संस्थाचालकांच्या अडचणीत वाढ
म. टा. वृत्तसेवा, कल्याण
अनाथ आश्रमातून गेल्या २० ते २५ वर्षांपूर्वी दत्तक पालकांच्यारूपाने नवे घरकुल मिळालेल्या मुलांना आता जन्मदात्यांचा शोध घेण्याची आस लागली आहे. संस्थेच्या कार्यालयात कार्यक्रमासाठी वर्षातून एकदा येणाऱ्या या मुलांकडून संस्थेच्या कार्यकर्त्यांशी सोशल मीडियावरून आणि फोनवरून संपर्क साधला जात आहे. या मुलांकडून वारंवार विचारणा होत असल्यामुळे संस्थेच्या कार्यकर्त्याच्या अडचणीत वाढ झाली आहे. अशा प्रकारची माहिती या मुलांना दिल्यास त्या महिलांचे संसारही उद्ध्वस्त होतील, अशी धास्ती कार्यकर्त्यांना वाटत असल्याने या मुलाचे समाधान करायचे कसे, ही विवंचना असल्याचे संस्थेच्या कार्यकर्त्यांनी सांगितले.
अनाथ, पालकांनी टाकलेल्या मुलांचे संगोपन करून या मुलांना गरजू आणि संगोपन करू शकतील, अशा पालकांना दत्तक देत या मुलांना समाजात स्थैर्य, सन्मान मिळवून देण्याच्या उद्देशाने डोंबिवलीतील २१ महिलांनी एकत्र येत १९८९ साली जननी आशिष या अनाथ मुलांसाठीच्या संस्थेची स्थापना केली असून या संस्थेची धुरा मागील २५ वर्षांपासून डॉ. कीर्तीदा प्रधान सांभाळत आहेत. या संस्थेकडून मागील २५ वर्षांच्या काळात दाखल झालेल्या ५२५ मुलांपैकी ४५० मुले देशात तर दोन मुले परदेशात दत्तक देण्यात आली आहेत.
संस्थेला २५ मुले सांभाळण्याची परवानगी असली तरी आजमितीला संस्थेत ५० मुले असून अपंग मुलांना दत्तक घेण्यास फारसे कोणी पुढे येत नसल्यामुळे ही मुले सहा वर्षांपेक्षा मोठी होताच त्यांना भिवंडी किंवा उल्हासनगरमधील अनाथ आश्रमात न्यायालयाच्या रीतसर परवानगीने धाडावे लागते. अनेक पालक आपल्या दत्तक मुलासमवेत संस्थेच्या कार्यक्रमाला न चुकता उपस्थित राहतात. मात्र आता ही मुले १५ ते २५ वयोगटात पोहोचली असून पालकांनी त्यांना दत्तक घेतल्याची माहिती दिल्यामुळे त्यांनाही आपली जन्मदात्री कोण, याची उत्सुकता लागली आहे.
मागील वर्षभरात संस्थेतील कार्यकर्त्यांकडे फोन आणि सोशल मीडियावर संपर्क करत ही मुले आपल्याला या अनाथ आश्रमात कोणी सोडले?जन्म देणाऱ्या आईला एकदाच भेटायचे आहे, अशी विचारणा करत आहे. आमची जन्मदात्री खरेच अडचणीत असेल तर आम्ही तिला मदत करू, असेही सांगतात.
जयश्री देशपांडे, संस्थेच्या सोशल वर्कर
म. टा. वृत्तसेवा, कल्याण
अनाथ आश्रमातून गेल्या २० ते २५ वर्षांपूर्वी दत्तक पालकांच्यारूपाने नवे घरकुल मिळालेल्या मुलांना आता जन्मदात्यांचा शोध घेण्याची आस लागली आहे. संस्थेच्या कार्यालयात कार्यक्रमासाठी वर्षातून एकदा येणाऱ्या या मुलांकडून संस्थेच्या कार्यकर्त्यांशी सोशल मीडियावरून आणि फोनवरून संपर्क साधला जात आहे. या मुलांकडून वारंवार विचारणा होत असल्यामुळे संस्थेच्या कार्यकर्त्याच्या अडचणीत वाढ झाली आहे. अशा प्रकारची माहिती या मुलांना दिल्यास त्या महिलांचे संसारही उद्ध्वस्त होतील, अशी धास्ती कार्यकर्त्यांना वाटत असल्याने या मुलाचे समाधान करायचे कसे, ही विवंचना असल्याचे संस्थेच्या कार्यकर्त्यांनी सांगितले.
अनाथ, पालकांनी टाकलेल्या मुलांचे संगोपन करून या मुलांना गरजू आणि संगोपन करू शकतील, अशा पालकांना दत्तक देत या मुलांना समाजात स्थैर्य, सन्मान मिळवून देण्याच्या उद्देशाने डोंबिवलीतील २१ महिलांनी एकत्र येत १९८९ साली जननी आशिष या अनाथ मुलांसाठीच्या संस्थेची स्थापना केली असून या संस्थेची धुरा मागील २५ वर्षांपासून डॉ. कीर्तीदा प्रधान सांभाळत आहेत. या संस्थेकडून मागील २५ वर्षांच्या काळात दाखल झालेल्या ५२५ मुलांपैकी ४५० मुले देशात तर दोन मुले परदेशात दत्तक देण्यात आली आहेत.
संस्थेला २५ मुले सांभाळण्याची परवानगी असली तरी आजमितीला संस्थेत ५० मुले असून अपंग मुलांना दत्तक घेण्यास फारसे कोणी पुढे येत नसल्यामुळे ही मुले सहा वर्षांपेक्षा मोठी होताच त्यांना भिवंडी किंवा उल्हासनगरमधील अनाथ आश्रमात न्यायालयाच्या रीतसर परवानगीने धाडावे लागते. अनेक पालक आपल्या दत्तक मुलासमवेत संस्थेच्या कार्यक्रमाला न चुकता उपस्थित राहतात. मात्र आता ही मुले १५ ते २५ वयोगटात पोहोचली असून पालकांनी त्यांना दत्तक घेतल्याची माहिती दिल्यामुळे त्यांनाही आपली जन्मदात्री कोण, याची उत्सुकता लागली आहे.
मागील वर्षभरात संस्थेतील कार्यकर्त्यांकडे फोन आणि सोशल मीडियावर संपर्क करत ही मुले आपल्याला या अनाथ आश्रमात कोणी सोडले?जन्म देणाऱ्या आईला एकदाच भेटायचे आहे, अशी विचारणा करत आहे. आमची जन्मदात्री खरेच अडचणीत असेल तर आम्ही तिला मदत करू, असेही सांगतात.
जयश्री देशपांडे, संस्थेच्या सोशल वर्कर