राज्य संघटनमंत्र्यांची नाराजी
म. टा. वृत्तसेवा, अंबरनाथ
सरकारने केलेली कामे आणि पक्षवाढीसाठी पंडित दिनदयाळ उपाध्याय जन्मशताब्दी वर्षानिमित्त भाजपतर्फे एका प्रशिक्षण शिबिरात कार्यकर्त्यांना विस्तारकाची जबाबदारी देण्यासाठी बोलावण्यात आली होती. मात्र नुकतेच अंबरनाथ येथे पार पडलेल्या शिबिरात राज्य संघटनमंत्र्यांच्या उपस्थितीत परगावी विस्तारक म्हणून जाण्यास उपस्थितांपैकी मोजकेच कार्यकर्ते उत्साही असल्याचे दिसले. त्यामुळे विस्तारकांच्या शोधात भाजपची दमछाक होत असल्याची चर्चा पक्षातच सुरू आहे.
देशात केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता आहे. त्यामुळे सरकारने कार्यकाळात केलेल्या विकासकामांची आणि योजनांची माहिती तळागळातील जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी भाजप विविध उपक्रम राबवत आहे. याच अंतर्गत पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त भाजप ठाणे जिल्हा ग्रामीण यांच्यातर्फे अंबरनाथ येथे पक्षाच्या कार्यकर्त्यांसाठी प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आले होते. यावेळी पक्षाची आणि सरकारने केलेली कामे जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी उपस्थित कार्यकर्त्यांना राज्य संघटन मंत्री आणि पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी मार्गदर्शन केले. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांची राज्यभरात पक्ष आणि सरकारने केलेली कामे तसेच योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी विस्तारक म्हणून पाठवण्यात येणार आहे. मात्र भाजपच्या ठाणे जिल्हा ग्रामीणमध्ये हजारो कार्यकर्ते असताना विस्तारक म्हणून केवळ २७८ जणांनीच विस्तारकासाठी नोंदणी केल्याची माहिती सूत्रांनी दिली. तर, यावेळी संघटनमंत्र्यांनी विस्तारक म्हणून जाण्यास कितीजण उत्सुक असल्याचे विचारताच केवळ ९४ कार्यकर्त्यांनीच हात वर केले. त्यामुळे संघटनमंत्र्यांनी ग्रामीण जिल्हाध्यक्षांना २७८ जणांची यादी दिली असताना केवळ ९४ जणांनीच हात वर केल्याचे पाहून नाराजी व्यक्त केल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या प्राशिक्षण शिबिराला शेकडो कार्यकर्ते उपस्थित असताना, केवळ ९४ जणांनीच विस्तारक म्हणून जाण्यासाठी उत्साह दर्शवला असताना मोठ्या प्रामाणात कार्यकर्त्यांमध्ये जाण्याबाबत निरुत्साह असल्याचेच यावेळी पाहायला मिळाले. त्यामुळे वरिष्ठांच्या दट्ट्यानंतर विस्तारकांची संख्या वाढते का हे पाहावे लागणार असून, खरेच हे विस्तारक सरकारने केलेली कामे जनतेपर्यंत पोहोचवतात की केवळ एक सहल म्हणून नेमून दिलेल्या गावात हजेरी लावतात, याबाबत शंका आहे.
म. टा. वृत्तसेवा, अंबरनाथ
सरकारने केलेली कामे आणि पक्षवाढीसाठी पंडित दिनदयाळ उपाध्याय जन्मशताब्दी वर्षानिमित्त भाजपतर्फे एका प्रशिक्षण शिबिरात कार्यकर्त्यांना विस्तारकाची जबाबदारी देण्यासाठी बोलावण्यात आली होती. मात्र नुकतेच अंबरनाथ येथे पार पडलेल्या शिबिरात राज्य संघटनमंत्र्यांच्या उपस्थितीत परगावी विस्तारक म्हणून जाण्यास उपस्थितांपैकी मोजकेच कार्यकर्ते उत्साही असल्याचे दिसले. त्यामुळे विस्तारकांच्या शोधात भाजपची दमछाक होत असल्याची चर्चा पक्षातच सुरू आहे.
देशात केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता आहे. त्यामुळे सरकारने कार्यकाळात केलेल्या विकासकामांची आणि योजनांची माहिती तळागळातील जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी भाजप विविध उपक्रम राबवत आहे. याच अंतर्गत पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त भाजप ठाणे जिल्हा ग्रामीण यांच्यातर्फे अंबरनाथ येथे पक्षाच्या कार्यकर्त्यांसाठी प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आले होते. यावेळी पक्षाची आणि सरकारने केलेली कामे जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी उपस्थित कार्यकर्त्यांना राज्य संघटन मंत्री आणि पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी मार्गदर्शन केले. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांची राज्यभरात पक्ष आणि सरकारने केलेली कामे तसेच योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी विस्तारक म्हणून पाठवण्यात येणार आहे. मात्र भाजपच्या ठाणे जिल्हा ग्रामीणमध्ये हजारो कार्यकर्ते असताना विस्तारक म्हणून केवळ २७८ जणांनीच विस्तारकासाठी नोंदणी केल्याची माहिती सूत्रांनी दिली. तर, यावेळी संघटनमंत्र्यांनी विस्तारक म्हणून जाण्यास कितीजण उत्सुक असल्याचे विचारताच केवळ ९४ कार्यकर्त्यांनीच हात वर केले. त्यामुळे संघटनमंत्र्यांनी ग्रामीण जिल्हाध्यक्षांना २७८ जणांची यादी दिली असताना केवळ ९४ जणांनीच हात वर केल्याचे पाहून नाराजी व्यक्त केल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या प्राशिक्षण शिबिराला शेकडो कार्यकर्ते उपस्थित असताना, केवळ ९४ जणांनीच विस्तारक म्हणून जाण्यासाठी उत्साह दर्शवला असताना मोठ्या प्रामाणात कार्यकर्त्यांमध्ये जाण्याबाबत निरुत्साह असल्याचेच यावेळी पाहायला मिळाले. त्यामुळे वरिष्ठांच्या दट्ट्यानंतर विस्तारकांची संख्या वाढते का हे पाहावे लागणार असून, खरेच हे विस्तारक सरकारने केलेली कामे जनतेपर्यंत पोहोचवतात की केवळ एक सहल म्हणून नेमून दिलेल्या गावात हजेरी लावतात, याबाबत शंका आहे.