म. टा. वृत्तसेवा, अंबरनाथ
अंबरनाथ नगरपालिकेच्या नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर पालिकेतील अधिकाऱ्यांच्या कारभाराला शिस्त लागावी तसेच दिवसभरातील विभागप्रमुखांच्या आणि लोकप्रतिनिधींच्या कामाचे नियोजन करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत अनेक महत्त्वाच्या सूचना अधिकाऱ्यांना करण्यात आल्या आहेत. शिस्तबद्ध प्रशासन आणि नागरिकांच्या समस्या मार्गी लावण्याबाबत अधिकाऱ्यांना तंबी देण्यात आली.
अंबरनाथ पालिकेत पुढील अडीच वर्षांसाठी नगराध्यक्ष म्हणून मनीषा वाळेकर आणि उपनगराध्यक्ष म्हणून अब्दुल शेख यांनी पदभार स्वीकारला आहे. मात्र दोन्ही व्यक्तींची शहरातील राजकारणात आणि अधिकाऱ्यांवर पकड असल्याने येत्या काळात शहरातील विकासकामे आणि पालिका प्रशासनाला शिस्त लागण्याची, नागरिकांची कामे आणि शहरातील विकासकामे मार्गी लागण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. त्यासाठी गुरुवारी अंबरनाथ नगरपालिकेच्या सभागृहात नगराध्यक्ष मनीषा वाळेकर, उपनगराध्यक्ष अब्दुल शेख, शिवसेना शहरप्रमुख अरविंद वाळेकर आणि सर्वपक्षीय गटनेते यांच्यासह विभागप्रमुखांची एक बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत अधिकाऱ्यांनी सकाळी अवेळी पालिकेत येणे, तसेच दिवसभरात अवेळी होणाऱ्या साइटची पाहणी, अथवा कार्यालयात कंत्राटदाराशी तासन तास चर्चा करत लोकप्रतिनिधींना ताटकळत ठेवणे, अशा कारभाराला चाप लावण्यासाठी आपल्या कामाच्या वेळा ठरवाव्यात, सकाळी १० ते ३ या वेळेत शहरातील समस्या आणि विकासकामांच्या साइटला भेट द्यावी, वैयक्तिक पातळीवर कामांचा दर्जा तपासावा, दुपारी तीननंतर पालिकेत आपल्या विभागात थांबावे, अशा सूचना नगराध्यक्ष मनीषा वाळेकर यांनी केल्या. तसेच कंत्राटदार आणि नगरसेवकांनीही अवेळी अधिकाऱ्यांच्या कार्यालयात जाऊन त्यांच्या कामात व्यत्यत आणण्याऐवजी दुपारी तीननंतर अधिकाऱ्यांना भेटावे, असेही सांगण्यात आले. अधिकाऱ्यांनी नगरसेवक आणि नागरिकांना दुपारनंतर वेळ देऊन त्यांच्या समस्या मार्गी लावाव्यात, अशी सूचना करण्यात आली.
...तर कारवाई होणार
अधिकाऱ्यांचे अंतर्गत गटातटाचे राजकारण सुरू असल्याने त्याचा परिणाम शहरातील विकासकामांवर होत असतो. त्यामुळे अशा कामचुकार अधिकाऱ्यांवर योग्य ती कारवाई करण्यात येणार आहे. एकाच विभागात तीन वर्षांहून अधिक काळ काढलेल्या अधिकाऱ्यांच्याही लवकरच बदल्या करण्यात येणार असल्याचेही नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष यांनी सांगितले. यापुढे दर महिन्याच्या पालिकेतील कामांचा आढावा घेण्यासाठी अशीच बैठक आयोजित करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. अंबरनाथ नगरपालिकेत योग्य प्रशासन चालवण्यासाठी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष तसेच शिवसेना शहरप्रमुख अरविंद वाळेकर यांच्या प्रयत्नांना प्रशासकीय अधिकारी किती साथ देतात, हे पाहावे लागणार आहे.
