भाजप कोअर कमिटीची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
म. टा. वृत्तसेवा, अंबरनाथ
अंबरनाथ विधानसभेची जागा भाजपला सोडण्यात यावी, अशी आग्रहाची मागणी अंबरनाथ भाजपच्या कोअर कमिटीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. या मागणीसाठी बुधवारी भाजपच्या कोअर कमिटीने पत्रकार परिषदेत याबाबत मागणी केली आहे. त्यामुळे एकीकडे युतीचे संकेत दिले जात असताना, दुसरीकडे शिवसेनेचा विद्यमान आमदार असतानाही भाजपने या विधानसभेची मागणी केल्याने आगामी अंबरनाथ नगरपालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टीने भाजपने व्यूहरचना आखण्यास सुरुवात केल्याचे बोलले जात आहे.
राज्यात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजणार असून, एकीकडे युती आणि आघाडी होण्यासाठी सर्वच राजकीय पक्ष प्रयत्न करत आहेत. मात्र वाटाघाटीत अनेक मतदारसंघांवर एकमेकांच्या जागांवर शिवसेना-भाजप दावा सांगत आहेत. यासाठी अंबरनाथ भाजप कोअर कमिटीने बुधवारी पत्रकार परिषद आयोजित करत अंबरनाथ विधानसभेची जागा भाजपला सोडावी, यासाठी मुख्यमंत्र्यांकडे आग्रही मागणी केली आहे. २०१४च्या निवडणुकीत भाजपचा उमेदवार अवघ्या दोन हजार मतांनी पराभूत झाला होता. तर नगरपालिका निवडणुकीतही भाजप नगरसेवकांचा आकडा एक वरून ११ वर गेला आहे. त्यामुळे अंबरनाथ विधानसभा क्षेत्रात भाजपची ताकद वाढली असून, मतदारसंघ भाजपला द्यावा, यासाठी स्थानिक पातळीवरील नेते प्रयत्न करत आहेत. मात्र भाजप विधानसभेच्या जागेची जरी मागणी करत असली तरी भाजप येत्या अंबरनाथ नगरपालिकेत होणाऱ्या नगराध्यक्षपदाच्या जागेसाठी रणनिती आखत असल्याचे बोलले जात आहे. गेल्या दहा वर्षांपासून अंबरनाथ विधानसभेवर शिवसेनेचे विद्यमान आमदार डॉ. बाजाली किणीकर हे निवडून येत आहेत. मात्र भाजपने अचानक अंबरनाथ विधानसभेवर आपला दावा सांगितल्याने अनेक चर्चांना उधाण आले असून, भाजपच्या कोअर कमिटीच्या अंबरनाथ विधानसभेची जागा भाजपला सोडण्याच्या मागणीवर मुख्यमंत्री खरेच काही निर्णय घेतात का, याकडे लक्ष लागले आहे.
म. टा. वृत्तसेवा, अंबरनाथ
अंबरनाथ विधानसभेची जागा भाजपला सोडण्यात यावी, अशी आग्रहाची मागणी अंबरनाथ भाजपच्या कोअर कमिटीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. या मागणीसाठी बुधवारी भाजपच्या कोअर कमिटीने पत्रकार परिषदेत याबाबत मागणी केली आहे. त्यामुळे एकीकडे युतीचे संकेत दिले जात असताना, दुसरीकडे शिवसेनेचा विद्यमान आमदार असतानाही भाजपने या विधानसभेची मागणी केल्याने आगामी अंबरनाथ नगरपालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टीने भाजपने व्यूहरचना आखण्यास सुरुवात केल्याचे बोलले जात आहे.
राज्यात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजणार असून, एकीकडे युती आणि आघाडी होण्यासाठी सर्वच राजकीय पक्ष प्रयत्न करत आहेत. मात्र वाटाघाटीत अनेक मतदारसंघांवर एकमेकांच्या जागांवर शिवसेना-भाजप दावा सांगत आहेत. यासाठी अंबरनाथ भाजप कोअर कमिटीने बुधवारी पत्रकार परिषद आयोजित करत अंबरनाथ विधानसभेची जागा भाजपला सोडावी, यासाठी मुख्यमंत्र्यांकडे आग्रही मागणी केली आहे. २०१४च्या निवडणुकीत भाजपचा उमेदवार अवघ्या दोन हजार मतांनी पराभूत झाला होता. तर नगरपालिका निवडणुकीतही भाजप नगरसेवकांचा आकडा एक वरून ११ वर गेला आहे. त्यामुळे अंबरनाथ विधानसभा क्षेत्रात भाजपची ताकद वाढली असून, मतदारसंघ भाजपला द्यावा, यासाठी स्थानिक पातळीवरील नेते प्रयत्न करत आहेत. मात्र भाजप विधानसभेच्या जागेची जरी मागणी करत असली तरी भाजप येत्या अंबरनाथ नगरपालिकेत होणाऱ्या नगराध्यक्षपदाच्या जागेसाठी रणनिती आखत असल्याचे बोलले जात आहे. गेल्या दहा वर्षांपासून अंबरनाथ विधानसभेवर शिवसेनेचे विद्यमान आमदार डॉ. बाजाली किणीकर हे निवडून येत आहेत. मात्र भाजपने अचानक अंबरनाथ विधानसभेवर आपला दावा सांगितल्याने अनेक चर्चांना उधाण आले असून, भाजपच्या कोअर कमिटीच्या अंबरनाथ विधानसभेची जागा भाजपला सोडण्याच्या मागणीवर मुख्यमंत्री खरेच काही निर्णय घेतात का, याकडे लक्ष लागले आहे.