ठाणे: आरेमधील वृक्षतोडीच्या निषेधार्थ आंदोलन केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या २५ आंदोलकांची आज रात्री उशिरा सुटका करण्यात आली आहे. सुटका करण्यात आलेल्यांमध्ये आदिवासी महिलांचाही समावेश आहे. या सर्व आंदोलकांची ठाणे मध्यवर्ती कारागृहातून सुटका करण्यात आली असून सुटकेनंतर कारागृहाबाहेर जमलेल्या पर्यावरणप्रेमींनी एकच जल्लोष केला.
आरेतील दीड हजार झाडे रातोरात कापून टाकण्यात आल्याने पर्यावरण प्रेमींनी प्रचंड संताप व्यक्त करत शनिवारी आरेपरिसरात जोरदार आंदोलन केले होते. त्यामुळे पोलिसांनी या आंदोलकांची धरपकड केली होती. यापैकी २५ आंदोलकांना ठाणे मध्यवर्ती कारागृहात नेण्यात आले होते. आज रात्री सव्वा बारा वाजता या आंदोलकांची सुटका करण्यात आली. यावेळी तुरुंगाबाहेर असलेल्या पर्यावरणवाद्यांनी या आंदोलकांची गळाभेट घेऊन जल्लोष करत स्वागत केलं. काही आदिवासी महिलांची ठाणे कारागृहातून तर काही आंदोलक महिलांची भायखळा कारागृहातून सुटका करण्यात आली आहे.
आरेतील वृक्षतोडीवर सुप्रीम कोर्ट गंभीर; उद्याच सुनावणी
दरम्यान, मेट्रो कारशेडसाठी आरेच्या जंगलातील झाडांची बेसुमार कत्तल केली जात असताना त्याची गंभीर दखल सुप्रीम कोर्टाने घेतली आहे. विधी शाखेच्या विद्यार्थ्यांच्या वतीने रिषभ रंजन या विद्यार्थ्याने एका पत्राद्वारे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांचे या प्रश्नाकडे लक्ष वेधले होते. त्याची दखल घेत सुप्रीम कोर्टाने सुमोटो याचिका दाखल करून घेतली असून त्यावर सोमवारी सुनावणी होणार आहे.
आरेतील दीड हजार झाडे रातोरात कापून टाकण्यात आल्याने पर्यावरण प्रेमींनी प्रचंड संताप व्यक्त करत शनिवारी आरेपरिसरात जोरदार आंदोलन केले होते. त्यामुळे पोलिसांनी या आंदोलकांची धरपकड केली होती. यापैकी २५ आंदोलकांना ठाणे मध्यवर्ती कारागृहात नेण्यात आले होते. आज रात्री सव्वा बारा वाजता या आंदोलकांची सुटका करण्यात आली. यावेळी तुरुंगाबाहेर असलेल्या पर्यावरणवाद्यांनी या आंदोलकांची गळाभेट घेऊन जल्लोष करत स्वागत केलं. काही आदिवासी महिलांची ठाणे कारागृहातून तर काही आंदोलक महिलांची भायखळा कारागृहातून सुटका करण्यात आली आहे.
आरेतील वृक्षतोडीवर सुप्रीम कोर्ट गंभीर; उद्याच सुनावणी
दरम्यान, मेट्रो कारशेडसाठी आरेच्या जंगलातील झाडांची बेसुमार कत्तल केली जात असताना त्याची गंभीर दखल सुप्रीम कोर्टाने घेतली आहे. विधी शाखेच्या विद्यार्थ्यांच्या वतीने रिषभ रंजन या विद्यार्थ्याने एका पत्राद्वारे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांचे या प्रश्नाकडे लक्ष वेधले होते. त्याची दखल घेत सुप्रीम कोर्टाने सुमोटो याचिका दाखल करून घेतली असून त्यावर सोमवारी सुनावणी होणार आहे.