अंबरनाथ: येथील औद्योगिक प्रशिक्षक संस्थेतील (आयटीआय) एका विद्यार्थ्यानं वसतिगृहातील खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. त्याच्या आत्महत्येचं नेमकं कारण समजू शकलं नाही. त्यानं अभ्यासाच्या तणावातून हे टोकाचं पाऊल उचललं का? किंवा आणखी काही कारण होतं हे स्पष्ट होऊ शकलं नाही.
... अन्यथा शिक्षकांवर फौजदारी गुन्हा दाखल करणार!
स्वप्नील दुसाणे असं आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचं नाव आहे. तो मूळचा जळगावचा आहे. अंबरनाथ येथील आयटीआयमध्ये त्यानं वेल्डर या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला होता. तो संस्थेच्या वसतिगृहात राहत होता. स्वप्नील हा मंगळवारी संध्याकाळी रडत रडत वसतिगृहाच्या खोलीत गेला होता. त्याच्या मित्रांनी त्याला पाहिलं होतं. त्यानंतर त्यानं खोलीत गळफास घेऊन जीवन संपवलं. त्यानं आत्महत्या केल्याचं कळताच संस्थेमध्ये एकच खळबळ उडाली. त्यानं हे टोकाचं पाऊल का उचललं हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही. या प्रकरणी अंबरनाथ पोलीस ठाण्यात त्याच्या अकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. या प्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.
नोकरीच्या शोधात 'त्याने' गमावले १ लाख रुपये
बोटांच्या ठशांवरून मृताची ओळख
... अन्यथा शिक्षकांवर फौजदारी गुन्हा दाखल करणार!
स्वप्नील दुसाणे असं आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचं नाव आहे. तो मूळचा जळगावचा आहे. अंबरनाथ येथील आयटीआयमध्ये त्यानं वेल्डर या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला होता. तो संस्थेच्या वसतिगृहात राहत होता. स्वप्नील हा मंगळवारी संध्याकाळी रडत रडत वसतिगृहाच्या खोलीत गेला होता. त्याच्या मित्रांनी त्याला पाहिलं होतं. त्यानंतर त्यानं खोलीत गळफास घेऊन जीवन संपवलं. त्यानं आत्महत्या केल्याचं कळताच संस्थेमध्ये एकच खळबळ उडाली. त्यानं हे टोकाचं पाऊल का उचललं हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही. या प्रकरणी अंबरनाथ पोलीस ठाण्यात त्याच्या अकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. या प्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.
नोकरीच्या शोधात 'त्याने' गमावले १ लाख रुपये
बोटांच्या ठशांवरून मृताची ओळख