विस्थापित होण्याच्या भीतीने भिवंडीतही संतापाचा सिग्नल
म. टा. प्रतिनिधी, ठाणे
ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रोच्या मार्गावरून कल्याणात विरोधाचे सूर उमटत असताना आता भिवंडीतही मेट्रो मार्ग बदलण्याची मागणी जोर धरू लागली आहे. सध्या जो मार्ग प्रस्तावित करण्यात आला आहे, त्याच मार्गाने मेट्रो भिवंडीतून नेण्यात आली तर हजारो कुटुंब विस्थापित होतील, असा आरोप करत भिवंडीकरांनी शुक्रवारी पालिका मुख्यालयावर मोर्चा काढला होता. मेट्रोचा मार्ग राजकीय स्वार्थासाठी बदलण्यात येत असल्याचा आरोप यावेळी आंदोलकांनी केला. त्यामुळे आता एमएमआरडीए या मार्गाबाबत काय भूमिका घेते, याकडे भिवंडीकरांचे लक्ष लागले आहे.
ऑक्टोबर २०१६मध्ये झालेल्या एमएमआरडीएच्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजुरी दिली होती. त्यानंतर एप्रिल महिन्यात या मार्गाचे सर्वेक्षण एमएमआरडीएने करून त्याचा मार्ग निश्चित केला. २४ किलोमीटरच्या या मार्गासाठी सुमारे ८ हजार ४१६ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. यामध्ये एकूण १७ स्थानके असून या मार्गावरील भिवंडीतील कल्याण नाका (राजीव गांधी चौक) ते टेमघर या मेट्रोमुळे शेकडो कुटुंब बेघर होण्याची शक्यता आहे. भिवंडी उपनगरी मार्गाने मुंबईशी थेट जोडलेली नाही. त्यातच सध्या अनेक बिल्डरांचे मोठे प्रकल्प भिवंडीच्या नजिकच होत असल्याने या भागातील लाखो प्रवाशांना मेट्रो अत्यंत गरजेची आहे. म्हणूनच कल्याण व ठाणे जोडताना मेट्रो मार्गात भिवंडीही जोडण्यात येत आहे. परंतु, मेट्रोमुळे जे बाधित होतील, त्यांच्या पुनर्वनसनाचे कोणतेही धोरण सरकारने जाहीर केलेले नाही. त्यामुळे या प्रकल्पाला भिवंडीतून विरोध सुरू झाला आहे.
या प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन आधी करावे नंतर मेट्रोचा मार्ग न्यावा, अशी मागणी करत भिवंडीतील शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक मदन नाईक, माजी नगरसेवक दीन मोहम्मद खान यांच्यासह शेकडो नागरिकांनी पालिका मुख्यालयावर मोर्चा काढला होता. राजकीय स्वार्थासाठी भिवंडीतील एका वजनदार पदाधिकाऱ्याने मेट्रोचा मार्ग बदलल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. आंदोलकांनी आपल्या मागण्यांचे निवेदन आयुक्त योगेश म्हसे व महापौर जावेद दळवी यांना दिले.
ठाणे-भिवंडी-कल्याण मार्ग
ठाण्याहून कापूरबावडी-बाळकूम नाका-कशेळी-काल्हेर-पूर्णा-अंजूर फाटा-धामणकर नाका-गोपाळनगर-टेमघर-रांजणोली गाव-एमआयडीसी-गोवे-कोन-दुर्गाडी-सहजानंद चौक-कल्याण स्थानक आणि कल्याणचे एपीएमसी मार्केट.
