अ‍ॅपशहर

खड्ड्यांतील प्रवासाला अंधाराचीही जोड

अंबरनाथ शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांवर सध्या सोशल मीडियावर ‘सोनू, तुझा अंबरनाथवर भरोसा नाय का?’ या गाण्यातून नगरपालिकेवर रोष व्यक्त केला जात आहे. या रोषात अधिक भर पडत असून आत्ता खड्ड्यातील रस्त्यांवरून प्रवास करणाऱ्या नागरिकांना विद्युत खांबावरील एलईडी दिवेही बंद असल्याने खड्डे आणि अंधार अशा दुहेरी अडचणींचा सामना करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे घर गाठताना आधीच खड्ड्यांमुळे होणाऱ्या अपघातांत अंधारामुळे अधिक भर पडण्याची भीती व्यक्त होतआहे.

Maharashtra Times 17 Jul 2017, 3:00 am
रस्ते दुरुस्तीच्या प्रतीक्षेत; एलईडी दिवेही बंद
महाराष्ट्र टाइम्स.कॉम ambarnath city roads have potholes and led lights not working
खड्ड्यांतील प्रवासाला अंधाराचीही जोड


म. टा. वृत्तसेवा, अंबरनाथ

अंबरनाथ शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांवर सध्या सोशल मीडियावर ‘सोनू, तुझा अंबरनाथवर भरोसा नाय का?’ या गाण्यातून नगरपालिकेवर रोष व्यक्त केला जात आहे. या रोषात अधिक भर पडत असून आत्ता खड्ड्यातील रस्त्यांवरून प्रवास करणाऱ्या नागरिकांना विद्युत खांबावरील एलईडी दिवेही बंद असल्याने खड्डे आणि अंधार अशा दुहेरी अडचणींचा सामना करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे घर गाठताना आधीच खड्ड्यांमुळे होणाऱ्या अपघातांत अंधारामुळे अधिक भर पडण्याची भीती व्यक्त होत

आहे.

अंबरनाथ शहरातील डांबरी रस्त्यांकडे नगरपालिकेने केलेल्या दुर्लक्षामुळे शहरातील वर्दळीच्या रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांवरून प्रवास करताना गाडीतून करत आहोत की उंटावरून अशी प्रचीती येते. त्यामुळे आधीच अंबरनाथकरांना मानेच्या आणि पाठीच्या विकाराने त्रस्त केले आहे. खड्ड्यातून प्रवास करताना अनेक दुचाकी आणि पायी जाणाऱ्या नागरिकांचे अपघात होत आहेत. त्यात भर म्हणून शहरातील अनेक भागांतील विद्युत दिवे रात्री-अपरात्री अचानक बंद पडत असल्याने नागरिकांना रस्त्यावरील खड्ड्यातून मार्ग काढताना बंद विद्युत दिव्यांच्या अडचणींमुळे दुहेरी भर पडत आहे. अंबरनाथ नगरपालिकेने शहरातील सात हजार ११२ एलईडी विद्युत दिव्यांचे कंत्राट ‘स्टार लाइट’ कंपनीला दिले असून यात २५ ते १२० वॉटच्या एलईडी दिव्यांचा वापर विद्युत खांबांवर करण्यात आला आहे. यासाठी कंपनीला महिन्याला साधारण ९ लाख रुपयांचे बिल पालिकेकडून अदा केले जाते. त्यात दुरुस्ती, नवीन एलईडी आणि खांब, विद्युत वायर बदलण्याची जबाबदारी कंत्राटदारावर देण्यात आली. तसेच, नुकतेच अंबरनाथ उड्डाणपुलावरील जुने खांब काढून या ठिकाणी नवीन विद्युत खांब आणि एलईडी दिवे बसवण्यासाठी साडे अकरा लाखांचे कंत्राट एका कंत्राटदाराला देण्यात आले आहे. यात उड्डाणपुलावर एकूण २१ एलईडी दिवे बसवण्यात आले आहेत. मात्र दिवे बसवून काही दिवस उलटत नाही तोच उड्डाणपुलावरील दिवे वारंवार बंद पडत असल्याने नागरिकांना अंधारातूनच प्रवास करावा लागत आहे. हीच परिस्थिती शहरातील अन्य विद्युत दिव्यांबद्दलही आहे. अनेक रहिवासी भागात तसेच कल्याण-बदलापूर मार्गावरील मटका चौक ते साईबाबा मंदिर मार्गावरील दिवेही अनेकवेळा बंद असतात, त्यामुळे वर्दळीच्या मार्गावरून आणि उड्डाणपुलावरून प्रवास करताना वाहनचालकांचे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

याबाबत पालिकेच्या विद्युत विभागातील अधिकाऱ्याला विचारले असता, कंत्राटदाराकडून काहीवेळेला दुरुस्ती करण्यास विलंब होत असल्याने त्यांनी मान्य केले आहे. मात्र पावसाळ्यात अनेकदा महावितरणच्या तांत्रिक बिघाडामुळेही हे विद्युत दिवे बंद असल्याचे सांगत त्यांनी कंत्राटदाराचा बचाव केला आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज