अ‍ॅपशहर

वाचनचळवळ ठाण्यातही

तब्बल पन्नास हजारांहून अधिक पुस्तकांच्या आदानप्रदानानंतर वाचनसोहळा पुढील महिन्यात ठाण्यात रंगणार आहे. डोंबिवलीतील वाचनमहोत्सवात आठ दिवसांत तब्बल पन्नास हजारांहून अधिक पुस्तकांचे आदानप्रदान झाले असून साडेपाच हजार वाचकांच्या उपस्थितीत हा सोहळा साजरा झाला.

Maharashtra Times 17 Apr 2017, 4:00 am
डोंबिवलीतील यशस्वी आदानप्रदानानंतर निर्धार
महाराष्ट्र टाइम्स.कॉम book exchange programme in thane
वाचनचळवळ ठाण्यातही


म. टा. वृत्तसेवा, ठाणे

तब्बल पन्नास हजारांहून अधिक पुस्तकांच्या आदानप्रदानानंतर वाचनसोहळा पुढील महिन्यात ठाण्यात रंगणार आहे. डोंबिवलीतील वाचनमहोत्सवात आठ दिवसांत तब्बल पन्नास हजारांहून अधिक पुस्तकांचे आदानप्रदान झाले असून साडेपाच हजार वाचकांच्या उपस्थितीत हा सोहळा साजरा झाला.

वाचन परंपरेचा प्रसार व्हावा आणि एकाच वेळी विविध विषयांतील पुस्तकांचे आदानप्रदान वाचकांत घडवून आणावे, यासाठी फ्रेन्ड्स लायब्ररी, टिळकनगर शिक्षण प्रसारक संस्था आणि डोंबिवलीकर सांस्कृतिक परिवार यांच्यातर्फे आयोजित करण्यात आलेल्या पुस्तक आदानप्रदान सोहळ्याचा समारोप रविवारी झाला. आठवडाभर डोंबिवलीत रंगलेल्या या वाचनसोहळ्याच्या अखेरीस तब्बल पन्नास हजार पुस्तकांचे आदानप्रदान नोंद घेण्यात आली. फ्रेन्ड्स लायब्ररीचे पुंडलिक पै, टिळकनगर शिक्षण प्रसार संस्थेचे विश्वस्त आबासाहेब पटवारी आणि कार्यवाह डॉ. महेश ठाकूर तसेच सदस्य माधव जोशी यांनी ही घोषणा केली. देशात पहिल्यांदाच अशा स्वरूपाचा वाचनमहोत्सव साजरा झाला असून आठ दिवसांत त्याला तब्बल साडेपाच हजारांहून अधिक वाचकांनी त्याला हजेरी लावली. त्यामध्ये पन्नास हजारांहून अधिक पुस्तकांचे आदानप्रदान करण्यात आले.

अनुवादित साहित्याला पसंती

इंग्रजीपेक्षा मराठी पुस्तकांना वाचकांची अधिक पसंती मिळाली असून ऐतिहासिक आणि अनुवादित या दोन प्रकारांना सर्वाधिक मागणी असल्याचे यानिमित्ताने सिद्ध झाले. समारोपाच्या अखेरपर्यंत वाचकांनी पुस्तके बदलण्यास उत्साहाने गर्दी केली होती. वाचकांची मागणी आणि उपक्रमाला मोठ्या प्रमाणात दिलेली पसंती लक्षात घेत ही वाचनचळवळ ठाण्यात आयोजित करण्यात येणार असल्याची घोषणा आयोजकांतर्फे करण्यात आली. डोंबिवलीपाठोपाठ पुढील महिन्यात ठाण्यात हा सोहळा रंगणार आहे. महोत्सवाची तारीख आणि ठिकाण यांची अद्याप निश्चिती झाले नसून त्याबाबत लवकरच घोषणा होईल, मात्र मे महिन्यात ठाणेकरांना पुस्तकांचे आदानप्रदान अनुभवता येईल, असे पुंडलिक पै यांनी सांगितले.

कार्यक्रमालाही पसंती

पुस्तकांच्या आदानप्रदानासह साहित्यानंद या सत्रात साहित्याशी निगडित विविद कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. प्रकाशक, लेखक, मुखपृष्ठकार यांच्या व्याख्यानांना वाचकांनी गर्दी केली होती. त्याखेरीज बालसंस्कार, विविध कार्यशाळा यांमुळे सर्व वयोगटातील वाचकांचा सहभाग असल्याचे महोत्सवाच्या समारोपाच्या निमित्ताने जाहिर करण्यात आले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज