म. टा. वृत्तसेवा, कल्याण
अभ्यासाबरोबरच विद्यार्थ्यांमधील क्रीडागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी शासकीय स्तरावर प्रयत्न सुरू असून यंदा मैदाने आणि क्रीडासंकुले अद्ययावत करण्यासाठी सरकारकडून दीड कोटींची तरतूद करण्यात आली आहे. याखेरीज विविध खेळांतील प्रशिक्षित प्रशिक्षकांकडून खेळाडूंना खेळाचे धडे गिरवता यावेत, यासाठी १५३ आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पंचाची नेमणूक करण्यात आल्याची माहिती क्रीडामंत्री आशीष शेलार यांनी दिली.
कल्याणातील पूरग्रस्त भागातील नागरिकाच्या भेटी घेत त्यांना आमदार नरेंद्र पवार यांच्या माध्यमातून अन्नधान्य आणि ब्लँकेटचे वाटप केल्यानंतर शेलार यांनी क्रीडा संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्याची भेट घेतली. यावेळी समितीकडून एसएससी बोर्डाच्या विद्यार्थ्यांसाठी घेतल्या जाणाऱ्या क्रीडास्पर्धेत इतर बोर्डांच्या विद्यार्थांना खेळवले जात असल्याने आपल्या बोर्डाची मुले मागे पडत असल्यामुळे यावर तोडगा काढण्याची मागणी करण्यात आली.
शेलार यांनी कल्याण दौऱ्यात सर्वप्रथम पूरग्रस्त भागाचा दौरा करत पुरात बाधित झालेल्या नागरिकांची भेट घेतली. यावेळी कोणत्याही शासकीय नियमात व लाल फितीत अडकून न पडता ज्यांचे नुकसान झाले आहे, त्या सर्वांना मदत करण्याचा सरकारचा मानस असल्याचे सांगत त्यांनी पूरग्रस्तांना आश्वस्त केले. तसेच मोबाइल मेडिकल प्राथमिक उपचार केंद्राचे अनावरण त्यांनी केले. तद्नंतर त्यांनी आमदार पवार यांच्या निधीतून विकसित केलेल्या विकास कामाचे अनावरण झाल्यानंतर आदिवासी बांधवांना शिधापत्रिका आणि उज्ज्वला गॅस योजनेतून गस शेगड्यांचे वितरण केले. अखेर त्यांनी महाराष्ट्र राज्य शालेय क्रीडा संघर्ष समितीच्या बैठकीला हजेरी लावली. यावेळी विविध शाळेचे मुख्याध्यापक उपस्थित होते. या मुख्याध्यापकांनी प्राथमिक शाळेला जोडलेले आठवीचे वर्ग बंद करण्याची मागणी केली, तर शालेय स्पर्धेत एसएससी बोर्डाच्या विद्यार्थ्यांवर अन्याय होत असल्याची तक्रार करत यावर तोडगा काढण्याची मागणी केली. त्यावर शेलार यांनी विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त स्पर्धा खेळता याव्यात यासाठी स्पर्धांची संख्या वाढविण्याचा विचार शासनाच्या विचाराधीन असून दुसरीकडे मैदाने आणि क्रीडा संकुलाच्या विकासासाठी निधीची तरतूद, खेळाडूंना प्रशिक्षण देण्यासाठी उत्कृष्ट प्रशिक्षकाची नेमणूक करण्यात आल्याचे स्पष्ट केले. तसेच सर्व स्पर्धा सर्व खेळाडूंसाठी खुल्या करण्याबाबत विचार करण्याचे आश्वासन दिले.
अभ्यासाबरोबरच विद्यार्थ्यांमधील क्रीडागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी शासकीय स्तरावर प्रयत्न सुरू असून यंदा मैदाने आणि क्रीडासंकुले अद्ययावत करण्यासाठी सरकारकडून दीड कोटींची तरतूद करण्यात आली आहे. याखेरीज विविध खेळांतील प्रशिक्षित प्रशिक्षकांकडून खेळाडूंना खेळाचे धडे गिरवता यावेत, यासाठी १५३ आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पंचाची नेमणूक करण्यात आल्याची माहिती क्रीडामंत्री आशीष शेलार यांनी दिली.
कल्याणातील पूरग्रस्त भागातील नागरिकाच्या भेटी घेत त्यांना आमदार नरेंद्र पवार यांच्या माध्यमातून अन्नधान्य आणि ब्लँकेटचे वाटप केल्यानंतर शेलार यांनी क्रीडा संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्याची भेट घेतली. यावेळी समितीकडून एसएससी बोर्डाच्या विद्यार्थ्यांसाठी घेतल्या जाणाऱ्या क्रीडास्पर्धेत इतर बोर्डांच्या विद्यार्थांना खेळवले जात असल्याने आपल्या बोर्डाची मुले मागे पडत असल्यामुळे यावर तोडगा काढण्याची मागणी करण्यात आली.
शेलार यांनी कल्याण दौऱ्यात सर्वप्रथम पूरग्रस्त भागाचा दौरा करत पुरात बाधित झालेल्या नागरिकांची भेट घेतली. यावेळी कोणत्याही शासकीय नियमात व लाल फितीत अडकून न पडता ज्यांचे नुकसान झाले आहे, त्या सर्वांना मदत करण्याचा सरकारचा मानस असल्याचे सांगत त्यांनी पूरग्रस्तांना आश्वस्त केले. तसेच मोबाइल मेडिकल प्राथमिक उपचार केंद्राचे अनावरण त्यांनी केले. तद्नंतर त्यांनी आमदार पवार यांच्या निधीतून विकसित केलेल्या विकास कामाचे अनावरण झाल्यानंतर आदिवासी बांधवांना शिधापत्रिका आणि उज्ज्वला गॅस योजनेतून गस शेगड्यांचे वितरण केले. अखेर त्यांनी महाराष्ट्र राज्य शालेय क्रीडा संघर्ष समितीच्या बैठकीला हजेरी लावली. यावेळी विविध शाळेचे मुख्याध्यापक उपस्थित होते. या मुख्याध्यापकांनी प्राथमिक शाळेला जोडलेले आठवीचे वर्ग बंद करण्याची मागणी केली, तर शालेय स्पर्धेत एसएससी बोर्डाच्या विद्यार्थ्यांवर अन्याय होत असल्याची तक्रार करत यावर तोडगा काढण्याची मागणी केली. त्यावर शेलार यांनी विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त स्पर्धा खेळता याव्यात यासाठी स्पर्धांची संख्या वाढविण्याचा विचार शासनाच्या विचाराधीन असून दुसरीकडे मैदाने आणि क्रीडा संकुलाच्या विकासासाठी निधीची तरतूद, खेळाडूंना प्रशिक्षण देण्यासाठी उत्कृष्ट प्रशिक्षकाची नेमणूक करण्यात आल्याचे स्पष्ट केले. तसेच सर्व स्पर्धा सर्व खेळाडूंसाठी खुल्या करण्याबाबत विचार करण्याचे आश्वासन दिले.