दुकानाची तोडफोड, चौघांविरुद्ध गुन्हा
म. टा. वृत्तसेवा, उल्हासनगर
अंबरनाथ, उल्हासनगर या परिसरात अतिवेगाने बाइक चालवणाऱ्या बाइकस्वारांना आवरण्यात पोलिस प्रशासन अपयशी ठरत आहे. त्यामुळे त्यांच्याकडून होणाऱ्या गुन्ह्यांत वाढ होत आहे. मागील आठवड्यात प्राध्यापकाला मारहाण, महिलेला धडक, अशा घटना घडल्यानंतर वेगाने बाइक चालवण्यावरून हटकल्याच्या रागातून दोन बाइकवरील चार तरुणांनी दुकानदाराच्या दुकानाची तोडफोड करत त्याला मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. या तरुणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असला तरी बाइकर्सच्या दहशतीमुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेचे वातावरण आहे.
उल्हासनगर शहरात मोठ्या प्रमाणात दुचाकींचा वावर असतो, त्यात शहरातील अनेक भागांत संध्याकाळी तसेच रात्रीच्या सुमारास तरुण टोळक्यांकडून वेगाने बाइक चालवली जात असल्यामुळे नागरिक मेटाकुटीला आले आहेत. रस्त्यावरून चालताना नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. नुकतेच मागील आठवड्यात अंबरनाथ, उल्हासनगर या दोन शहरांत बाइकस्वारांकडून दोन घटना समोर आल्या होत्या. यात पेट्रोल पंपावर एका प्राध्यापकाला बेदम मारहाण केल्याचे तसेच एका महिलेला धडक दिल्याचे प्रकरण समोर आले होते. मात्र या प्रकरणानंतर पोलिसांनी तात्पुरती कारवाई करत भविष्यात बायकस्वारांवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन सहाय्यक वाहतूक पोलिस आयुक्त बाबासाबेर आव्हाड यांनी दिले होते. मात्र तोच उल्हासनगर कॅम्प नंबर चार परिसरातील मराठा सेक्शन परिसरात असलेल्या साई आराध्या अॅक्युरिअम दुकानात मोहनीश सावंत आणि सुनिल गावडे हे दोघे तरुण बसले होते. यावेळी रस्त्यावरून आकाश आणि गुड्डू हे दोघे आणि त्यांचे साथीदार अतिवेगाने दुचाकीवरून जात होते. यावेळी दुचाकींचा वेग पाहून मोहनीश याने या बायकस्वारांना बाइक कमी वेगाने चालवण्याचा सल्ला दिला. मात्र यावरून राग आलेल्या आकाश आणि गुड्डू तसेच त्यांच्या इतर दोन साथीदारांनी मोहनीश याला शिविगाळ करत मारहाण करण्यास सुरुवात केली. तसेच त्याच्या दुकानाबाहेर ठेवलेल्या सामानाचीही तोडफोड केली. यावेळी मारहाण करताना या तरुणांनी मोहनीशच्या दुकानाच्या गल्ल्यातील पाच हजार रुपयांची रक्कम पळवली. या प्रकारामुळे शहरातील बायकस्वारांचा उच्छाद पुन्हा समोर आला आहे. मात्र वाहतूक पोलिस या तरुणांना आवरण्यात अपयशी ठरत असल्याचेच या घटनेवरून समोर आले आहे.
या प्रकरणी आकाश, गुड्डू आणि इतर दोन जण असे चौघांविरोधात विठ्ठलवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या बाइकस्वारांविरोधात तत्काळ कारवाई करण्याची मागणी करत आहे.
म. टा. वृत्तसेवा, उल्हासनगर
अंबरनाथ, उल्हासनगर या परिसरात अतिवेगाने बाइक चालवणाऱ्या बाइकस्वारांना आवरण्यात पोलिस प्रशासन अपयशी ठरत आहे. त्यामुळे त्यांच्याकडून होणाऱ्या गुन्ह्यांत वाढ होत आहे. मागील आठवड्यात प्राध्यापकाला मारहाण, महिलेला धडक, अशा घटना घडल्यानंतर वेगाने बाइक चालवण्यावरून हटकल्याच्या रागातून दोन बाइकवरील चार तरुणांनी दुकानदाराच्या दुकानाची तोडफोड करत त्याला मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. या तरुणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असला तरी बाइकर्सच्या दहशतीमुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेचे वातावरण आहे.
उल्हासनगर शहरात मोठ्या प्रमाणात दुचाकींचा वावर असतो, त्यात शहरातील अनेक भागांत संध्याकाळी तसेच रात्रीच्या सुमारास तरुण टोळक्यांकडून वेगाने बाइक चालवली जात असल्यामुळे नागरिक मेटाकुटीला आले आहेत. रस्त्यावरून चालताना नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. नुकतेच मागील आठवड्यात अंबरनाथ, उल्हासनगर या दोन शहरांत बाइकस्वारांकडून दोन घटना समोर आल्या होत्या. यात पेट्रोल पंपावर एका प्राध्यापकाला बेदम मारहाण केल्याचे तसेच एका महिलेला धडक दिल्याचे प्रकरण समोर आले होते. मात्र या प्रकरणानंतर पोलिसांनी तात्पुरती कारवाई करत भविष्यात बायकस्वारांवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन सहाय्यक वाहतूक पोलिस आयुक्त बाबासाबेर आव्हाड यांनी दिले होते. मात्र तोच उल्हासनगर कॅम्प नंबर चार परिसरातील मराठा सेक्शन परिसरात असलेल्या साई आराध्या अॅक्युरिअम दुकानात मोहनीश सावंत आणि सुनिल गावडे हे दोघे तरुण बसले होते. यावेळी रस्त्यावरून आकाश आणि गुड्डू हे दोघे आणि त्यांचे साथीदार अतिवेगाने दुचाकीवरून जात होते. यावेळी दुचाकींचा वेग पाहून मोहनीश याने या बायकस्वारांना बाइक कमी वेगाने चालवण्याचा सल्ला दिला. मात्र यावरून राग आलेल्या आकाश आणि गुड्डू तसेच त्यांच्या इतर दोन साथीदारांनी मोहनीश याला शिविगाळ करत मारहाण करण्यास सुरुवात केली. तसेच त्याच्या दुकानाबाहेर ठेवलेल्या सामानाचीही तोडफोड केली. यावेळी मारहाण करताना या तरुणांनी मोहनीशच्या दुकानाच्या गल्ल्यातील पाच हजार रुपयांची रक्कम पळवली. या प्रकारामुळे शहरातील बायकस्वारांचा उच्छाद पुन्हा समोर आला आहे. मात्र वाहतूक पोलिस या तरुणांना आवरण्यात अपयशी ठरत असल्याचेच या घटनेवरून समोर आले आहे.
या प्रकरणी आकाश, गुड्डू आणि इतर दोन जण असे चौघांविरोधात विठ्ठलवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या बाइकस्वारांविरोधात तत्काळ कारवाई करण्याची मागणी करत आहे.