पूर्वसूचना न दिल्याचा गाळेधारकांचा आरोप
म. टा. वृत्तसेवा, बदलापूर
बदलापूर कात्रप भागातील अतिक्रमणांवर अखेर पालिकेने बुधवारी सकाळी पालिका कर्मचारी आणि पोलिसांच्या कडक बंदोबस्तात धडक कारवाई केली. या कारवाईमुळे कात्रप भागातील रस्ते मोकळे होणार आहेत. मात्र या कारवाईच्यावेळी गाळेधारकांनी पालिकेने कारवाईची पूर्वसूचना न दिल्याचा आरोप करत कारवाईला विरोध केला. पालिकेने आपली कारवाई सुरू ठेवत अनेक अतिक्रमणांवर बुलडोझर फिरवला.
बदलापूर शहरातील रस्त्यांवर लोकसंख्या वेगाने वाढत असली, तरी शहरातील महत्त्वाच्या रस्त्यांची रुंदी कमी असल्याने तसेच त्यावर अतिक्रमण वाढत असल्याने नागरिकांची मात्र रस्त्यातून वाट काढताना अडचण होत आहे. त्यामुळे मागील वर्षी पालिकेने बाजारपेठेतील अनेक दुकानांवर कारवाई करत ही दुकाने जमीनदोस्त केली होती. मात्र काही महिन्यांतच या रस्त्यावर पुन्हा अतिक्रमण वाढले होते. तसेच बदलापूर पूर्व भागातील कात्रप परिसरातही अतिक्रमणे वाढली होती. त्यामुळे पालिकेने दोन दिवसांच्या कारवाईची मोहीम आखली. बुधवारी सकाळी कात्रप भागातील अनेक हॉटेल्स, दुकाने, शेड यांच्यावर कारवाई केली. मात्र या कारवाईवेळी श्रीमंत आणि गरीबांच्या अतिक्रमणांवर कारवाई करताना दुजाभाव करत असल्याचा आरोप अनेकांनी केला. शहरातील मोठे हॉटेल्स, वाइन शॉप यावर राजकीय आशीर्वाद असल्याने त्यांच्यावर केवळ दिखावू कारवाई करण्यात आली आहे. तर सामान्य नागरिकांची अतिक्रमणे मात्र जमीनदोस्त करण्यात आल्याचा आरोप नागरिकांनी केला. तसेच कारवाईची कुठलीही सूचना न देता थेट पालिकेने कारवाईसाठी बुलडोझर आणल्याने अनेकांची धावपळ झाली.
या कारवाईच्यावेळी पालिकेच्या इंजिनीअरना अनेक राजकीय मंडळींचे फोन येत होते. मात्र इंजिनीअरनी या फोनला प्रतिसाद न देत थेट कारवाई सुरू ठेवली होती. त्यामुळे पालिकेच्या पथकाचे कौतुक होत असले, तरी काही श्रीमंतांच्या बांधकामांवर मात्र पालिकेने दिखावू कारवाई केल्याचाही आरोप नागरिक करत आहेत. या कारवाईमुळे कात्रप परिसरातील फूटपाथ मोकळे होणार असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. गुरुवारी पश्चिमेकडील बाजारपेठेत अतिक्रमणांवर कारवाई होणार आहे.
म. टा. वृत्तसेवा, बदलापूर
बदलापूर कात्रप भागातील अतिक्रमणांवर अखेर पालिकेने बुधवारी सकाळी पालिका कर्मचारी आणि पोलिसांच्या कडक बंदोबस्तात धडक कारवाई केली. या कारवाईमुळे कात्रप भागातील रस्ते मोकळे होणार आहेत. मात्र या कारवाईच्यावेळी गाळेधारकांनी पालिकेने कारवाईची पूर्वसूचना न दिल्याचा आरोप करत कारवाईला विरोध केला. पालिकेने आपली कारवाई सुरू ठेवत अनेक अतिक्रमणांवर बुलडोझर फिरवला.
बदलापूर शहरातील रस्त्यांवर लोकसंख्या वेगाने वाढत असली, तरी शहरातील महत्त्वाच्या रस्त्यांची रुंदी कमी असल्याने तसेच त्यावर अतिक्रमण वाढत असल्याने नागरिकांची मात्र रस्त्यातून वाट काढताना अडचण होत आहे. त्यामुळे मागील वर्षी पालिकेने बाजारपेठेतील अनेक दुकानांवर कारवाई करत ही दुकाने जमीनदोस्त केली होती. मात्र काही महिन्यांतच या रस्त्यावर पुन्हा अतिक्रमण वाढले होते. तसेच बदलापूर पूर्व भागातील कात्रप परिसरातही अतिक्रमणे वाढली होती. त्यामुळे पालिकेने दोन दिवसांच्या कारवाईची मोहीम आखली. बुधवारी सकाळी कात्रप भागातील अनेक हॉटेल्स, दुकाने, शेड यांच्यावर कारवाई केली. मात्र या कारवाईवेळी श्रीमंत आणि गरीबांच्या अतिक्रमणांवर कारवाई करताना दुजाभाव करत असल्याचा आरोप अनेकांनी केला. शहरातील मोठे हॉटेल्स, वाइन शॉप यावर राजकीय आशीर्वाद असल्याने त्यांच्यावर केवळ दिखावू कारवाई करण्यात आली आहे. तर सामान्य नागरिकांची अतिक्रमणे मात्र जमीनदोस्त करण्यात आल्याचा आरोप नागरिकांनी केला. तसेच कारवाईची कुठलीही सूचना न देता थेट पालिकेने कारवाईसाठी बुलडोझर आणल्याने अनेकांची धावपळ झाली.
या कारवाईच्यावेळी पालिकेच्या इंजिनीअरना अनेक राजकीय मंडळींचे फोन येत होते. मात्र इंजिनीअरनी या फोनला प्रतिसाद न देत थेट कारवाई सुरू ठेवली होती. त्यामुळे पालिकेच्या पथकाचे कौतुक होत असले, तरी काही श्रीमंतांच्या बांधकामांवर मात्र पालिकेने दिखावू कारवाई केल्याचाही आरोप नागरिक करत आहेत. या कारवाईमुळे कात्रप परिसरातील फूटपाथ मोकळे होणार असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. गुरुवारी पश्चिमेकडील बाजारपेठेत अतिक्रमणांवर कारवाई होणार आहे.