म. टा. वृत्तसेवा, बदलापूर
वांगणी आणि बदलापूरच्या ग्रामीण भागाला बदलापूर शहराशी जोडण्यासाठी सुरू करण्यात आलेली बदलापूर-वांगणी ही बससेवा बंद करण्यात आली. त्यामुळे येथील ग्रामस्थांना, विद्यार्थ्यांना आणि बदलापूरकडे येणाऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. मार्ग तोट्यात जात असल्याने हा निर्णय घेतल्याचे स्पष्टीकरण राज्य परिवहन महामंडळाचे अधिकारी देत आहेत.
बदलापूर शहरानंतर वांगणीला पसंती वाढत गेली. त्यातून वांगणी ग्रामपंचायतीची वाटचाल शहराकडे होत आहे. कर्जत महामार्गही बदलापूर आणि वांगणी शहराला जोडतो आहे. त्यामुळे बदलापूर ते वांगणी दरम्यानच्या कर्जत महामार्गावर मोठ्या बांधकाम कंपन्यांची गृहसंकुले उभी राहत आहेत.
त्यामुळे भविष्यात येथे लोकसंख्या वाढण्याची शक्यता आहे. बदलापूरशी ग्रामीण भागाचा संपर्क वाढावा, या उद्देशाने बदलापूर-वांगणी बससेवा सुरू करण्यात आली. चामटोली, कासगाव, गोरेगाव, कुडसावरे आणि वांगणी अशा गावांच्या नागरिकांना या बससेवेचा फायदा होत होता. त्याचसोबत ग्रामीण भागातील विद्यार्थी, कामगार आणि शेतकऱ्यांनाही या बससेवेचा चांगला फायदा होत होता. मात्र गेल्या आठ ते दहा दिवसांपासून ही बससेवा बंद करण्याचा निर्णय विठ्ठलवाडी आगार व्यवस्थापनाने घेतला आहे. नोकरदारांना बदलापूरवरून लोकल पकडण्यासाठी या बसचा उपयोग होत होता. इंग्रजी शाळांसाठी बदलापूरला येण्यासाठीही विद्यार्थ्यांना शाळेच्या खासगी बससेवेपेक्षा ही बससेवा फायदेशीर होती. मात्र ती बंद झाल्याने त्यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
याबाबत विठ्ठलवाडी आगाराचे प्रमुख एम. जे. जुमळे यांना विचारले असता, सध्या विठ्ठलवाडी आगाराच्या पाच बस या भागात चालतात. त्यातील वांगणी-बदलापूर मार्गाचे उत्पन्न अवघे ४० टक्क्यांवर आले होते. डिझेलचा खर्चही वसूल होत नसल्याने या तोट्यात जाणाऱ्या मार्गावरची बससेवा बंद करण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.
वांगणी आणि बदलापूरच्या ग्रामीण भागाला बदलापूर शहराशी जोडण्यासाठी सुरू करण्यात आलेली बदलापूर-वांगणी ही बससेवा बंद करण्यात आली. त्यामुळे येथील ग्रामस्थांना, विद्यार्थ्यांना आणि बदलापूरकडे येणाऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. मार्ग तोट्यात जात असल्याने हा निर्णय घेतल्याचे स्पष्टीकरण राज्य परिवहन महामंडळाचे अधिकारी देत आहेत.
बदलापूर शहरानंतर वांगणीला पसंती वाढत गेली. त्यातून वांगणी ग्रामपंचायतीची वाटचाल शहराकडे होत आहे. कर्जत महामार्गही बदलापूर आणि वांगणी शहराला जोडतो आहे. त्यामुळे बदलापूर ते वांगणी दरम्यानच्या कर्जत महामार्गावर मोठ्या बांधकाम कंपन्यांची गृहसंकुले उभी राहत आहेत.
त्यामुळे भविष्यात येथे लोकसंख्या वाढण्याची शक्यता आहे. बदलापूरशी ग्रामीण भागाचा संपर्क वाढावा, या उद्देशाने बदलापूर-वांगणी बससेवा सुरू करण्यात आली. चामटोली, कासगाव, गोरेगाव, कुडसावरे आणि वांगणी अशा गावांच्या नागरिकांना या बससेवेचा फायदा होत होता. त्याचसोबत ग्रामीण भागातील विद्यार्थी, कामगार आणि शेतकऱ्यांनाही या बससेवेचा चांगला फायदा होत होता. मात्र गेल्या आठ ते दहा दिवसांपासून ही बससेवा बंद करण्याचा निर्णय विठ्ठलवाडी आगार व्यवस्थापनाने घेतला आहे. नोकरदारांना बदलापूरवरून लोकल पकडण्यासाठी या बसचा उपयोग होत होता. इंग्रजी शाळांसाठी बदलापूरला येण्यासाठीही विद्यार्थ्यांना शाळेच्या खासगी बससेवेपेक्षा ही बससेवा फायदेशीर होती. मात्र ती बंद झाल्याने त्यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
याबाबत विठ्ठलवाडी आगाराचे प्रमुख एम. जे. जुमळे यांना विचारले असता, सध्या विठ्ठलवाडी आगाराच्या पाच बस या भागात चालतात. त्यातील वांगणी-बदलापूर मार्गाचे उत्पन्न अवघे ४० टक्क्यांवर आले होते. डिझेलचा खर्चही वसूल होत नसल्याने या तोट्यात जाणाऱ्या मार्गावरची बससेवा बंद करण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.