अ‍ॅपशहर

अंबरनाथमध्ये पूल कोसळला!

अंबरनाथ आणि कल्याण तालुक्याच्या भिसोळ-आणे गावाला जोडणारा जुना पूल अचानक कोसळल्याने येथील अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. या अपघातात कुठलीही जीवितहानी झाली नसली तरी या गावांचा संपर्क तुटला आहे.

Maharashtra Times 10 Aug 2017, 4:00 am
म. टा. वृत्तसेवा, अंबरनाथ
महाराष्ट्र टाइम्स.कॉम bridge collaps in ambernath
अंबरनाथमध्ये पूल कोसळला!


अंबरनाथ आणि कल्याण तालुक्याच्या भिसोळ-आणे गावाला जोडणारा जुना पूल अचानक कोसळल्याने येथील अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. या अपघातात कुठलीही जीवितहानी झाली नसली तरी या गावांचा संपर्क तुटला आहे.

अंबरनाथ जवळील नालिंबी-टिटवाळा मार्गावरील भिसोळ-आणे गावाला जोडणारा पूल साधारण १९६२ साली तयार करण्यात आला असल्याचे बोलले जाते. हा पूल जिल्हा परिषदेच्या सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत तयार करण्यात आला होता. बुधवारी सकाळी हा पूल अचानक कोसळला. कल्याण आणि अंरबनाथ तालुक्याला जोडणारा पूल असल्याने शाळकरी मुलांना शाळेत जाण्यासाठी मोठा अडथळा निर्माण झाला आहे. दळवळणच ठप्प झाल्याने आणे, भिसेळ, नालिंबी या गावांसोबत कल्याण तालुक्याचा संपर्क तुटला आहे. हा रस्ता कल्याण-अहमदनगर रस्त्यालाही जोडणारा असल्याने येथून अवजड वाहतूकही होत होती.

याबाबत कल्याणचे प्रांतअधिकारी प्रसाद उकिर्डे यांना विचारले असता, ‘हा पूल ५० वर्षे जुना असला तरी त्याच्या धोकादायक असल्याच्या तक्रारी नव्हत्या. जिल्हा परिषदेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाला पर्यायी व्यवस्थेबाबत कळवण्यात आले आहे. लवकरच या भागात पुलाची व्यवस्था करण्यात येईल’.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज