म. टा. वृत्तसेवा, अंबरनाथ
अंबरनाथ एमआयडीसीतील १२ कंपन्यांवर मागील महिन्यात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (एमपीसीबी) प्रदूषणाचे नियम न पाळल्याप्रकरणी बंदीची कारवाई केली. हे कारवाईसत्र अद्याप सुरू असून जल आणि वायूप्रदूषणाचा ठपका ठेवत पॅरामाऊंट मिनरल अॅण्ड केमिकल लिमिटेड या कंपनीवर बंदीची कारवाई करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
अंबरनाथ एमआयडीसी क्षेत्रातील चिखलोली धरण आणि जीआयपी धरण या दोन्ही ठिकाणी घातक केमिकल टाकल्याचे प्रकरण चांगलेच गाजले होते. या प्रकरणी एमपीसीबी, अंबरनाथ अॅडिशनल मॅन्युफॅक्चर असोसिएशन (आमा), एमआयडीसीच्या कारभारावर प्रश्नचिन्हही उपस्थित करण्यात आले होते. अखेर या प्रकरणी एमपीसीबीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेट देत पाहणी केल्यानंतर आणि धरणात टाकलेल्या केमिकलच्या प्राथमिक अहवालानंतर एमआयडीसीतील १२ कंपन्यांना नोटीस बजावत त्या बंद करण्याची कारवाई एमपीसीबीने केली होती. मात्र हे प्रकरण थंड झाल्यानंतर पुन्हा या भागातील काही कंपन्यांकडून नाल्यांमध्ये केमिकल सोडण्याचा प्रकार समोर येत आहे. अंबरनाथमधील अनेक नाल्यांमध्ये फेसाळ आणि केमिकलचे पाणी सोडण्याचे वारंवार समोर येत होते. त्यामुळे पर्यावरणप्रेमींनी याविरोधात आवाज उठवला होता. यावर एमपीसीबी कारवाई करत नसल्याचा आरोप पर्यावरणप्रेमी करत होते. अखेर जल आणि वायूप्रदूषण अधिनियमांचा भंग केल्याचा ठपका ठेवत एमपीसीबीने एमआयडीसीतील एका कंपनीवर बंदीची कारवाई केली आहे. पॅरामाऊंट मिनरल अॅण्ड केमिकल लिमिटेड असे या कंपनीचे नाव आहे.
कंपन्यांकडून दुर्लक्ष
कल्याण विभागीय अधिकारी धनंजय पाटील यांनी पॅरामाऊंट मिनरल अॅण्ड केमिकल लिमिटेड कंपनीला नोटीस बजावत ४८ तासांत कंपनीचे उत्पादन बंद करण्याचे आदेश दिले होते. तसेच याबाबत एमजीपी आणि महावितरणलाही या कंपनीचे कनेक्शन बंद करण्याचे आदेश दिले होते. एमपीसीबीने जरी कारवाईची मोहीम सुरू ठेवली असली तरी एमआयडीसीतील कंपन्यांवर मात्र त्याचा परिणाम होताना दिसत नसल्याचे समोर येत आहे. त्यामुळे वारंवार कारवाई करूनही कंपन्यांकडून प्रदूषण पसरवण्याचे प्रकार समोर येत आहेत.
अंबरनाथ एमआयडीसीतील १२ कंपन्यांवर मागील महिन्यात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (एमपीसीबी) प्रदूषणाचे नियम न पाळल्याप्रकरणी बंदीची कारवाई केली. हे कारवाईसत्र अद्याप सुरू असून जल आणि वायूप्रदूषणाचा ठपका ठेवत पॅरामाऊंट मिनरल अॅण्ड केमिकल लिमिटेड या कंपनीवर बंदीची कारवाई करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
अंबरनाथ एमआयडीसी क्षेत्रातील चिखलोली धरण आणि जीआयपी धरण या दोन्ही ठिकाणी घातक केमिकल टाकल्याचे प्रकरण चांगलेच गाजले होते. या प्रकरणी एमपीसीबी, अंबरनाथ अॅडिशनल मॅन्युफॅक्चर असोसिएशन (आमा), एमआयडीसीच्या कारभारावर प्रश्नचिन्हही उपस्थित करण्यात आले होते. अखेर या प्रकरणी एमपीसीबीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेट देत पाहणी केल्यानंतर आणि धरणात टाकलेल्या केमिकलच्या प्राथमिक अहवालानंतर एमआयडीसीतील १२ कंपन्यांना नोटीस बजावत त्या बंद करण्याची कारवाई एमपीसीबीने केली होती. मात्र हे प्रकरण थंड झाल्यानंतर पुन्हा या भागातील काही कंपन्यांकडून नाल्यांमध्ये केमिकल सोडण्याचा प्रकार समोर येत आहे. अंबरनाथमधील अनेक नाल्यांमध्ये फेसाळ आणि केमिकलचे पाणी सोडण्याचे वारंवार समोर येत होते. त्यामुळे पर्यावरणप्रेमींनी याविरोधात आवाज उठवला होता. यावर एमपीसीबी कारवाई करत नसल्याचा आरोप पर्यावरणप्रेमी करत होते. अखेर जल आणि वायूप्रदूषण अधिनियमांचा भंग केल्याचा ठपका ठेवत एमपीसीबीने एमआयडीसीतील एका कंपनीवर बंदीची कारवाई केली आहे. पॅरामाऊंट मिनरल अॅण्ड केमिकल लिमिटेड असे या कंपनीचे नाव आहे.
कंपन्यांकडून दुर्लक्ष
कल्याण विभागीय अधिकारी धनंजय पाटील यांनी पॅरामाऊंट मिनरल अॅण्ड केमिकल लिमिटेड कंपनीला नोटीस बजावत ४८ तासांत कंपनीचे उत्पादन बंद करण्याचे आदेश दिले होते. तसेच याबाबत एमजीपी आणि महावितरणलाही या कंपनीचे कनेक्शन बंद करण्याचे आदेश दिले होते. एमपीसीबीने जरी कारवाईची मोहीम सुरू ठेवली असली तरी एमआयडीसीतील कंपन्यांवर मात्र त्याचा परिणाम होताना दिसत नसल्याचे समोर येत आहे. त्यामुळे वारंवार कारवाई करूनही कंपन्यांकडून प्रदूषण पसरवण्याचे प्रकार समोर येत आहेत.