म. टा. वृत्तसेवा,वसई
साहित्य आणि कला यांचा धांडोळा घेणाऱ्या जाणकार कवी, कलावंत आणि लेखकांच्या 'ऋतुगंध' नियतकालिक परिवारातर्फे १५वा वर्धापन दिन नुकताच बोईसर येथे टीमा हॉलमध्ये साजरा करण्यात आला.
'ऋतूगंध'चे प्रमुख व कवी संतोष संखे, कवी किरण येले, जर्नादन पाटील, संध्या शहापुरे, विजय ठाकूर, सुहास राऊत, सायली पिंपळे, शीतल संखे अशा अनेक कवींनी कवितावाचन केले. तन्मयी संखे यांनी ऑर्गनवादन केले. विवेक संखे यांनी बासरीवादन केले. मुंबई व पालघर जिल्ह्यातील कवी रसिकांनी आर्वजून या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. बाहेर पाऊस सुरू असतानादेखील सभागृहामध्ये काव्यवर्षाव रसिकांची मने रिझवित होता.