ठाणे: भिवंडीत धोकादायक स्थितीत असलेली चार मजली इमारत कोसळून दोन जणांचा मृत्यू झाला असून पाच जण जखमी आहेत. २४ ऑगस्टच्या (शनिवार) मध्यरात्री शांतीनगर पिराणापाडा या परिसरात ही इमारत दुर्घटना घडली.
सिराज अहमद अन्सारी आणि २२ वर्षीय आखीब ही मृत झालेल्या व्यक्तींची नावं असून जखमींना इंदिरा गांधी शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. तर पाच ते सहा नागरिक अजूनही ढिगाऱ्याखाली अडकल्याचं सांगितलं जात आहे.
शुक्रवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास या इमारतीला तडे गेल्याचे रहिवाशांच्या निदर्शनास आले. रहिवाशांनी तत्काळ महानगरपालिकेच्या आपत्कालीन कक्षाला याची कल्पना दिली. यानंतर आपत्कालीन कक्ष, अग्निशामक दलाचे अधिकारी आणि जवान घटनास्थळी दाखल झाले. रहिवाशांना इमारतीतून बाहेर काढण्यात येत असतानाच इमारत कोसळली. यात आपत्कालीन विभागाचे कर्मचारी आणि पोलिस कर्मचारी जखमी झाले आहे.
सिराज अहमद अन्सारी आणि २२ वर्षीय आखीब ही मृत झालेल्या व्यक्तींची नावं असून जखमींना इंदिरा गांधी शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. तर पाच ते सहा नागरिक अजूनही ढिगाऱ्याखाली अडकल्याचं सांगितलं जात आहे.
शुक्रवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास या इमारतीला तडे गेल्याचे रहिवाशांच्या निदर्शनास आले. रहिवाशांनी तत्काळ महानगरपालिकेच्या आपत्कालीन कक्षाला याची कल्पना दिली. यानंतर आपत्कालीन कक्ष, अग्निशामक दलाचे अधिकारी आणि जवान घटनास्थळी दाखल झाले. रहिवाशांना इमारतीतून बाहेर काढण्यात येत असतानाच इमारत कोसळली. यात आपत्कालीन विभागाचे कर्मचारी आणि पोलिस कर्मचारी जखमी झाले आहे.