अ‍ॅपशहर

कवटीवर चेहरा तयार करत हत्येची उकल

अंबरनाथ येथील जावसई परिसरातील डोंगरावर १० एप्रिल रोजी एका व्यक्तीची हत्या झाली होती. या हत्येत शिर धडावेगळे करत चेहरा विद्रुप करण्यात आला. मृत व्यक्तीच्या हातावरील नावावरून तपासाचा प्रयत्नही असफल झाला. अखेर कवटीच्या आधारे मिळता जुळता चेहरा तयार करण्याचे तंत्र वैद्याकशास्त्राच्या मदतीने वापरण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला नि आरोपीपर्यंत पोहोचणे त्यांना शक्य झाले.

Maharashtra Times 14 Dec 2018, 6:36 am
म. टा. वृत्तसेवा, अंबरनाथ
महाराष्ट्र टाइम्स.कॉम beware of murder by creating a matching face
कवटीवर चेहरा तयार करत हत्येची उकल


अंबरनाथ येथील जावसई परिसरातील डोंगरावर १० एप्रिल रोजी एका व्यक्तीची हत्या झाली होती. या हत्येत शिर धडावेगळे करत चेहरा विद्रुप करण्यात आला. मृत व्यक्तीच्या हातावरील नावावरून तपासाचा प्रयत्नही असफल झाला. अखेर कवटीच्या आधारे मिळता जुळता चेहरा तयार करण्याचे तंत्र वैद्याकशास्त्राच्या मदतीने वापरण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला नि आरोपीपर्यंत पोहोचणे त्यांना शक्य झाले. थ्री डायमेन्शन सुपर इंपोझिशन या तंत्रज्ञानाच्या हत्येचा उलगडा करण्यात आला. अनैतिक संबंधांमुळे पत्नीच्या प्रियकराने तिच्या पतीची निर्घृण हत्या केल्याची माहिती परिमंडळ चारचे पोलिस उपायुक्त प्रमोदकुमार शेवाळे यांनी दिली आहे.

हत्येचा उलगडा करण्यासाठी पोलिसांनी मृत व्यक्तीच्या कवटीआधारे तिचा मिळता जुळता चेहरा बनवण्यासाठी वैद्यकीय शास्त्राची मदत घेतली. यासाठी केईएम रुग्णालयाचे प्राध्यापक आणि हेड ऑफ फॉरेन्सिक विभागातील डॉ. हरिष पाटील, डॉ. हेमलता पांडे, डॉ. मनोज पारचके डॉ. शशांक त्यागी यांनी आपल्या कौशल्याचा वापर करत थ्री डायमेन्शन सुपर इंपोझिशन या वैद्यकीय तंत्रज्ञानाच्या साहाय्याने मृत व्यक्तीचा ९० टक्के हुबेहुब चेहरा तयार केला. पोलिसांनी या चेहऱ्याआधारे वृत्तपत्र तसेच विविध माध्यमातून नागरिकांना या व्यक्तीची ओळख पटवण्यासाठी आवाहन केले होते. अखेर एका व्यक्तीने पोलिसांच्या जाहिरातीवरून मृत व्यक्तीच्या मिळत्या जुळत्या चेहऱ्याची एक व्यक्ती अंबरनाथ येथून मागील काही दिवसांपासून दिसत नसल्याची पोलिसांना माहिती दिली. या माहितीआधारे पोलिसांनी त्या व्यक्तीचे नातेवाईक आणि त्याच्या कुटुंबियांशी संपर्क केला. मृत व्यक्तीच्या हातावरील चांद या नावावरून हत्या झालेला मृत व्यक्ती बिन्द्रेश प्रजापती असल्याचे उघड झाले. तसेच याबाबत त्याची पत्नी सविता हीची पोलिसांनी चौकशी केली असता, तिने तो बेंगळुरू येथे नोकरीसाठी गेला असल्याची बतावणी पोलिसांना केली. मात्र पोलिसांनी पाळत ठेवली असता किसनकुमार कनोजिया या व्यक्तीचे मृत बिन्द्रेश याच्या पत्नीशी अनैतिक संबंध असल्याची माहिती समोर आली होती. पत्नीच्या अनैतिक संबंधाबाबत पतीला माहिती मिळाल्याने, त्याचा काटा काढण्यासाठी किसनकुमार कनोजिया आणि त्याचा मित्र राजेश यादव यांनी १० एप्रिल रोजी बिन्द्रेश याला दारू पाजत जावसई येथील डोंगरावर तो मद्यधुंद अवस्थेत त्याचे शिर धडावेगळे करत हत्या केली होती. या हत्ये प्रकरणी पोलिसांनी बिन्द्रेशच्या पत्नीसह दोन आरोपींना अटक केली आहे. एसीपी सुनील पाटील, गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक नरेंद्र पाटील आणि वरिष्ठ पोलिस निरीक्षक काशिनाथ चव्हाण यांनी या प्रकरणाचा उलगडा करण्यात मोलाची कामगिरी केली आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज