म. टा. वृत्तसेवा, पालघर
डहाणूतील आदिवासी सेवक आणि वनश्री पुरस्काराने गौरविण्यात आलेले सामाजिक कार्यकर्ते बाबूभाई उर्फ हुकमीचंद हिराचंद शेठीया यांचे सोमवारी डहाणू येथे राहत्या घरी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ७१ वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, एक मुलगी असा परिवार आहे. बाबूभाई यांच्या निधनाचे वृत्त कळताच डहाणूतील हजारो नागरिक त्यांच्या अंत्यदर्शनासाठी दाखल झाले.
बाबूभाई सेठीया यांनी पाड्यापाड्यावर जाऊन समाजसेवा केली. राजकारणापासून कायम अलप्ति राहलिेले बाबूभाई लोकप्रयि होते. त्यांनी आदिवासींसाठी शैक्षणिक, आरोग्य, पर्यावरण विषयक क्षेत्रात केलेल्या कामासाठी त्यांना विविध सामाजिक संस्थांकडून जवळपास ६० हून अधिक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते.
आमदार आनंद ठाकूर, आमदार पास्कल धनारे, आमदार अमित घोडा यांच्यासह सरकारी अधिकारी, कर्मचारी तसेच विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी आणि हजारो नागरिकंनी त्यांचे अंत्यदर्शन घेतले.
बाबूभाई शेठीया यांनी आपले संपूर्ण जीवन लोकसेवेसाठी वाहून घेतले होते. आदिवासी समाजातील लोकांना त्यांचा मोठा आधार होता. त्यांनी कॅन्सरपीडति रुग्णांना मोफत सेवा उपलब्ध करून दिली होती. तसेच त्यांच्या पुढाकाराने दर रविवारी डहाणूमध्ये विनामूल्य आरोग्य शिबीर आयोजति केले जात असे.
डहाणूतील आदिवासी सेवक आणि वनश्री पुरस्काराने गौरविण्यात आलेले सामाजिक कार्यकर्ते बाबूभाई उर्फ हुकमीचंद हिराचंद शेठीया यांचे सोमवारी डहाणू येथे राहत्या घरी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ७१ वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, एक मुलगी असा परिवार आहे. बाबूभाई यांच्या निधनाचे वृत्त कळताच डहाणूतील हजारो नागरिक त्यांच्या अंत्यदर्शनासाठी दाखल झाले.
बाबूभाई सेठीया यांनी पाड्यापाड्यावर जाऊन समाजसेवा केली. राजकारणापासून कायम अलप्ति राहलिेले बाबूभाई लोकप्रयि होते. त्यांनी आदिवासींसाठी शैक्षणिक, आरोग्य, पर्यावरण विषयक क्षेत्रात केलेल्या कामासाठी त्यांना विविध सामाजिक संस्थांकडून जवळपास ६० हून अधिक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते.
आमदार आनंद ठाकूर, आमदार पास्कल धनारे, आमदार अमित घोडा यांच्यासह सरकारी अधिकारी, कर्मचारी तसेच विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी आणि हजारो नागरिकंनी त्यांचे अंत्यदर्शन घेतले.
बाबूभाई शेठीया यांनी आपले संपूर्ण जीवन लोकसेवेसाठी वाहून घेतले होते. आदिवासी समाजातील लोकांना त्यांचा मोठा आधार होता. त्यांनी कॅन्सरपीडति रुग्णांना मोफत सेवा उपलब्ध करून दिली होती. तसेच त्यांच्या पुढाकाराने दर रविवारी डहाणूमध्ये विनामूल्य आरोग्य शिबीर आयोजति केले जात असे.