अ‍ॅपशहर

आदिवासी गावांना ८ कोटींचा निधी

आदिवासी योजनांच्या ५ टक्के निधी थेट पेसा ग्रामपंचायतींना देण्याचा सरकारचा निर्णय असून त्यानुसार ठाणे जिल्ह्यातील ४०३ गावांना सुमारे ८ कोटी ७१ लाख १७ हजार ६५ रुपये देण्यात येणार आहेत.

Maharashtra Times 25 Mar 2018, 1:17 pm
ठाणे : आदिवासी योजनांच्या ५ टक्के निधी थेट पेसा ग्रामपंचायतींना देण्याचा सरकारचा निर्णय असून त्यानुसार ठाणे जिल्ह्यातील ४०३ गावांना सुमारे ८ कोटी ७१ लाख १७ हजार ६५ रुपये देण्यात येणार आहेत. मुरबाड पंचायत समिती क्षेत्रातील ५५ ग्रामसभांमधील १०१, भिवंडी पंचायत समिती क्षेत्रातील ३९ ग्रामसभांमधील ७२ आणि शहापूर पंचायत समिती क्षेत्रातील ११० ग्रामसभांमधील २३० गावांना याचा फायदा मिळू शकणार आहे. या भागातील १ लाख ७९ हजार ५६२ आदिवासींना दरडोई ४८५ रुपयांप्रमाणे हा निधी मिळणार आहे. गावाच्या विकासासाठी त्याचा खर्च होणार आहे. राज्य सरकारने नुकताच या संदर्भात निर्णय घोषित केला.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 8 crores fund for tribal villages
आदिवासी गावांना ८ कोटींचा निधी


राज्यातील पेसा ग्रामपंचायतींना थेट ५ टक्के निधी देण्याचा निर्णय २०१५मध्ये राज्य सरकारकडून घेण्यात आला. २०१७-१८ या आर्थिक वर्षासाठी २१४ कोटी ३० लाख ८७ हजारांचा निधी देण्यात आला. त्यापैकी ठाण्यासाठी ८ कोटी ७१ लाख १७ हजार रुपये निधी वितरीत करण्यात आला. मुरबाड, भिवंडी आणि शहापूर तालुक्यांमधील ४०३ पेसा गावांसाठी या निधीचा उपयोग केला जाणार आहे. ग्रामसभांकडे थेट निधी उपलब्ध केला जाणार असून तेथील स्थानिक आदिवासींच्या संख्येनुसार त्याचे वितरण केले जाणार आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे या निधीच्या खर्चाचे प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज