म. टा. वृत्तसेवा, वसई
काही अज्ञात व्यक्तींकडून एका चारचाकी वाहनावर हल्ला झाल्याची घटना नुकतीच सातीवली पुलाजवळ घडली. या हल्ल्यात चारचाकीमधील दोन जण जखमी झाले आहेत.
ब्रिजपाल सिंह रांगर (५२) हे वसई पूर्व भोयदापाडा येथील त्यांचे ऑफिस बंद करून संध्याकाळच्या वेळेस आपल्या घरी, मिरारोडला जाण्यास निघाले होते. सातीवली येथील पुलाखाली आले असता १० ते १२ अज्ञात इसमांनी त्यांची गाडी थांबविली आणि लाकडी दांड्याने हल्ला करून गाडीच्या काचा फोडल्या. हल्ल्यात ब्रिजपाल सिंह यांच्याबरोबरच त्यांचा चालकही गंभीर जखमी झाले असून, त्यांना मिरारोड येथील भक्तिवेदांत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याबाबत वालिव पोलिस ठाण्यात तक्रार करण्यात आली असून अज्ञात इसमांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस अधिक तपास करत आहेत.