अ‍ॅपशहर

कारवाईचा फास घट्ट

रिक्षाचालकांची मुजोरी वाढत असल्याने सामान्य प्रवाशांनी कारवाईची मागणी केल्यानंतर रिक्षाचालकांवर जोरदार कारवाई सुरू असून नियम मोडणाऱ्या ४८ रिक्षा आढळल्या असून मुदत संपलेल्या ११ रिक्षा जप्त करण्यात आल्या आहेत. बेकायदा वाहतूक, नियम मोडून चालणाऱ्या रिक्षा यांच्या विरोधात आरटीओ आणि वाहतूक पोलिसांनी आक्रमक पवित्रा घेतला असून ही कारवाई सुरूच ठेवण्यात येणार आहे.

Maharashtra Times 7 Aug 2017, 3:00 am
आरटीओ, वाहतूक विभागाचा रिक्षाचालकांना दणका
महाराष्ट्र टाइम्स.कॉम action on kalyan dombivali autodrivers
कारवाईचा फास घट्ट


म. टा. वृत्तसेवा, डोंबिवली

रिक्षाचालकांची मुजोरी वाढत असल्याने सामान्य प्रवाशांनी कारवाईची मागणी केल्यानंतर रिक्षाचालकांवर जोरदार कारवाई सुरू असून नियम मोडणाऱ्या ४८ रिक्षा आढळल्या असून मुदत संपलेल्या ११ रिक्षा जप्त करण्यात आल्या आहेत. बेकायदा वाहतूक, नियम मोडून चालणाऱ्या रिक्षा यांच्या विरोधात आरटीओ आणि वाहतूक पोलिसांनी आक्रमक पवित्रा घेतला असून ही कारवाई सुरूच ठेवण्यात येणार आहे.

बेकायदा आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ५७६ रिक्षांची कल्याण आरटीओ आणि डोंबिवली शहर वाहतूक पोलिसांनी आठवडाभरात सलग तीन दिवस तपासणी केली. बेकायदा मार्गाने रिक्षाचा वापर होत असल्याचा ठपका या चालकांवर ठेवण्यात आला आहे.

बेकायदा आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना चाप लावण्यासाठी बुधवारपासून ही कारवाई शहरात सुरू झाली आहे. यासाठी गुप्तपणे डोंबिवली शहरातील वेगवेगळ्या भागांमध्ये धाड टाकून वाहतूक विभाग कारवाई करत आहे. या धडक कारवाईमध्ये रिक्षा सदोष आढळत असून या रिक्षाचालकांवर कारवाई करण्यात येणार आहे.


कागदपत्रांची पूर्तता नसणे, रिक्षाचालकांकडे लायसन्स व बॅज नसणे या कारणांसाठी रिक्षांवर कारवाई करण्यात येत आहे. विविध उपाययोजना करूनही रिक्षाचालक आपल्या बेशिस्त वर्तनात बदल करताना दिसत नाहीत. भाडे नाकारणे, दिवसाही हाफ रिटर्नची मागणी करणे, प्रसंगी प्रवाशांशी उद्धट वागणे, असे प्रकार सर्रास घडत आहेत. त्यांच्यावर वचक म्हणून रिक्षाचालकांवर कारवाई करण्यात येत आहे. मध्यंतरी रिक्षाचालकांकडून प्रवाशांना, अधिकाऱ्यांना मारहाण करण्याच्यासुद्धा घटना घडल्या होत्या. त्यामुळे आता रिक्षाचालकांना धडा शिकविण्यासाठी पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. रिक्षाचालकांच्या मुजोरीपासून सुटका मिळावी, या हेतूने ही कारवाई सुरू करण्यात आली आहे.

मंचाकडूनही दबाव
प्रोटेस्ट अंगेन्स्ट ऑटोवाले मांचाकडूनही कारवाईसाठी आरटीओ आणि यंत्रणांवर दबाव टाकण्यात येत आहे. मंचाच्या वतीने वाहतुकीच्या तक्रारीबद्दल ईमेलद्वारे पाठपुरावा करण्यात येत आहे. तसेच, नियम मोडणाऱ्या रिक्षाचालकांबद्दल माहिती पोचविण्यात येत आहे. सततच्या पाठपुराव्याने यंत्रणा सजग झाल्या असून त्यामुळेच कारवाई होत असल्याचे बोलले जात आहे.


रिक्षाचालकांचे धाबे दणाणले

थेट तक्रार करण्याची सोय उपलब्ध झाल्याने रिक्षाचालकांचेसुद्धा धाबे दणाणले आहे. प्रवाशांना याचा अनुभव येत असून तक्रारीचा सूर प्रवाशांनी आळवल्यावर नरमाईची भाषा रिक्षाचालक स्वीकारत आहेत.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज