालिकेने www.umc.gov.in या संकेतस्थळावर पाहता येईल
अनेक इमारतींचा स्लॅब पाडण्यात आला आहे. तसेच हा सर्वेक्षणाच्या पहिल्या टप्प्यातील यादी जाहीर करण्यात आली असून, हे सर्वेक्षण पुढेही सुरू राहणार आहे.
डॉ. युवराज भदाणे, माहिती जनसंपर्क अधिकारी
पालिकेनेच तपासणी करण्याची मागणी
महापालिकेने इमारतींचे सर्वेक्षण पूर्ण करत बांधकाम तपासणी करण्याचे आदेश दिले असले तरी रहिवासी संघटना आणि लोकप्रतिनिधींनी मात्र पालिकेनेच तज्ज्ञ संरचनात्मक अभियंत्यांकडून ही तपासणी करण्याची मागणी केली आहे. यावर महापालिकेने मात्र अद्याप कुठलाही निर्णय घेतला नाही.