अंबरनाथ नगरपालिकेच्या नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर पालिकेतील अधिकाऱ्यांच्या कारभाराला शिस्त लागावी तसेच दिवसभरातील विभागप्रमुखांच्या आणि लोकप्रतिनिधींच्या कामाचे नियोजन करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत अनेक महत्त्वाच्या सूचना अधिकाऱ्यांना करण्यात आल्या आहेत. शिस्तबद्ध प्रशासन आणि नागरिकांच्या समस्या मार्गी लावण्याबाबत अधिकाऱ्यांना तंबी देण्यात आली.
अंबरनाथ पालिकेत पुढील अडीच वर्षांसाठी नगराध्यक्ष म्हणून मनीषा वाळेकर आणि उपनगराध्यक्ष म्हणून अब्दुल शेख यांनी पदभार स्वीकारला आहे. मात्र दोन्ही व्यक्तींची शहरातील राजकारणात आणि अधिकाऱ्यांवर पकड असल्याने येत्या काळात शहरातील विकासकामे आणि पालिका प्रशासनाला शिस्त लागण्याची, नागरिकांची कामे आणि शहरातील विकासकामे मार्गी लागण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. त्यासाठी गुरुवारी अंबरनाथ नगरपालिकेच्या सभागृहात नगराध्यक्ष मनीषा वाळेकर, उपनगराध्यक्ष अब्दुल शेख, शिवसेना शहरप्रमुख अरविंद वाळेकर आणि सर्वपक्षीय गटनेते यांच्यासह विभागप्रमुखांची एक बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत अधिकाऱ्यांनी सकाळी अवेळी पालिकेत येणे, तसेच दिवसभरात अवेळी होणाऱ्या साइटची पाहणी, अथवा कार्यालयात कंत्राटदाराशी तासन तास चर्चा करत लोकप्रतिनिधींना ताटकळत ठेवणे, अशा कारभाराला चाप लावण्यासाठी आपल्या कामाच्या वेळा ठरवाव्यात, सकाळी १० ते ३ या वेळेत शहरातील समस्या आणि विकासकामांच्या साइटला भेट द्यावी, वैयक्तिक पातळीवर कामांचा दर्जा तपासावा, दुपारी तीननंतर पालिकेत आपल्या विभागात थांबावे, अशा सूचना नगराध्यक्ष मनीषा वाळेकर यांनी केल्या. तसेच कंत्राटदार आणि नगरसेवकांनीही अवेळी अधिकाऱ्यांच्या कार्यालयात जाऊन त्यांच्या कामात व्यत्यत आणण्याऐवजी दुपारी तीननंतर अधिकाऱ्यांना भेटावे, असेही सांगण्यात आले. अधिकाऱ्यांनी नगरसेवक आणि नागरिकांना दुपारनंतर वेळ देऊन त्यांच्या समस्या मार्गी लावाव्यात, अशी सूचना करण्यात आली.
...तर कारवाई होणार
अधिकाऱ्यांचे अंतर्गत गटातटाचे राजकारण सुरू असल्याने त्याचा परिणाम शहरातील विकासकामांवर होत असतो. त्यामुळे अशा कामचुकार अधिकाऱ्यांवर योग्य ती कारवाई करण्यात येणार आहे. एकाच विभागात तीन वर्षांहून अधिक काळ काढलेल्या अधिकाऱ्यांच्याही लवकरच बदल्या करण्यात येणार असल्याचेही नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष यांनी सांगितले. यापुढे दर महिन्याच्या पालिकेतील कामांचा आढावा घेण्यासाठी अशीच बैठक आयोजित करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. अंबरनाथ नगरपालिकेत योग्य प्रशासन चालवण्यासाठी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष तसेच शिवसेना शहरप्रमुख अरविंद वाळेकर यांच्या प्रयत्नांना प्रशासकीय अधिकारी किती साथ देतात, हे पाहावे लागणार आहे.