मार्च २०२१ पर्यंत प्रकल्प पूर्ण करण्याचे प्रस्तावित
२०२१ मध्ये प्रत्येक ५ मिनिटाला १ गाडी याप्रमाणे वेळापत्रक
या मार्गावरून दिवसाला २०२१मध्ये अंदाजे २ लाख ३० हजार
सन २०३१ पर्यंत ३ लाखांहून जास्त प्रवाशांना सुरक्षित, आरामदायी व वातानुकूलित प्रवासाचा आनंद मिळणार
म. टा. प्रतिनिधी, ठाणे
ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रोच्या मार्गावरून कल्याणात विरोधाचे सूर उमटत असताना आता भिवंडीतही मेट्रो मार्ग बदलण्याची मागणी जोर धरू लागली आहे. सध्या जो मार्ग प्रस्तावित करण्यात आला आहे, त्याच मार्गाने मेट्रो भिवंडीतून नेण्यात आली तर हजारो कुटुंब विस्थापित होतील, असा आरोप करत भिवंडीकरांनी शुक्रवारी पालिका मुख्यालयावर मोर्चा काढला होता. मेट्रोचा मार्ग राजकीय स्वार्थासाठी बदलण्यात येत असल्याचा आरोप यावेळी आंदोलकांनी केला. त्यामुळे आता एमएमआरडीए या मार्गाबाबत काय भूमिका घेते, याकडे भिवंडीकरांचे लक्ष लागले आहे.
ऑक्टोबर २०१६मध्ये झालेल्या एमएमआरडीएच्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजुरी दिली होती. त्यानंतर एप्रिल महिन्यात या मार्गाचे सर्वेक्षण एमएमआरडीएने करून त्याचा मार्ग निश्चित केला. २४ किलोमीटरच्या या मार्गासाठी सुमारे ८ हजार ४१६ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. यामध्ये एकूण १७ स्थानके असून या मार्गावरील भिवंडीतील कल्याण नाका (राजीव गांधी चौक) ते टेमघर या मेट्रोमुळे शेकडो कुटुंब बेघर होण्याची शक्यता आहे. भिवंडी उपनगरी मार्गाने मुंबईशी थेट जोडलेली नाही. त्यातच सध्या अनेक बिल्डरांचे मोठे प्रकल्प भिवंडीच्या नजिकच होत असल्याने या भागातील लाखो प्रवाशांना मेट्रो अत्यंत गरजेची आहे. म्हणूनच कल्याण व ठाणे जोडताना मेट्रो मार्गात भिवंडीही जोडण्यात येत आहे. परंतु, मेट्रोमुळे जे बाधित होतील, त्यांच्या पुनर्वनसनाचे कोणतेही धोरण सरकारने जाहीर केलेले नाही. त्यामुळे या प्रकल्पाला भिवंडीतून विरोध सुरू झाला आहे.
या प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन आधी करावे नंतर मेट्रोचा मार्ग न्यावा, अशी मागणी करत भिवंडीतील शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक मदन नाईक, माजी नगरसेवक दीन मोहम्मद खान यांच्यासह शेकडो नागरिकांनी पालिका मुख्यालयावर मोर्चा काढला होता. राजकीय स्वार्थासाठी भिवंडीतील एका वजनदार पदाधिकाऱ्याने मेट्रोचा मार्ग बदलल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. आंदोलकांनी आपल्या मागण्यांचे निवेदन आयुक्त योगेश म्हसे व महापौर जावेद दळवी यांना दिले.
ठाणे-भिवंडी-कल्याण मार्ग
ठाण्याहून कापूरबावडी-बाळकूम नाका-कशेळी-काल्हेर-पूर्णा-अंजूर फाटा-धामणकर नाका-गोपाळनगर-टेमघर-रांजणोली गाव-एमआयडीसी-गोवे-कोन-दुर्गाडी-सहजानंद चौक-कल्याण स्थानक आणि कल्याणचे एपीएमसी मार्केट.
मार्च २०२१ पर्यंत प्रकल्प पूर्ण करण्याचे प्रस्तावित
२०२१ मध्ये प्रत्येक ५ मिनिटाला १ गाडी याप्रमाणे वेळापत्रक
या मार्गावरून दिवसाला २०२१मध्ये अंदाजे २ लाख ३० हजार
सन २०३१ पर्यंत ३ लाखांहून जास्त प्रवाशांना सुरक्षित, आरामदायी व वातानुकूलित प्रवासाचा आनंद मिळणार