टाइम्स वृत्त, ठाणे
लोकलच्या दारात उभं राहून स्टंटबाजी करणारा एक तरूण तोल जाऊन ठाण्याच्या खाडीत पडल्याची घटना रविवारी संध्याकाळी घडली. हा मुलगा अजूनही बेपत्ता असून तो खाडीत बुडाल्याची भीती व्यक्त होतेय.
सीएसटी-कल्याण लोकलमधून पाच कॉलेजवयीन मित्र प्रवास करत होते. दाराला लटक, बाहेरच्या पोलवर हात मार, पाय लांब कर, असे जीवघेणा खेळ ते करत होते. पाचच्या सुमारास लोकलनं ठाणे स्टेशन सोडलं. ठाणे खाडी येईपर्यंत ट्रेननं चांगलाच वेग घेतला होता. तेव्हाच, एका मुलाचा हात सटकून तो खाली पडला, असं प्रत्यक्षदर्शीने सांगितलं.
लोकल कळवा स्टेशनवर थांबली, तेव्हा चार तरुणांनी पळ काढला. पण काही प्रवाशांनी रेल्वे पोलिसांशी संपर्क साधून झाल्या प्रकाराची माहिती दिली. त्यानंतर, रेल्वे पोलिसांनी ठाणे महानगरपालिकेचा आपत्कालीन व्यवस्थापन विभाग आणि अग्निशमन दलाला याबाबत कळवलं. पोलिसांच्या पथकानं खाडीच्या पुलाजवळ शोधाशोध केली, पण तो सापडला नाही. आपत्कालीन व्यवस्थापन विभागाचं पथकही रात्री उशिरापर्यंत तरुणाला शोधत होतं, पण त्याचा काहीच पत्ता लागला नव्हता.
नसती साहसं करू नका, असं पालक मंडळी, सहप्रवासी आणि रेल्वे प्रशासन कानी-कपाळी ओरडून सांगत असतानाही तरुण मुलं त्यांना न जुमानता स्टंटबाजी करताना दिसतात. ही स्टंटबाजी जिवावर बेतू शकते, हेच या घटनेतून पुन्हा स्पष्ट झालंय.
लोकलच्या दारात उभं राहून स्टंटबाजी करणारा एक तरूण तोल जाऊन ठाण्याच्या खाडीत पडल्याची घटना रविवारी संध्याकाळी घडली. हा मुलगा अजूनही बेपत्ता असून तो खाडीत बुडाल्याची भीती व्यक्त होतेय.
सीएसटी-कल्याण लोकलमधून पाच कॉलेजवयीन मित्र प्रवास करत होते. दाराला लटक, बाहेरच्या पोलवर हात मार, पाय लांब कर, असे जीवघेणा खेळ ते करत होते. पाचच्या सुमारास लोकलनं ठाणे स्टेशन सोडलं. ठाणे खाडी येईपर्यंत ट्रेननं चांगलाच वेग घेतला होता. तेव्हाच, एका मुलाचा हात सटकून तो खाली पडला, असं प्रत्यक्षदर्शीने सांगितलं.
लोकल कळवा स्टेशनवर थांबली, तेव्हा चार तरुणांनी पळ काढला. पण काही प्रवाशांनी रेल्वे पोलिसांशी संपर्क साधून झाल्या प्रकाराची माहिती दिली. त्यानंतर, रेल्वे पोलिसांनी ठाणे महानगरपालिकेचा आपत्कालीन व्यवस्थापन विभाग आणि अग्निशमन दलाला याबाबत कळवलं. पोलिसांच्या पथकानं खाडीच्या पुलाजवळ शोधाशोध केली, पण तो सापडला नाही. आपत्कालीन व्यवस्थापन विभागाचं पथकही रात्री उशिरापर्यंत तरुणाला शोधत होतं, पण त्याचा काहीच पत्ता लागला नव्हता.
नसती साहसं करू नका, असं पालक मंडळी, सहप्रवासी आणि रेल्वे प्रशासन कानी-कपाळी ओरडून सांगत असतानाही तरुण मुलं त्यांना न जुमानता स्टंटबाजी करताना दिसतात. ही स्टंटबाजी जिवावर बेतू शकते, हेच या घटनेतून पुन्हा स्पष्ट झालंय.