अ‍ॅपशहर

रिक्षाचालकाचा प्रवाशावर चाकूहल्ला

रिक्षाचे भाडे देण्याच्या वादातून तीन रिक्षाचालकांनी तीन प्रवाशांना मारहाण करत त्यातील एका प्रवाशावर चाकूने हल्ला केल्याची घटना समोर आली.

Maharashtra Times 21 Apr 2018, 4:21 am
अंबरनाथ : रिक्षाचे भाडे देण्याच्या वादातून तीन रिक्षाचालकांनी तीन प्रवाशांना मारहाण करत त्यातील एका प्रवाशावर चाकूने हल्ला केल्याची घटना समोर आली. या घटनेत प्रवासी गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तिन्ही रिक्षाचालकांना शिवाजी नगर पोलिसांनी अटक केली.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम auto-driver


बुधवारी रात्री उशिरा अंबरनाथच्या पूर्व भागातील रिक्षा स्टँड येथून आनंद नगर एमआयडीसी येथे जाण्यासाठी दिवाकर, हरिराम पासवान आणि महेश या तीन प्रवशांनी रिक्षा पकडली होती. यावेळी रिक्षाचालक संतोष मिसाळ याने एमआयडीसीत जाण्यासाठी ६० रुपये भाडे होईल, असे सांगितले. तेथे पोहोचल्यावर हरीराम याने रिक्षाचालकाला शंभर रुपयांची नोट दिली. मात्र संतोषने ठरल्याप्रमाणे भाडे न घेता १०० रुपये ठेवून दिले. ४० रुपयांच्या वादातून रिक्षाचालक आणि प्रवासी या दोघांत हाणामारी झाली. यावेळी येथून जात असलेले रिक्षाचालक दीपककुमार पाल आणि चंद्रकांत यांनी संतोषसोबत तिन्ही प्रवाशांना मारहाण करायला सुरुवात केली. संतोषने शेजारील दुकानातून चाकू आणत हरीरामच्या छातीवर आणि पोटावर वार केले. हरीरामची प्रकृती चिंताजनक आहे. आरोपींना न्यायालयाने २३ तारखेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज